शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

पाणी चाेरी राेखण्यासाठी स्वतंत्र पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:32 IST

राजापूर : वाढत्या उष्म्यामुळे राजापूर शहराला पाणीटंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. त्यातून, पाणीपुरवठ्याच्या वेळेमध्ये नगरपरिषदेने कपात केली असून, गेले ...

राजापूर : वाढत्या उष्म्यामुळे राजापूर शहराला पाणीटंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. त्यातून, पाणीपुरवठ्याच्या वेळेमध्ये नगरपरिषदेने कपात केली असून, गेले काही दिवसांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठाही सुरू केला आहे. मात्र, यामध्ये अवैधरीत्या होणारी पाणी चोरी प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. या पाणी चोरीच्या विरोधात नगरपरिषदेने आक्रमक पवित्रा घेतला असून, त्याच्यावर ‘वॉच’ ठेवण्यासाठी स्वतंत्र पथकही स्थापन केले आहे.

गेले काही दिवसांपासून हवेतील उष्मा कमालीचा वाढला आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम होऊन भूगर्भातील पाणीसाठे खालावू लागले आहेत. ब्रिटिशांच्या काळामध्ये बांधण्यात आलेले सायबाचे धरण गेल्या कित्येक वर्षांपासून राजापूरकरांची तहान भागवीत आहे. या धरणाच्या साठ्यावर वाढत्या उष्म्याचा प्रतिकूल परिणाम होऊन तेथील पाणीसाठा गेल्या काही दिवसांमध्ये खालावला आहे. त्यातून, तेथून होणारा पाणीपुरवठा अनियमित झाला आहे. त्यातून, खालावलेल्या पाणीपुरवठ्यामुळे नगरपरिषदेतर्फे सद्य:स्थितीमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यातच, पाणीटंचाईची वाढती स्थिती आणि विस्कळीतपणा लक्षात घेऊन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून टँकरचीही तयारी करण्यात आली आहे.

वाढत्या उष्म्म्याची झळ पोहाेचून एकदिवसाआड शहरामध्ये होत असलेल्या पाणीपुरवठ्यामध्ये विविध भागांमध्ये होणारी पाणी चोरी नगरपरिषदेची प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे. एप्रिल-मे महिन्यांतील पाणीटंचाई जशी शहरवासीयांची दरवर्षीची डोकेदुखी आहे तशी टंचाईच्या काळात होणारी पाणीचोरीही दरवर्षीची डोकेदुखी आहे. या पाणी चोरीच्या विरोधात नगरपरिषदेने यापूर्वी धडक कारवाई करताना पाणी चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेले पंप जप्त करण्याची कारवाई केली आहे. त्याप्रमाणेही प्रशासनाने पाणी चोरीच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाणी चोरीवर वॉच ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथकही स्थापन करण्यात आले आहे. त्याद्वारे प्रशासनाने पाणी चोरी करणाऱ्यांना पाणी चोरी थांबवा, अन्यथा धडक कारवाईला सामोरे जा असा इशारा दिला आहे.