शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

रिफायनरीबाबत शिवसेनेने सोक्षमोक्ष लावावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:35 IST

राजापूर : तब्बल साडेआठ हजार एकर जमीनमालकांची संमतीपत्रे असतानाही दबावाचा वापर करून नाणारमधील रिफायनरी प्रकल्प रद्द करून दाखविण्याची मर्दुमकी ...

राजापूर : तब्बल साडेआठ हजार एकर जमीनमालकांची संमतीपत्रे असतानाही दबावाचा वापर करून नाणारमधील रिफायनरी प्रकल्प रद्द करून दाखविण्याची मर्दुमकी गाजविलेल्या शिवसेनेने आता बारसू-सोलगांवमध्येही तोच फंडा वापरला आहे. खासदार विनायक राऊत यांच्याकडे प्रकल्पसमर्थकांनी मोठ्या समर्थनाची पत्रे देऊनही या भागातही विरोध वाढविण्यासाठी हेच लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे खासदार राऊत यांचीच भूमिका ही शिवसेनेची भूमिका असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर करून सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी राजापूर तालुक्यातून केली जात आहे.

रिफायनरी प्रकल्पासाठी नाणार असो अथवा पर्याय म्हणून पुढे आलेली बारसू-सोलगांवची जागा असो प्रकल्पाला विरोध करण्यासाठी प्रत्येकवेळी ठरावीकच नेतृत्व पुढे आले आहे. यामध्ये मुंबईकरांचा मोठा सहभाग आहे. आम्हाला काहीही ऐकायचेच नाही अशी भूमिका या मंडळींनी घेतली आहे. गेली अनेक दशके तालुक्यात ठरावीक समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांना चाकरमान्यांकडून वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करून मौन पाळण्यास भाग पाडले जात आहे.

शिवसेनेने या प्रस्तावित प्रकल्पाला विरोध करण्यासाठी छुपे राजकारण अंगीकारलेले दिसत आहे. प्रचंड समर्थन असतानाही नाणार प्रकल्पाबाबत राऊत यांनी तेथील समर्थकांना अखेरपर्यंत भेटच दिली नाही. बारसू-सोलगांवमध्ये मोठ्या मुश्किलीने एकदा भेट दिल्यानंतर लागलीच प्रकल्प विरोधकांना तुम्ही विरोध वाढवा असा जाहीर सल्लाही त्यांनी दिला होता. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. प्रकल्पसमर्थकांनी बारसू-सोलगांवसाठी खासदार राऊत यांची भेट घेतल्यानंतर महिना उलटत आला तरी अद्याप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत निर्णयच होत नसल्याने राजापूरकर जनता जे समजायचे ते समजून चुकली असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

या प्रकल्पासाठी नगरपरिषदेसह राजापूर तालुक्यातील १२० गावांनी समर्थन दिलेले आहे. राजापुरातील ५५, तर रत्नागिरीतील २५ संघटनांनी कोकणच्या विकासासाठी प्रकल्प व्हावा, अशी जाहीर भूमिका घेतली आहे. त्यांची पत्रे मुख्यमंत्री, तसेच उद्योगमंत्र्यांना देण्यात आलेली आहेत. मात्र, केंद्रात मतदारसंघाचे नेतृत्व करणारे खासदार राऊत हे ज्या भागात प्रकल्प होणार आहे, त्या पाच गावांतील बहुमत शिवसेना आजमावणार असल्याचे सांगत आहेत. दुसरीकडे खासदार राऊत यांचे निकटवर्तीय बारसू-सोलगांवमध्ये विरोध वाढण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत असताना दिसत आहेत. यामुळे शिवसेनेविरोधात तालुक्यात मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

..........................

देशाच्या सर्वोच्च सभागृहात आमच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार राऊत यांचे वडापाव पुराण मतदारसंघाने ऐकले आहे. त्यांना तीन लाख कोटींचा प्रकल्प, बेरोजगारी निर्मूलन, जीडीपी अशा बाबी अनाकलनीय आहेत. मतदारसंघाची चेष्टा होणारे खासदार लाभणे हे आपले सर्वांचेच दुर्दैव आहे. शिवसेनेकडे राज्याच्या सत्तेचा ताम्रपट नाही. आम्ही थोडी वाट पाहू; मात्र प्रकल्प हा होणारच आहे.

- रवींद्र नागरेकर, उपाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा भाजपा

............................

राजापूर तालुक्यात प्रकल्पाला समर्थन करणारे प्रमुख चार राजकीय पक्ष, तालुक्यातील १२० गावे, ५५ संघटना, राजापूर नगर परिषद आणि रत्नागिरीतील बहुतांशी संघटना ह्या एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला जातीपातीच्या राजकारणाचा आधार घेऊन तालुक्याला आव्हान देणारे एनजीओ आणि काही प्रकल्पविरोधक दलाल अशी स्थिती आहे. शिवसेनेने योग्य भूमिका घ्यावी अशी अपेक्षा आहे. प्रकल्प गेलाच तर त्याचा मोठा फटका शिवसेनेला बसू शकतो याचे भान ठेवावे

- ॲड. शशिकांत सुतार, अध्यक्ष, रिफायनरी प्रकल्प समन्वय समिती

..........................

तीन लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा केंद्र शासनाचा देशातील सर्वोच्च प्रकल्प होणार की नाही हे ५६ आमदार असलेला एक प्रादेशिक पक्ष ठरविणार ही बाबच हास्यास्पद आहे. खासदार राऊत यांचे पाच गावांतील बहुमत देशाचा सर्वोच्च प्रकल्पाचे भवितव्य ठरविणार हे वक्तव्य ऐकल्यानंतर शिवसेनेसारख्या पक्षाकडून देश, देशहित या बाबी अपेक्षित धरणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. मात्र, सत्तेपुढे शहाणपण नाही हेच खरे.

- विनायक कदम, प्रकल्पबाधित, बारसू.