शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
6
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
7
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
8
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
9
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
10
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
11
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
12
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
13
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
14
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
15
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
16
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
17
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
18
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
19
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
20
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...

रब्बी हंगामात साडेसात हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:33 IST

- भातलागवडीला प्राधान्य लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी शेती लागवडीकडे लक्ष केंद्रित केले होते. खरीप ...

- भातलागवडीला प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी शेती लागवडीकडे लक्ष केंद्रित केले होते. खरीप हंगामात पावसावर अवलंबून शेती केली जात असली तरी रब्बी हंगामातील शेतीकडे आता शेतकरी वळले आहे. यावर्षी रब्बी हंगामात जिल्ह्यातील साडेचार हजार शेतकऱ्यांमुळे साडेसात हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत लागवड क्षेत्रात वाढ झाली असून रब्बी हंगामात भात लागवड प्राधान्याने करण्यात आली आहे. संगमेश्वर, दापोली, खेड आणि गुहागर तालुक्यांत लागवड करण्यात आली असून यावर्षी जिल्ह्यात १५ टक्के क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असले तरी शेतीच्या कामासाठी मात्र कोणतेही अडसर येत नाहीत. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. रब्बी हंगामातील लागवडीबाबत असलेली उदासीनता झटकून चार हजार ५३८ शेतकऱ्यांनी सात हजार ५९० हेक्टर क्षेत्रावर लागवड केली आहे.

गतवर्षी चांगला पाऊस झाला. नोव्हेंबरपर्यत पाऊस होता. शिवाय अधूनमधून अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बहुतांश गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी बऱ्यापैकी आहे. उन्हाळी शेतीसाठी पाण्याची चांगली उपलब्धता असल्याने शेतकऱ्यांनी लागवडीकडे लक्ष केंद्रित केले आहे. याशिवाय शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांना शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. शेतीसाठी अवजारे, मजुरांची उपलब्धता यांवर मात करताना सामूहिक शेतीकडे कल वाढला आहे.

खरीप हंगामात शेती प्राधान्याने केली जात असली तरी रब्बी हंगामात शेतीसाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून प्रोत्साहित करण्यात येत आहे. त्यासाठी कृषी विभागाकडील विविध योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहेत. बियाण्यांसाठी अनुदान, यांत्रिकीसाठी प्रोत्साहन, सिंचनाच्या योजनांची अंमलबजावणी प्राधान्याने करण्यात येत आहे. गतवर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर अनेक मुंबईकर शेतीकडे वळले. नोकरी, रोजगार गमावल्यामुळे खरिपातील शेतीसाठी अनेक लोक गावीच राहिले. यावर्षीही रब्बीमध्ये शेतकऱ्यांनी लागवडीला प्राधान्य दिले असल्यानेच लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील चार हजार ५३८ शेतकऱ्यांनी सात हजार ५९० हेक्टर क्षेत्रावर लागवड केली आहे. संगमेश्वर, दापोली, खेड आणि गुहागर तालुक्यांत सर्वाधिक लागवड केली आहे. शेतकऱ्यांनी विशेषत: भातलागवडीवर भर दिला आहे. १५ टक्के क्षेत्रावर भात लागवड असून उर्वरित क्षेत्रावर भाजीपाला, कलिंगडाची लागवड करण्यात आली आहे.

कोट घ्यावा :

कोकणातील शेतकरी बारमाही शेतीकडे वळू लागले आहेत. जिल्ह्यात भाजीपाला, कडधान्य, फळभाज्यांसह भात लागवड रब्बीत करू लागले आहेत. शेतकऱ्यांसाठी बियाणे, त्यासाठी अनुदान, सवलतीच्या योजना, कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचाही त्यासाठी चांगला प्रतिसाद लाभत असल्याने रब्बीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.

- शिवराज घोरपडे, जिल्हा कृषी अधीक्षक, रत्नागिरी.