शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
3
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
4
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
5
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
6
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
7
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
8
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
9
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
10
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
11
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
12
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
13
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
14
जातगणना : मॅजिक की मंडल?
15
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
16
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
17
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
18
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
19
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
20
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...

शिमगोत्सव आदेशात दर चार दिवसांनी बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:32 IST

चिपळूण : जिल्ह्यात शिमगोत्सवाच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात येत असलेले आदेश दर चार दिवसांनी बदलत असल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, ...

चिपळूण : जिल्ह्यात शिमगोत्सवाच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात येत असलेले आदेश दर चार दिवसांनी बदलत असल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, अशा शब्दात आमदार भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली.

बुधवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली याबाबतची मते मांडली. शिमगोत्सवाबाबत नेमके काय आदेश आहेत, पालखी घरोघरी जाणार की नाही, गेल्यास सोबत किती माणसे असण्याला मान्यता आहे, याबाबतच्या निकषात सतत बदल होत आहे. या संभ्रमाच्या वातावरणामुळे काही वाद व संघर्षाची भीती निर्माण झाली आहे. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी अशा पध्दतीचे आदेश देताना काहीतरी तारतम्य ठेवायला हवे, असे आमदार जाधव म्हणाले.

आवश्यकता वाटल्यास जिल्हाधिकारी यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करावी व शिमगोत्सवाच्या परंपरा समजून घ्याव्यात. पहिल्या होळी आधीच शिमग्याचा कार्यक्रम ठरलेला असतो. त्यामध्ये सातत्याने बदल होत गेल्यास गोंधळ उडेल. तेव्हा ग्रामस्थांनी आपल्या परंपरेनुसार कार्यक्रम करावेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजीही घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.