शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

शिर्के गुरुकुलचे विद्यार्थी रमले भडे येथे शेतीत

By admin | Updated: July 21, 2014 23:38 IST

उद्याचे शेतकरी : शेतीतील अनुभव घेत विद्यार्थ्यांनी साकारले प्रात्यक्षिक

रत्नागिरी : रत्नागिरीतील शिर्के गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच नजीकच्या भडे येथील शेती प्रक्षेत्रावर जाऊन माहिती घेतली.कोकणात पावसाने सध्या जोर धरला आहे. गावोगावी शेतीची लगबग सुरु झाली. भात लागवडीखालील क्षेत्राच्या दृष्टीने भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे भारत देशातील लागवडीखालील क्षेत्रात वाढ झालेली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीला महत्त्वाचे स्थान आहे.मात्र, कोकणातील शेतीखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. कोकणातील लोक डोंगर उतारावर नाचणी, वरी, हरीक, भात यांसारखी पिके घेत असत. परंतु याचे प्रमाण आता दिवसेंदिवस कमी होत आहे. या कमी होणाऱ्या शेती क्षेत्रामध्ये वाढ होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे. नोकरीच्या मागे धावणाऱ्या तरुण वर्गाला शेतीकडे वळवणे गरजेचे आहे. यासाठी गुरुकुलात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शेतीबाबत प्रत्यक्ष माहिती व्हावी, यासाठी भात लावणी हा उपक्रम गुरुकुलच्यावतीने दरवर्षी राबवला जातो. प्रत्यक्ष शेतात जाऊन गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना शेतीबाबत माहिती दिली जाते. शेती कशी केली जाते, मशागत म्हणजे काय, ती कशी करतात, याचा अनुभव विद्यार्थ्यांना शेतात जाऊन दिला जातो.यावर्षीही भातलावणी उपक्रम पार पडला. इयत्ता पाचवीचे विद्यार्थी लांजा, भडे गावातील शेतकरी नारायण तेंडुलकर यांच्या शेतावर, तर सहावीचे विद्यार्थी मेर्वी गावातील शेतकरी माधव अभ्यंकर यांच्या शेतावर लावणीसाठी गेले होते. अभ्यंकर यांच्याकडून रोपे कशी काढायची, हे शिकून रोपे काढली, शेतातील तण काढले, बांध घातले, पॉवर ट्रिलरचा उपयोग करुन जमीन नांगारली. यामुळे आधुनिक शेतातील भात नांगरणी यंत्राची माहिती मिळाली. नांगरणीनंतर चिखल सारखा केला व त्यानंतर त्या चिखलात विशिष्ट अंतरावर भाताची रोपे लावली. नंतर युरिया या खताची योग्य मात्रा देण्यात आली. यावेळी सह्याद्री हे बियाणे वापरले आहे. या उपक्रमातून आवड निर्माण होऊन गुरुकुलचे काही विद्यार्थी भविष्यात नक्कीच शेती व्यवसायाकडे वळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)-भारतीय कृषी क्षेत्राला महत्त्व प्राप्त झाले आहे. या क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करताना येणारे अनुभव रोमांचक असतात. कष्टकरीवर्गाच्या या कृषी संस्कृतीचा अनुभव भडे येथे जाऊन गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी घेतला. हे उद्याचे शेतकरी सधन कृषी संस्कृतीसाठी आतापासून प्रयत्न करीत आहेत.