शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

शिमगोत्सव आदेशात दर चार दिवसांनी बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:32 IST

चिपळूण : जिल्ह्यात शिमगोत्सवाच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात येत असलेले आदेश दर चार दिवसांनी बदलत असल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, ...

चिपळूण : जिल्ह्यात शिमगोत्सवाच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात येत असलेले आदेश दर चार दिवसांनी बदलत असल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, अशा शब्दात आमदार भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली.

बुधवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली याबाबतची मते मांडली. शिमगोत्सवाबाबत नेमके काय आदेश आहेत, पालखी घरोघरी जाणार की नाही, गेल्यास सोबत किती माणसे असण्याला मान्यता आहे, याबाबतच्या निकषात सतत बदल होत आहे. या संभ्रमाच्या वातावरणामुळे काही वाद व संघर्षाची भीती निर्माण झाली आहे. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी अशा पध्दतीचे आदेश देताना काहीतरी तारतम्य ठेवायला हवे, असे आमदार जाधव म्हणाले.

आवश्यकता वाटल्यास जिल्हाधिकारी यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करावी व शिमगोत्सवाच्या परंपरा समजून घ्याव्यात. पहिल्या होळी आधीच शिमग्याचा कार्यक्रम ठरलेला असतो. त्यामध्ये सातत्याने बदल होत गेल्यास गोंधळ उडेल. तेव्हा ग्रामस्थांनी आपल्या परंपरेनुसार कार्यक्रम करावेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजीही घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.