शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

तवसाळ विजयगडावर रंगली शिवजयंती

By admin | Updated: February 23, 2015 00:20 IST

इतिहासाचे साक्षीदार : एकीकडे संरक्षणाची हमी, दुसरीकडे किल्ल्यांची दुरवस्था

असगोली : गुहागर तालुक्यातील तवसाळ येथील पुरातन व दुर्लक्षित अशा विजय गडावर पहिल्यांदाच तवसाळ ग्रामस्थांतर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी जय भवानी - जय शिवाजी असा जयघोष करण्यात आला.तवसाळ गावामध्ये असणाऱ्या विजयगड किल्ल्याची सध्याची अवस्था फार बिकट आहे. हा किल्ला कोणी व केव्हा उभा केला, याविषयी ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. मात्र, उपलब्ध माहितीनुसार १३४७मध्ये अब्दुल मुज्जफर अल्लाउद्दीन बहामनी या मुघल सम्राटाकडे हा किल्ला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या किल्ल्यावर मराठ्यांचे स्वामित्व राहिले. १६९८ पासून सरखोल कान्होजी आंग्रे यांच्याकडे असणारा हा किल्ला कालांतराने पेशव्यांकडे व १८१८ पासून इंग्रजांच्या ताब्यात राहिला. फार पूर्वीचा असणारा हा विजयगड कायम दुर्लक्षित राहिला. तटबंदी नष्ट होत असल्याने किल्ल्याचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. इंग्रजांच्या राजवटीनंतर हा किल्ला व परिसर सुर्वे बंधूंच्या नावे सातबाराला नोंदवला गेला. किल्ला आपल्या नावावर असला तरी जमीनदारांनी त्याचा कोणताही गैरवापर केलेला नाही. त्यांची आजही शासनाला सहकार्य करण्याची भूमिका आहे.अशा प्राचीन विजयगडावर ग्रामस्थांच्यावतीने शिवजयंती साजरी करण्याचा मानस तवसाळ ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी व्यक्त केला. त्याला जमीन मालक व ग्रामस्थांनी भरभरुन दाद दिली. शिवजयंतीच्या पूर्वी ग्रामस्थांच्यावतीने या किल्ल्याची साफसफाई करण्यात आली. किल्ला रस्त्यालगत असल्याने या किल्ल्याची माहिती देणारे बॅनर लावण्यात आले. गडावर शिवप्रतिमेचे पूजन करुन भगवे ध्वज उभारुन फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांनी विजयगडाचा परिसर दणाणून सोडत ग्रामस्थांनी विजयगडावर पहिली वहिली शिवजयंती साजरी केली. (वार्ताहर)गुहागर तालुक्यातील तवसाळ येथे दुर्लक्षित विजयगडावर प्रथमच साजरी झाली शिवजयंती, हजारोंची उपस्थिती.किल्ल्याची स्थिती गंभीर, इतिहासप्रेमींना किल्ला वाचवा मोहीम घ्यावी लागणार.