शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

सातबारा दुरूस्तीच्या कामाला वेग, रत्नागिरी जिल्ह्याचे ३२ टक्के काम पूर्ण

By admin | Updated: March 22, 2017 13:48 IST

तालुक्याचे ४० टक्के पूर्ण

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी स्वतंत्र सर्व्हर मिळाल्याने सातबारा दुरूस्तीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यातील एकूण २० लाख ८० हजार उताऱ्यांपैकी आतापर्यंत ६ लाख ५६ हजार (३२ टक्के) उताऱ्यांमध्ये दुरूस्ती झाल्या असून, रत्नागिरी तालुक्यातील १ लाख २२ हजार ७० (३९ टक्के) उताऱ्यांमधील दुरूस्ती पूर्ण झाली आहे.

राज्यात रत्नागिरी जिल्ह्यात सातबारा उताऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. उताऱ्यांवरील खातेदारही अधिक आहेत. सातबारा उताऱ्यांचे संणकीकरण झाले असले तरी मूळ उताऱ्यातील दुरूस्ती आॅनलाईन उताऱ्यांमध्ये झालेल्या नाहीत. या उताऱ्यांमध्ये दुरूस्ती करणे गरजेचे आहे. त्यामुळे पुन्हा दुरूस्तीचे काम जिल्हा प्रशासनाला हाती घ्यावे लागले आहे. राज्यभरच ही स्थिती आहे. मात्र, संगणकीकरणासाठी शासनाककडून आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये दुरूस्ती करता येत नसल्याने शासनाने ‘एडिट मॉड्युल’ हे दुरूस्तीसाठी असलेले नवे सॉफ्टवेअर सर्व जिल्ह्यांना दिले आहे.

सध्या तालुक्यातील सर्व तलाठी सोमवार वगळून इतर दिवशी तालुक्याच्या ठिकाणी या कामात गुंतले आहेत. प्रत्येक तहसीलच्या ठिकाणी सकाळी ७ ते रात्री उशिरापर्यंत सातबारा दुरूस्तीचे काम सुरू झालेले आहे. ‘कनेक्टिव्हीटी’ची समस्या काही अंशी सुटण्यास मदत झाली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील पूर्वीच्या पुरवठा विभागाच्या कार्यालयात सध्या रत्नागिरी तालुक्यातील ५४ तलाठी सजा आणि नऊ मंडल कार्यालयांच्या सातबारा दुरूस्तीच्या तसेच प्रमाणिकीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला आहे. रत्नागिरी तालुक्यात ३ लाख १२ हजार एवढी सातबारा उताऱ्यांची संख्या आहे. त्यापैकी आतापर्यंत १ लाख २२ हजार उताऱ्यांमध्ये दुरूस्ती झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयकडून आणि भारतीय दूरसंचारच्या सात वाहिनीवरून ‘कनेक्टिव्हीटी’ मिळत असल्याने आता ही समस्या सुटण्यास मदत झाली आहे.

शासनाने एप्रिलअखेर सर्व उताऱ्यांमध्ये दुरूस्ती करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी मध्यंतरीच्या काळात जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुका झाल्याने या कामातही तलाठीवर्ग गुंतला होता. त्यामुळे उर्वरित उताऱ्यांच्या दुरूस्तीचे काम एप्रिलअखेर पूर्ण करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर उभे आहे. (प्रतिनिधी)