शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

सर्प, विंचू, श्वानदंशाचे सात हजार रुग्ण

By admin | Updated: December 28, 2014 00:11 IST

जिल्हा परिषद : एकही रुग्ण दगावला नसल्याचा दावा

रहिम दलाल / रत्नागिरीजिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यामध्ये सर्पदंश, विंचूदंश आणि श्वानदंशाच्या एकूण ६०९७ घटना घडल्या़ मात्र, या दंश झालेल्या रुग्णांवर वेळीच उपचार करण्यात आल्याने जिल्ह्यात एकही रुग्ण दगावलेला नसल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे़ जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात विषारी विंचू, साप आढळून येतात़ साप, विंचू चावल्यानंतर काही वेळाच विष शरीरात भिनते़ त्यानंतर दंश केलेल्या व्यक्तीला मरणयातना सहन कराव्या लागतात़ दंश केलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार न झाल्यास तो दगावण्याची शक्यता जास्त असते़ विंचूदंशानंतर वेळीच वैद्यकीय उपचार होणे आवश्यक आहे़ ग्रामीण भागामध्ये अजूनही काही ठिकाणी वनस्पतीच्या आधारे विंचूदशांवर उपचार करण्यात येतो़ जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागामध्ये श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे़ शहरी भागात संबंधित नगर परिषदा आणि ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींकडून श्वानांची संख्या कमी करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत़ शहरी भागात श्वान टोळ्यांनी फिरताना दिसतात़ नवीन व्यक्ती दिसल्यास त्यांच्यावर हल्ला करतात़, तर जनावरांनाही श्वानांनी चावा घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत़ एप्रिल, २०१४ ते नोव्हेंबर, २०१४ या आठ महिन्यांच्या कालावधीमध्ये सर्पदंश ९६१, विंचूदंश २९८३ आणि श्वानदंशाच्या २१५३ अशा एकूण ६०९७ घटना जिल्ह्यात घडल्या आहेत़ पावसाळ्यानंतर भातशेती कापणीच्या वेळी विंचू, सरपटणारे प्राणी बाहेर पडण्याची संख्या मोठी असते. यावेळी शेतकऱ्यांना विंचूदंश, सर्पदंशाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कापणीच्या कालावधीत विंचू, सर्पदंशाचे रुग्ण मोठ्या संख्येने असतात. अशावेळी शासकीय रुग्णालयात असे रुण सर्रासपणे येत असतात.त्यासाठी उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विंचू, सर्प दंशावरील लस उपलब्ध आहे. त्यामुळे वेळीच उपचार करण्यात येत असल्याने जिल्ह्यात एकही रुग्ण दगावलेला नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान गेल्या काही वर्षात जिल्ह्यात सर्पदंश आणि विंचू तसेच श्वानदंशाचे प्रमाण वाढले आहे. सर्पदंशाचे प्रमाण त्यामानाने कमी असले तरी श्वान आणि विंचूदंशाचे प्रमाण रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात जास्त असल्याचे दिसून येत आहे.