शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले
2
“१५ मिनिटे सत्ता द्या, पाकिस्तानला कसे नेस्तनाबूत करायचे ते दाखवून देऊ”; AIMIM नेते आक्रमक
3
पाकिस्तानची फजिती! अर्थ व्यवहार मंत्रालयाचे अकाऊंट हॅक; 'त्या' पोस्टने वेधून घेतलं जगाचं लक्ष
4
"देशात परिस्थिती काय अन् हा बावळट...", किंग कोहलीच्या भावाने राहुल वैद्यला सुनावलं
5
हाय अलर्ट! चंदीगड-अंबालामध्ये पुन्हा वाजले सायरन, नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना
6
Operation Sindoor Live Updates: भारतात घुसखोरी करणाऱ्या ७ दहशतवाद्यांना BSF जवानांनी ठार केले
7
'कराची बेकरी' पाकिस्तानी ब्रँड आहे का? कोणी केली सुरुवात? का दिलं असं नाव? हा इतिहास माहितीच हवा
8
आधारमधील तुमचा मोबाईल नंबर ऑनलाइन कसा बदलायचा? घरबसल्या २ मिनिटांत होईल काम
9
India-Pakistan War: सैन्य कारवाईवेळी घराचं नुकसान झाल्यास केंद्र सरकार किती पैसे देते?
10
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
11
२३ वर्षांनी अमेरिकन पत्रकाराला मिळाला न्याय; भारतानं पाकिस्तानवर हल्ला करत घेतला बदला
12
सीमेपासून समुद्रापर्यंत... भारताचे नियोजन पाहून पाकिस्तानला भरली धडकी!
13
"शत्रूला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली...", मधुगंधा कुलकर्णीची देशभक्तीवरील पोस्ट चर्चेत
14
"माझी गरज लागली तर मी बॉर्डरवर जाऊन युद्ध लढण्यासाठी तयार", प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
15
Video: ब्लॅकआऊट वेळी लाईट बंद न करणाऱ्या दुकानदारावर भडकले आजोबा; टाळक्यात हाणली काठी
16
टीव्ही अभिनेत्याचं कुटुंब जम्मूमध्ये; रात्री घाबरुन पोस्ट करत म्हणाला, "मी देशाबाहेर..."
17
मोठी बातमी! ट्रान्स-हार्बर लोकल सेवा अनिश्चित काळासाठी बंद, तुर्भेजवळ गर्डर पडण्याचा धोका असल्याने खबरदारी
18
“पाकचा खात्मा करण्यास भारतीय सैन्याला यश मिळो”; गुवाहाटीत कामाख्या देवीला साकडे, विशेष पूजा
19
Stock Market Today: मोठ्या घसरणीसह उघडल्यानंतर शेअर बाजार स्थिरावला, निफ्टीमध्येही २०० अंकांची घसरण
20
IMF Bailout Package to Pakistan : रात्रभर मिसाईल्सनं ठोकलं, आता पाकिस्तानला उपाशी मारण्याची तयारी; ११ हजार कोटींची खैरात मिळणार नाही?

पाणी चाेरी राेखण्यासाठी स्वतंत्र पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:32 IST

राजापूर : वाढत्या उष्म्यामुळे राजापूर शहराला पाणीटंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. त्यातून, पाणीपुरवठ्याच्या वेळेमध्ये नगरपरिषदेने कपात केली असून, गेले ...

राजापूर : वाढत्या उष्म्यामुळे राजापूर शहराला पाणीटंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. त्यातून, पाणीपुरवठ्याच्या वेळेमध्ये नगरपरिषदेने कपात केली असून, गेले काही दिवसांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठाही सुरू केला आहे. मात्र, यामध्ये अवैधरीत्या होणारी पाणी चोरी प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. या पाणी चोरीच्या विरोधात नगरपरिषदेने आक्रमक पवित्रा घेतला असून, त्याच्यावर ‘वॉच’ ठेवण्यासाठी स्वतंत्र पथकही स्थापन केले आहे.

गेले काही दिवसांपासून हवेतील उष्मा कमालीचा वाढला आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम होऊन भूगर्भातील पाणीसाठे खालावू लागले आहेत. ब्रिटिशांच्या काळामध्ये बांधण्यात आलेले सायबाचे धरण गेल्या कित्येक वर्षांपासून राजापूरकरांची तहान भागवीत आहे. या धरणाच्या साठ्यावर वाढत्या उष्म्याचा प्रतिकूल परिणाम होऊन तेथील पाणीसाठा गेल्या काही दिवसांमध्ये खालावला आहे. त्यातून, तेथून होणारा पाणीपुरवठा अनियमित झाला आहे. त्यातून, खालावलेल्या पाणीपुरवठ्यामुळे नगरपरिषदेतर्फे सद्य:स्थितीमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यातच, पाणीटंचाईची वाढती स्थिती आणि विस्कळीतपणा लक्षात घेऊन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून टँकरचीही तयारी करण्यात आली आहे.

वाढत्या उष्म्म्याची झळ पोहाेचून एकदिवसाआड शहरामध्ये होत असलेल्या पाणीपुरवठ्यामध्ये विविध भागांमध्ये होणारी पाणी चोरी नगरपरिषदेची प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे. एप्रिल-मे महिन्यांतील पाणीटंचाई जशी शहरवासीयांची दरवर्षीची डोकेदुखी आहे तशी टंचाईच्या काळात होणारी पाणीचोरीही दरवर्षीची डोकेदुखी आहे. या पाणी चोरीच्या विरोधात नगरपरिषदेने यापूर्वी धडक कारवाई करताना पाणी चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेले पंप जप्त करण्याची कारवाई केली आहे. त्याप्रमाणेही प्रशासनाने पाणी चोरीच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाणी चोरीवर वॉच ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथकही स्थापन करण्यात आले आहे. त्याद्वारे प्रशासनाने पाणी चोरी करणाऱ्यांना पाणी चोरी थांबवा, अन्यथा धडक कारवाईला सामोरे जा असा इशारा दिला आहे.