शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

शिर्के गुरुकुलचे विद्यार्थी रमले भडे येथे शेतीत

By admin | Updated: July 21, 2014 23:38 IST

उद्याचे शेतकरी : शेतीतील अनुभव घेत विद्यार्थ्यांनी साकारले प्रात्यक्षिक

रत्नागिरी : रत्नागिरीतील शिर्के गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच नजीकच्या भडे येथील शेती प्रक्षेत्रावर जाऊन माहिती घेतली.कोकणात पावसाने सध्या जोर धरला आहे. गावोगावी शेतीची लगबग सुरु झाली. भात लागवडीखालील क्षेत्राच्या दृष्टीने भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे भारत देशातील लागवडीखालील क्षेत्रात वाढ झालेली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीला महत्त्वाचे स्थान आहे.मात्र, कोकणातील शेतीखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. कोकणातील लोक डोंगर उतारावर नाचणी, वरी, हरीक, भात यांसारखी पिके घेत असत. परंतु याचे प्रमाण आता दिवसेंदिवस कमी होत आहे. या कमी होणाऱ्या शेती क्षेत्रामध्ये वाढ होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे. नोकरीच्या मागे धावणाऱ्या तरुण वर्गाला शेतीकडे वळवणे गरजेचे आहे. यासाठी गुरुकुलात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शेतीबाबत प्रत्यक्ष माहिती व्हावी, यासाठी भात लावणी हा उपक्रम गुरुकुलच्यावतीने दरवर्षी राबवला जातो. प्रत्यक्ष शेतात जाऊन गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना शेतीबाबत माहिती दिली जाते. शेती कशी केली जाते, मशागत म्हणजे काय, ती कशी करतात, याचा अनुभव विद्यार्थ्यांना शेतात जाऊन दिला जातो.यावर्षीही भातलावणी उपक्रम पार पडला. इयत्ता पाचवीचे विद्यार्थी लांजा, भडे गावातील शेतकरी नारायण तेंडुलकर यांच्या शेतावर, तर सहावीचे विद्यार्थी मेर्वी गावातील शेतकरी माधव अभ्यंकर यांच्या शेतावर लावणीसाठी गेले होते. अभ्यंकर यांच्याकडून रोपे कशी काढायची, हे शिकून रोपे काढली, शेतातील तण काढले, बांध घातले, पॉवर ट्रिलरचा उपयोग करुन जमीन नांगारली. यामुळे आधुनिक शेतातील भात नांगरणी यंत्राची माहिती मिळाली. नांगरणीनंतर चिखल सारखा केला व त्यानंतर त्या चिखलात विशिष्ट अंतरावर भाताची रोपे लावली. नंतर युरिया या खताची योग्य मात्रा देण्यात आली. यावेळी सह्याद्री हे बियाणे वापरले आहे. या उपक्रमातून आवड निर्माण होऊन गुरुकुलचे काही विद्यार्थी भविष्यात नक्कीच शेती व्यवसायाकडे वळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)-भारतीय कृषी क्षेत्राला महत्त्व प्राप्त झाले आहे. या क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करताना येणारे अनुभव रोमांचक असतात. कष्टकरीवर्गाच्या या कृषी संस्कृतीचा अनुभव भडे येथे जाऊन गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी घेतला. हे उद्याचे शेतकरी सधन कृषी संस्कृतीसाठी आतापासून प्रयत्न करीत आहेत.