शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

पाणी चाेरी राेखण्यासाठी स्वतंत्र पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:32 IST

राजापूर : वाढत्या उष्म्यामुळे राजापूर शहराला पाणीटंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. त्यातून, पाणीपुरवठ्याच्या वेळेमध्ये नगरपरिषदेने कपात केली असून, गेले ...

राजापूर : वाढत्या उष्म्यामुळे राजापूर शहराला पाणीटंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. त्यातून, पाणीपुरवठ्याच्या वेळेमध्ये नगरपरिषदेने कपात केली असून, गेले काही दिवसांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठाही सुरू केला आहे. मात्र, यामध्ये अवैधरीत्या होणारी पाणी चोरी प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. या पाणी चोरीच्या विरोधात नगरपरिषदेने आक्रमक पवित्रा घेतला असून, त्याच्यावर ‘वॉच’ ठेवण्यासाठी स्वतंत्र पथकही स्थापन केले आहे.

गेले काही दिवसांपासून हवेतील उष्मा कमालीचा वाढला आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम होऊन भूगर्भातील पाणीसाठे खालावू लागले आहेत. ब्रिटिशांच्या काळामध्ये बांधण्यात आलेले सायबाचे धरण गेल्या कित्येक वर्षांपासून राजापूरकरांची तहान भागवीत आहे. या धरणाच्या साठ्यावर वाढत्या उष्म्याचा प्रतिकूल परिणाम होऊन तेथील पाणीसाठा गेल्या काही दिवसांमध्ये खालावला आहे. त्यातून, तेथून होणारा पाणीपुरवठा अनियमित झाला आहे. त्यातून, खालावलेल्या पाणीपुरवठ्यामुळे नगरपरिषदेतर्फे सद्य:स्थितीमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यातच, पाणीटंचाईची वाढती स्थिती आणि विस्कळीतपणा लक्षात घेऊन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून टँकरचीही तयारी करण्यात आली आहे.

वाढत्या उष्म्म्याची झळ पोहाेचून एकदिवसाआड शहरामध्ये होत असलेल्या पाणीपुरवठ्यामध्ये विविध भागांमध्ये होणारी पाणी चोरी नगरपरिषदेची प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे. एप्रिल-मे महिन्यांतील पाणीटंचाई जशी शहरवासीयांची दरवर्षीची डोकेदुखी आहे तशी टंचाईच्या काळात होणारी पाणीचोरीही दरवर्षीची डोकेदुखी आहे. या पाणी चोरीच्या विरोधात नगरपरिषदेने यापूर्वी धडक कारवाई करताना पाणी चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेले पंप जप्त करण्याची कारवाई केली आहे. त्याप्रमाणेही प्रशासनाने पाणी चोरीच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाणी चोरीवर वॉच ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथकही स्थापन करण्यात आले आहे. त्याद्वारे प्रशासनाने पाणी चोरी करणाऱ्यांना पाणी चोरी थांबवा, अन्यथा धडक कारवाईला सामोरे जा असा इशारा दिला आहे.