शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

पाणी चाेरी राेखण्यासाठी स्वतंत्र पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:32 IST

राजापूर : वाढत्या उष्म्यामुळे राजापूर शहराला पाणीटंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. त्यातून, पाणीपुरवठ्याच्या वेळेमध्ये नगरपरिषदेने कपात केली असून, गेले ...

राजापूर : वाढत्या उष्म्यामुळे राजापूर शहराला पाणीटंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. त्यातून, पाणीपुरवठ्याच्या वेळेमध्ये नगरपरिषदेने कपात केली असून, गेले काही दिवसांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठाही सुरू केला आहे. मात्र, यामध्ये अवैधरीत्या होणारी पाणी चोरी प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. या पाणी चोरीच्या विरोधात नगरपरिषदेने आक्रमक पवित्रा घेतला असून, त्याच्यावर ‘वॉच’ ठेवण्यासाठी स्वतंत्र पथकही स्थापन केले आहे.

गेले काही दिवसांपासून हवेतील उष्मा कमालीचा वाढला आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम होऊन भूगर्भातील पाणीसाठे खालावू लागले आहेत. ब्रिटिशांच्या काळामध्ये बांधण्यात आलेले सायबाचे धरण गेल्या कित्येक वर्षांपासून राजापूरकरांची तहान भागवीत आहे. या धरणाच्या साठ्यावर वाढत्या उष्म्याचा प्रतिकूल परिणाम होऊन तेथील पाणीसाठा गेल्या काही दिवसांमध्ये खालावला आहे. त्यातून, तेथून होणारा पाणीपुरवठा अनियमित झाला आहे. त्यातून, खालावलेल्या पाणीपुरवठ्यामुळे नगरपरिषदेतर्फे सद्य:स्थितीमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यातच, पाणीटंचाईची वाढती स्थिती आणि विस्कळीतपणा लक्षात घेऊन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून टँकरचीही तयारी करण्यात आली आहे.

वाढत्या उष्म्म्याची झळ पोहाेचून एकदिवसाआड शहरामध्ये होत असलेल्या पाणीपुरवठ्यामध्ये विविध भागांमध्ये होणारी पाणी चोरी नगरपरिषदेची प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे. एप्रिल-मे महिन्यांतील पाणीटंचाई जशी शहरवासीयांची दरवर्षीची डोकेदुखी आहे तशी टंचाईच्या काळात होणारी पाणीचोरीही दरवर्षीची डोकेदुखी आहे. या पाणी चोरीच्या विरोधात नगरपरिषदेने यापूर्वी धडक कारवाई करताना पाणी चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेले पंप जप्त करण्याची कारवाई केली आहे. त्याप्रमाणेही प्रशासनाने पाणी चोरीच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाणी चोरीवर वॉच ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथकही स्थापन करण्यात आले आहे. त्याद्वारे प्रशासनाने पाणी चोरी करणाऱ्यांना पाणी चोरी थांबवा, अन्यथा धडक कारवाईला सामोरे जा असा इशारा दिला आहे.