शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामात साडेसात हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:33 IST

- भातलागवडीला प्राधान्य लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी शेती लागवडीकडे लक्ष केंद्रित केले होते. खरीप ...

- भातलागवडीला प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी शेती लागवडीकडे लक्ष केंद्रित केले होते. खरीप हंगामात पावसावर अवलंबून शेती केली जात असली तरी रब्बी हंगामातील शेतीकडे आता शेतकरी वळले आहे. यावर्षी रब्बी हंगामात जिल्ह्यातील साडेचार हजार शेतकऱ्यांमुळे साडेसात हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत लागवड क्षेत्रात वाढ झाली असून रब्बी हंगामात भात लागवड प्राधान्याने करण्यात आली आहे. संगमेश्वर, दापोली, खेड आणि गुहागर तालुक्यांत लागवड करण्यात आली असून यावर्षी जिल्ह्यात १५ टक्के क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असले तरी शेतीच्या कामासाठी मात्र कोणतेही अडसर येत नाहीत. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. रब्बी हंगामातील लागवडीबाबत असलेली उदासीनता झटकून चार हजार ५३८ शेतकऱ्यांनी सात हजार ५९० हेक्टर क्षेत्रावर लागवड केली आहे.

गतवर्षी चांगला पाऊस झाला. नोव्हेंबरपर्यत पाऊस होता. शिवाय अधूनमधून अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बहुतांश गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी बऱ्यापैकी आहे. उन्हाळी शेतीसाठी पाण्याची चांगली उपलब्धता असल्याने शेतकऱ्यांनी लागवडीकडे लक्ष केंद्रित केले आहे. याशिवाय शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांना शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. शेतीसाठी अवजारे, मजुरांची उपलब्धता यांवर मात करताना सामूहिक शेतीकडे कल वाढला आहे.

खरीप हंगामात शेती प्राधान्याने केली जात असली तरी रब्बी हंगामात शेतीसाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून प्रोत्साहित करण्यात येत आहे. त्यासाठी कृषी विभागाकडील विविध योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहेत. बियाण्यांसाठी अनुदान, यांत्रिकीसाठी प्रोत्साहन, सिंचनाच्या योजनांची अंमलबजावणी प्राधान्याने करण्यात येत आहे. गतवर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर अनेक मुंबईकर शेतीकडे वळले. नोकरी, रोजगार गमावल्यामुळे खरिपातील शेतीसाठी अनेक लोक गावीच राहिले. यावर्षीही रब्बीमध्ये शेतकऱ्यांनी लागवडीला प्राधान्य दिले असल्यानेच लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील चार हजार ५३८ शेतकऱ्यांनी सात हजार ५९० हेक्टर क्षेत्रावर लागवड केली आहे. संगमेश्वर, दापोली, खेड आणि गुहागर तालुक्यांत सर्वाधिक लागवड केली आहे. शेतकऱ्यांनी विशेषत: भातलागवडीवर भर दिला आहे. १५ टक्के क्षेत्रावर भात लागवड असून उर्वरित क्षेत्रावर भाजीपाला, कलिंगडाची लागवड करण्यात आली आहे.

कोट घ्यावा :

कोकणातील शेतकरी बारमाही शेतीकडे वळू लागले आहेत. जिल्ह्यात भाजीपाला, कडधान्य, फळभाज्यांसह भात लागवड रब्बीत करू लागले आहेत. शेतकऱ्यांसाठी बियाणे, त्यासाठी अनुदान, सवलतीच्या योजना, कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचाही त्यासाठी चांगला प्रतिसाद लाभत असल्याने रब्बीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.

- शिवराज घोरपडे, जिल्हा कृषी अधीक्षक, रत्नागिरी.