शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना, राष्ट्रवादीचा नगराध्यक्षांना दणका

By admin | Updated: September 1, 2016 00:42 IST

रत्नागिरी नगरपरिषद सभा १५ सप्टेंबरपर्यंत तहकूब

रत्नागिरी : शहरातील पाणीप्रश्न, रस्त्यांवरील खड्डे, कचऱ्याचे साम्राज्य, बंद पडलेले पथदीप, शहराबाहेर दिलेल्या पाणी जोडण्या यासारख्या प्रश्नांची सरबत्ती करत शिवसेना व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांची बुधवारी कोंडी केली. २० सदस्यांच्या प्रखर विरोधापुढे अखेर नगराध्यक्षांना झुकावे लागले. त्यामुळे बुधवारची सभा १५ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली. ही सभा आता १६ सप्टेंबरला होणार आहे.नगर परिषदेच्या बुधवारच्या सभेत शून्य प्रहरात सेना, राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी शहरातील अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवरही खड्ड्यांचे साम्राज्य आहे. शहरात कचऱ्याचे ढीग असून, दुर्गंधी पसरली आहे. असंख्य पथदीप बंद आहेत. भर पावसाळ्यातही शहरवासीयांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. शहराला पाणी पुरविणारे शीळ धरण व पानवल धरण पूर्ण भरलेले आहे. मात्र, पाणीपुरवठ्याचे नियोजन नाही. हे प्रश्न गंभीर बनलेले असताना नगराध्यक्ष मयेकर यांचे त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष आहे, असा आरोप नगरसेवकांनी केला. नगराध्यक्षांना मंगळागौर कार्यक्रमासाठी वेळ आहे, मात्र मूलभूत प्रश्नच ते विसरले आहेत, असा हल्लाबोल सेनेचे नगरसेवक बंड्या साळवी यांनी केला. मिलिंद कीर, उमेश शेट्ये यांनी पाणीप्रश्नावर झोड उठविली. शहराबाहेर तिवंडेवाडीतील साडेचारशे सदनिका असलेल्या गृहसंकुलास नगरपरिषदेने दिलेली पाणी जोडणी रद्द करण्याची मागणी नगरसेवक राहुल पंडित यांनी केली.अनधिकृत नळ जोडण्या रद्द करण्याची मागणी उपनगराध्यक्ष भय्या मलुष्टे यांनी केली. हद्दीबाहेरील शिरगाव ग्रामपंचायत क्षेत्रात दिलेल्या नळ जोडण्या रद्द करा, पऱ्याच्या आळीतील इमारतीच्या बेसमेंटमध्ये ६ फूट पाणी भरूनही त्याबाबत कारवाई का नाही, असे सवाल करीत भाजपचे नगरसेवक अशोक मयेकर यांनी नगराध्यक्षांना घरचा आहेर दिला. शहरातील या समस्या गंभीर वळणावर आहेत. गणेशोत्सव चार दिवसांवर आला आहे. त्यामुळे या समस्यांची सोडवणूक प्रथम करावी व नंतरच सभा घ्यावी. तोपर्यंत सभा तहकूब करावी. पक्षाचे नगरसेवक सभेसाठी सहकार्य करणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेच्या १५, तर राष्ट्रवादीच्या ५ नगरसेवकांनी घेतली होती. तशी स्वतंत्र पत्रही दोन्ही पक्षांतर्फे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांना मंगळवारी देण्यात आली होती. त्यामुळे बुधवारची सभा वादळी ठरणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. प्रखर विरोधामुळे सभा तहकूब करावी लागली. (प्रतिनिधी)