शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

सर्प, विंचू, श्वानदंशाचे सात हजार रुग्ण

By admin | Updated: December 28, 2014 00:11 IST

जिल्हा परिषद : एकही रुग्ण दगावला नसल्याचा दावा

रहिम दलाल / रत्नागिरीजिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यामध्ये सर्पदंश, विंचूदंश आणि श्वानदंशाच्या एकूण ६०९७ घटना घडल्या़ मात्र, या दंश झालेल्या रुग्णांवर वेळीच उपचार करण्यात आल्याने जिल्ह्यात एकही रुग्ण दगावलेला नसल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे़ जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात विषारी विंचू, साप आढळून येतात़ साप, विंचू चावल्यानंतर काही वेळाच विष शरीरात भिनते़ त्यानंतर दंश केलेल्या व्यक्तीला मरणयातना सहन कराव्या लागतात़ दंश केलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार न झाल्यास तो दगावण्याची शक्यता जास्त असते़ विंचूदंशानंतर वेळीच वैद्यकीय उपचार होणे आवश्यक आहे़ ग्रामीण भागामध्ये अजूनही काही ठिकाणी वनस्पतीच्या आधारे विंचूदशांवर उपचार करण्यात येतो़ जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागामध्ये श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे़ शहरी भागात संबंधित नगर परिषदा आणि ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींकडून श्वानांची संख्या कमी करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत़ शहरी भागात श्वान टोळ्यांनी फिरताना दिसतात़ नवीन व्यक्ती दिसल्यास त्यांच्यावर हल्ला करतात़, तर जनावरांनाही श्वानांनी चावा घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत़ एप्रिल, २०१४ ते नोव्हेंबर, २०१४ या आठ महिन्यांच्या कालावधीमध्ये सर्पदंश ९६१, विंचूदंश २९८३ आणि श्वानदंशाच्या २१५३ अशा एकूण ६०९७ घटना जिल्ह्यात घडल्या आहेत़ पावसाळ्यानंतर भातशेती कापणीच्या वेळी विंचू, सरपटणारे प्राणी बाहेर पडण्याची संख्या मोठी असते. यावेळी शेतकऱ्यांना विंचूदंश, सर्पदंशाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कापणीच्या कालावधीत विंचू, सर्पदंशाचे रुग्ण मोठ्या संख्येने असतात. अशावेळी शासकीय रुग्णालयात असे रुण सर्रासपणे येत असतात.त्यासाठी उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विंचू, सर्प दंशावरील लस उपलब्ध आहे. त्यामुळे वेळीच उपचार करण्यात येत असल्याने जिल्ह्यात एकही रुग्ण दगावलेला नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान गेल्या काही वर्षात जिल्ह्यात सर्पदंश आणि विंचू तसेच श्वानदंशाचे प्रमाण वाढले आहे. सर्पदंशाचे प्रमाण त्यामानाने कमी असले तरी श्वान आणि विंचूदंशाचे प्रमाण रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात जास्त असल्याचे दिसून येत आहे.