शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना, राष्ट्रवादीचा नगराध्यक्षांना दणका

By admin | Updated: September 1, 2016 00:42 IST

रत्नागिरी नगरपरिषद सभा १५ सप्टेंबरपर्यंत तहकूब

रत्नागिरी : शहरातील पाणीप्रश्न, रस्त्यांवरील खड्डे, कचऱ्याचे साम्राज्य, बंद पडलेले पथदीप, शहराबाहेर दिलेल्या पाणी जोडण्या यासारख्या प्रश्नांची सरबत्ती करत शिवसेना व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांची बुधवारी कोंडी केली. २० सदस्यांच्या प्रखर विरोधापुढे अखेर नगराध्यक्षांना झुकावे लागले. त्यामुळे बुधवारची सभा १५ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली. ही सभा आता १६ सप्टेंबरला होणार आहे.नगर परिषदेच्या बुधवारच्या सभेत शून्य प्रहरात सेना, राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी शहरातील अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवरही खड्ड्यांचे साम्राज्य आहे. शहरात कचऱ्याचे ढीग असून, दुर्गंधी पसरली आहे. असंख्य पथदीप बंद आहेत. भर पावसाळ्यातही शहरवासीयांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. शहराला पाणी पुरविणारे शीळ धरण व पानवल धरण पूर्ण भरलेले आहे. मात्र, पाणीपुरवठ्याचे नियोजन नाही. हे प्रश्न गंभीर बनलेले असताना नगराध्यक्ष मयेकर यांचे त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष आहे, असा आरोप नगरसेवकांनी केला. नगराध्यक्षांना मंगळागौर कार्यक्रमासाठी वेळ आहे, मात्र मूलभूत प्रश्नच ते विसरले आहेत, असा हल्लाबोल सेनेचे नगरसेवक बंड्या साळवी यांनी केला. मिलिंद कीर, उमेश शेट्ये यांनी पाणीप्रश्नावर झोड उठविली. शहराबाहेर तिवंडेवाडीतील साडेचारशे सदनिका असलेल्या गृहसंकुलास नगरपरिषदेने दिलेली पाणी जोडणी रद्द करण्याची मागणी नगरसेवक राहुल पंडित यांनी केली.अनधिकृत नळ जोडण्या रद्द करण्याची मागणी उपनगराध्यक्ष भय्या मलुष्टे यांनी केली. हद्दीबाहेरील शिरगाव ग्रामपंचायत क्षेत्रात दिलेल्या नळ जोडण्या रद्द करा, पऱ्याच्या आळीतील इमारतीच्या बेसमेंटमध्ये ६ फूट पाणी भरूनही त्याबाबत कारवाई का नाही, असे सवाल करीत भाजपचे नगरसेवक अशोक मयेकर यांनी नगराध्यक्षांना घरचा आहेर दिला. शहरातील या समस्या गंभीर वळणावर आहेत. गणेशोत्सव चार दिवसांवर आला आहे. त्यामुळे या समस्यांची सोडवणूक प्रथम करावी व नंतरच सभा घ्यावी. तोपर्यंत सभा तहकूब करावी. पक्षाचे नगरसेवक सभेसाठी सहकार्य करणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेच्या १५, तर राष्ट्रवादीच्या ५ नगरसेवकांनी घेतली होती. तशी स्वतंत्र पत्रही दोन्ही पक्षांतर्फे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांना मंगळवारी देण्यात आली होती. त्यामुळे बुधवारची सभा वादळी ठरणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. प्रखर विरोधामुळे सभा तहकूब करावी लागली. (प्रतिनिधी)