शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

शतकोटींचे अंदाजपत्रक

By admin | Updated: February 25, 2015 00:13 IST

रत्नागिरी नगर परिषद : शुक्रवारी सभा; रस्ते, पाणी वितरण व्यवस्थेवर भर

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या २०१५ - १६ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात कोटींचे शतक झाल्याचा विक्रम पाहावयास मिळणार आहे. २७ फेबु्रवारी रोजी मांडले जाणारे हे अंदाजपत्रक तब्बल ११८ कोटी २७ लाख ४१ हजार ८०३ रुपये शिलकीसह जमेचे असून, १०९ कोटी ५२ हजार अंदाजित खर्च दाखवण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षात ९९ कोटी रूपयांहून अधिक रक्कम पालिकेच्या खात्यात जमा, तर एकूण खर्च ६७ कोटी रूपये इतका अपेक्षित आहे. सभागृहात विकासविषयक विविध विषयांवर चर्चा होऊन हे अंदाजपत्रक मांडले जाणार आहे. नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्या कारकिर्दीतील पालिकेचे हे पहिलेच अंदाजपत्रक आहे. विशेष म्हणजे यंदाचे हे अंदाजपत्रक जम्बो असेल. रत्नागिरी नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमच एवढे मोठे अंदाजपत्रक सादर होणार आहे. शासनाच्या विविध योजनांतून मिळणाऱ्या निधीचा लाभ घेत शहराचा भक्कम विकास करण्यासाठीच एवढ्या मोठ्या रकमेचे अंदाजपत्रक पालिकेच्या इतिहासात येत्या सभेत मांडले जाणार आहे. त्यामुळे या अंदाजपत्रकात नेमक्या कोणत्या विषयांना प्राधान्य दिले जाणार आहे, याबाबत नागरिकांमध्येही उत्सुकता आहे. रत्नागिरी नगर परिषदेतील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अंदाजपत्रकातील २० टक्के रक्कम ही पालिकेच्या उत्पन्नातून जमा होणार आहे. केंद्र व राज्याच्या विविध योजनांमधून प्रत्येकी ४० टक्के निधी जमा होणार आहे. राज्याच्या सुजल निर्मल योजनेतून पाण्याशी संबंधित योजनांना निधी मिळणार आहे. तसेच नगरोत्थान योजनेतून रस्ते व अन्य विकासकामांना निधी प्राप्त होणार आहे. शासनाकडून मिळणाऱ्या निधीतूनच शहरातील गटारे, रस्ते, पाणी या समस्या सोडवण्यासाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात भरीव तरतूद होणार असल्याचा अंदाज पालिका वर्तुळातून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)पाणी वितरण व्यवस्थाशहरवासीयांची गेल्या १० वर्षांपासूनची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी अंदाजपत्रकात भरघोस तरतूद होण्याची शक्यता आहे. शहरातील नळयोजनेद्वारे पाणी वितरीत करणाऱ्या संपूर्ण जलवाहिनीचे जाळे कालबाह्य झाले आहे. त्यामुळे हे संपूर्ण जलवाहिनीचे जाळे बदलले जाणार आहे. सध्या मुख्य जलवाहिनीवरून थेट नळ जोडण्या देण्यात आल्याने नागरिकांना अनेक भागात पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नाही. तसेच शीळ धरणावरील जलवाहिनी जागोजागी फुटत असल्यानेही धरणात पाणी असूनही पाणीपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यासाठी शीळ धरणावरून साळवी स्टॉपकडे येणारी जलवाहिनी बदलली जाणार आहे.तारांगण, डांबरीकरण, पर्यटनअंदाजपत्रकात ज्या विकासकामांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे, त्यामध्ये तारांगण उभारणे, रस्त्यांचे डांबरीकरण, अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरण, पर्यटन विकासासाठी सुविधा निर्माण करणे, पर्यटनस्थळे म्हणून विकसित होणाऱ्या भागांचे सुशोभिकरण करणे, कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प शहरात उभारणे, दांडेआडोम घनकचरा प्रकल्पाला चालना देणे-तेथे प्रकल्प उभारणे. अपार्टमेंटमधील कंपोस्ट खत मशिन्स प्रकल्पांना प्रोत्साहन देणे, शहराच्या स्वच्छतेवर भर देणे या कामांचा समावेश आहे.