शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

शिवसेना, राष्ट्रवादीचा नगराध्यक्षांना दणका

By admin | Updated: September 1, 2016 00:42 IST

रत्नागिरी नगरपरिषद सभा १५ सप्टेंबरपर्यंत तहकूब

रत्नागिरी : शहरातील पाणीप्रश्न, रस्त्यांवरील खड्डे, कचऱ्याचे साम्राज्य, बंद पडलेले पथदीप, शहराबाहेर दिलेल्या पाणी जोडण्या यासारख्या प्रश्नांची सरबत्ती करत शिवसेना व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांची बुधवारी कोंडी केली. २० सदस्यांच्या प्रखर विरोधापुढे अखेर नगराध्यक्षांना झुकावे लागले. त्यामुळे बुधवारची सभा १५ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली. ही सभा आता १६ सप्टेंबरला होणार आहे.नगर परिषदेच्या बुधवारच्या सभेत शून्य प्रहरात सेना, राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी शहरातील अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवरही खड्ड्यांचे साम्राज्य आहे. शहरात कचऱ्याचे ढीग असून, दुर्गंधी पसरली आहे. असंख्य पथदीप बंद आहेत. भर पावसाळ्यातही शहरवासीयांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. शहराला पाणी पुरविणारे शीळ धरण व पानवल धरण पूर्ण भरलेले आहे. मात्र, पाणीपुरवठ्याचे नियोजन नाही. हे प्रश्न गंभीर बनलेले असताना नगराध्यक्ष मयेकर यांचे त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष आहे, असा आरोप नगरसेवकांनी केला. नगराध्यक्षांना मंगळागौर कार्यक्रमासाठी वेळ आहे, मात्र मूलभूत प्रश्नच ते विसरले आहेत, असा हल्लाबोल सेनेचे नगरसेवक बंड्या साळवी यांनी केला. मिलिंद कीर, उमेश शेट्ये यांनी पाणीप्रश्नावर झोड उठविली. शहराबाहेर तिवंडेवाडीतील साडेचारशे सदनिका असलेल्या गृहसंकुलास नगरपरिषदेने दिलेली पाणी जोडणी रद्द करण्याची मागणी नगरसेवक राहुल पंडित यांनी केली.अनधिकृत नळ जोडण्या रद्द करण्याची मागणी उपनगराध्यक्ष भय्या मलुष्टे यांनी केली. हद्दीबाहेरील शिरगाव ग्रामपंचायत क्षेत्रात दिलेल्या नळ जोडण्या रद्द करा, पऱ्याच्या आळीतील इमारतीच्या बेसमेंटमध्ये ६ फूट पाणी भरूनही त्याबाबत कारवाई का नाही, असे सवाल करीत भाजपचे नगरसेवक अशोक मयेकर यांनी नगराध्यक्षांना घरचा आहेर दिला. शहरातील या समस्या गंभीर वळणावर आहेत. गणेशोत्सव चार दिवसांवर आला आहे. त्यामुळे या समस्यांची सोडवणूक प्रथम करावी व नंतरच सभा घ्यावी. तोपर्यंत सभा तहकूब करावी. पक्षाचे नगरसेवक सभेसाठी सहकार्य करणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेच्या १५, तर राष्ट्रवादीच्या ५ नगरसेवकांनी घेतली होती. तशी स्वतंत्र पत्रही दोन्ही पक्षांतर्फे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांना मंगळवारी देण्यात आली होती. त्यामुळे बुधवारची सभा वादळी ठरणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. प्रखर विरोधामुळे सभा तहकूब करावी लागली. (प्रतिनिधी)