शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

जनतेचे मत प्रांजळपणे स्वीकारण्याचे धैर्य शिवसेनेत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:22 IST

राजापूर : रिफायनरी प्रकल्पासंबंधित जनतेचे हित प्रांजळपणे स्वीकारण्याचे आणि ते जनतेचे मत मांडण्याचे धैर्य शिवसेनेच्या राजापूरमधील दोन्ही नगरसेविकांनी दाखविले. ...

राजापूर : रिफायनरी प्रकल्पासंबंधित जनतेचे हित प्रांजळपणे स्वीकारण्याचे आणि ते जनतेचे मत मांडण्याचे धैर्य शिवसेनेच्या राजापूरमधील दोन्ही नगरसेविकांनी दाखविले. मात्र, तसे धैर्य शिवसेनेचे आमदार राजन साळवी, खासदार विनायक राऊत आणि सेना नेतृत्वाकडे नाही, अशी टीका भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव यांनी केली आहे. प्रकल्प समर्थनाची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेविका प्रतीक्षा खडपे आणि मनिषा मराठे यांचे विशेष कौतुक करताना या रणरागिणींवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाल्यास भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असेही स्पष्ट केले.

रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणारा ठराव मंगळवारी झालेल्या नगर पालिकेच्या सभेमध्ये मंजूर झाला. यामध्ये शिवसेनेच्या अन्य नगरसेवकांनी ठरावाच्या विरोधी मतदान केलेले असताना मात्र, प्रतीक्षा खडपे आणि मनिषा मराठे यांनी प्रकल्प समर्थनाच्या ठरावाच्या बाजूने मत मांडले. त्याचे शिवसेनेमध्ये पडसाद उमटताना प्रतीक्षा खडपे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. या साऱ्या घडामोडींवर गुरव यांनी भाष्य केले आहे.

जनतेच्या हिताच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकणाऱ्या व विकासात्मक दृष्टीकोन ठेवणाऱ्या सर्व व्यक्तींचे भाजपामध्ये सदैव स्वागतच असेल, असेही त्यांनी सांगितले. वरकरणी रिफायनरी प्रकल्प विरोध दाखवणाऱ्या विकासशून्य शिवसेना नेत्यांनी आता स्थानिक कार्यकर्ते आणि जनतेला रिफायनरी प्रकल्प हवा की नको हे जाणून घेणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले.