शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने कोकणाला फक्त दारिद्र्य दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:35 IST

राजापूर : राजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्पाच्या निमित्ताने येऊ घातलेल्या सुबत्तेत अडथळा ठरलेल्या शिवसेनेने गेल्या २५ वर्षांत कोकणाला फक्त दारिद्र्य ...

राजापूर : राजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्पाच्या निमित्ताने येऊ घातलेल्या सुबत्तेत अडथळा ठरलेल्या शिवसेनेने गेल्या २५ वर्षांत कोकणाला फक्त दारिद्र्य दिले आहे. ते आर्थिक, वैद्यकीय, शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांसोबत वैचारिक दारिद्र्यदेखील दिले आहे, अशी खरमरीत टीका राजापूर तालुका व्यापारी संघाचे सचिव विलास पेडणेकर यांनी केली आहे.

नाणारमध्ये तब्बल साडेआठ हजार एकर जागेची लेखी संमती मुख्यमंत्र्यांना देऊनही व आणखी दीड ते दोन हजारांची संमत्तीपत्रे प्रकल्प समर्थकांच्या हाती असताना रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याची कारणे कोणती? महाराष्ट्रात कायद्याचे, नीतीनियमांचे राज्य आहे की नाही? असे सवाल पेडणेकर यांनी उपस्थित केले आहेत. मुळात कोणत्याही प्रकल्पासाठी जमीनमालकांचा विरोध अथवा संमती विचारात घेतली जाते. शासनाला जर प्रशासकीय बाबींची पूर्तताच हवी असेल तर ७० टक्के जमीनमालकांच्या लेखी संमतीनंतर नाणारमध्ये अधिसूचना पुन्हा काढण्यास कोणती हरकत आहे, असा प्रश्नही पेडणेकर यांनी केला आहे.

नाणार असो अथवा बारसू-सोलगाव याठिकाणी प्रस्तावित असणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन टिपेला पोहोचले की, खासदार विनायक राऊत यांनी त्यात अडथळे आणण्याचे प्रयत्न चालवले आहेत. प्रकल्प झाल्यास येथे बाहेरील लोक येतील आणि आपल्या लोकसभा मतदारसंघाचे गणित बिघडेल, असे संकुचित विचार शिवसेनेचे काही नेते बोलून दाखवत आहेत.

राजापूर तालुका आणि पर्यायाने कोकणाच्या विकासाच्या आड येणारे दुर्योधन कोण आहे हे आता जनतेला पुरेपूर समजले आहे. त्यांना येथील जनतेच्या कुटुंबांतील चूल पेटेल अथवा नाही, यापेक्षा मतदारसंघाच्या गणिताची मोठी काळजी आहे, असे टीकास्त्र पेडणेकर यांनी सोडले आहे.