शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

शांता नारकर यांचे हृदयविकाराने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:31 IST

देवरुख : सामाजिक बांधिलकी आणि संवेदना ठेऊन मोलाचे कार्य करणाऱ्या मागच्या पिढीतील महान धुरीणी देवरुख मातृमंदिर संस्थेच्या माजी कार्याध्यक्षा ...

देवरुख : सामाजिक बांधिलकी आणि संवेदना ठेऊन मोलाचे कार्य करणाऱ्या मागच्या पिढीतील महान धुरीणी देवरुख मातृमंदिर संस्थेच्या माजी कार्याध्यक्षा शांता विजय नारकर यांचे शुक्रवारी सायंकाळी ७.३९ वाजता हृदयविकाराने निधन झाले. पती विजयभाऊंच्या खांद्याला खांदा लाऊन काम करत, त्यांनी मातृमंदिर संस्थेत मोठे योगदान दिले आहे.

न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कोकणच्या मदर तेरेसा मावशीबाई हळबे यांच्या सान्निध्यात त्यांनी खूप वर्षे काम केले. त्यांना कै.रामविलास लाहोटी स्मृती आदर्श शिक्षिका पुरस्कार, गुरुवर्य अ.आ. देसाई ट्रस्टचा पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांचा राज्यस्तरीय पुरस्कार असे अनेक पुरस्कारांनी गाैरविण्यात आले आहे. अनेक संस्थावर पदाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी आयुष्य वेचले. विशेषतः दहावी नापास मुलींसाठी चांगले कार्य करून मनाली हा प्रकल्प सुरू केला होता. शांताबाई म्हणून त्या विशेष लोकप्रिय होत्या. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, संपादित केली. ‘क्षण कसोटीचे’ हे त्यांचे पुस्तक गाजले. पती विजय नारकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी भाऊंच्या जीवनावरील कातळावरचा ‘तपस्वी’ हे पुस्तक संपादित केले. त्यांच्या जाण्याने मातृमंदिर जणू पोरकेच झाले आहे.