शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
5
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
6
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
7
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
8
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
9
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
10
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
11
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
12
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
13
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
14
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
15
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
16
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
17
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
18
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
19
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
20
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

शिर्के गुरुकुलचे विद्यार्थी रमले भडे येथे शेतीत

By admin | Updated: July 21, 2014 23:38 IST

उद्याचे शेतकरी : शेतीतील अनुभव घेत विद्यार्थ्यांनी साकारले प्रात्यक्षिक

रत्नागिरी : रत्नागिरीतील शिर्के गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच नजीकच्या भडे येथील शेती प्रक्षेत्रावर जाऊन माहिती घेतली.कोकणात पावसाने सध्या जोर धरला आहे. गावोगावी शेतीची लगबग सुरु झाली. भात लागवडीखालील क्षेत्राच्या दृष्टीने भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे भारत देशातील लागवडीखालील क्षेत्रात वाढ झालेली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीला महत्त्वाचे स्थान आहे.मात्र, कोकणातील शेतीखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. कोकणातील लोक डोंगर उतारावर नाचणी, वरी, हरीक, भात यांसारखी पिके घेत असत. परंतु याचे प्रमाण आता दिवसेंदिवस कमी होत आहे. या कमी होणाऱ्या शेती क्षेत्रामध्ये वाढ होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे. नोकरीच्या मागे धावणाऱ्या तरुण वर्गाला शेतीकडे वळवणे गरजेचे आहे. यासाठी गुरुकुलात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शेतीबाबत प्रत्यक्ष माहिती व्हावी, यासाठी भात लावणी हा उपक्रम गुरुकुलच्यावतीने दरवर्षी राबवला जातो. प्रत्यक्ष शेतात जाऊन गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना शेतीबाबत माहिती दिली जाते. शेती कशी केली जाते, मशागत म्हणजे काय, ती कशी करतात, याचा अनुभव विद्यार्थ्यांना शेतात जाऊन दिला जातो.यावर्षीही भातलावणी उपक्रम पार पडला. इयत्ता पाचवीचे विद्यार्थी लांजा, भडे गावातील शेतकरी नारायण तेंडुलकर यांच्या शेतावर, तर सहावीचे विद्यार्थी मेर्वी गावातील शेतकरी माधव अभ्यंकर यांच्या शेतावर लावणीसाठी गेले होते. अभ्यंकर यांच्याकडून रोपे कशी काढायची, हे शिकून रोपे काढली, शेतातील तण काढले, बांध घातले, पॉवर ट्रिलरचा उपयोग करुन जमीन नांगारली. यामुळे आधुनिक शेतातील भात नांगरणी यंत्राची माहिती मिळाली. नांगरणीनंतर चिखल सारखा केला व त्यानंतर त्या चिखलात विशिष्ट अंतरावर भाताची रोपे लावली. नंतर युरिया या खताची योग्य मात्रा देण्यात आली. यावेळी सह्याद्री हे बियाणे वापरले आहे. या उपक्रमातून आवड निर्माण होऊन गुरुकुलचे काही विद्यार्थी भविष्यात नक्कीच शेती व्यवसायाकडे वळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)-भारतीय कृषी क्षेत्राला महत्त्व प्राप्त झाले आहे. या क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करताना येणारे अनुभव रोमांचक असतात. कष्टकरीवर्गाच्या या कृषी संस्कृतीचा अनुभव भडे येथे जाऊन गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी घेतला. हे उद्याचे शेतकरी सधन कृषी संस्कृतीसाठी आतापासून प्रयत्न करीत आहेत.