शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

चिंताजनक, कोरोनाबाधित १५ रुग्णांच्या मृत्यूने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:33 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात प्रथमच २४ तासांत १५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. त्यामुळे मृतांची संख्या ४६४ झाली आहे, ...

रत्नागिरी : जिल्ह्यात प्रथमच २४ तासांत १५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. त्यामुळे मृतांची संख्या ४६४ झाली आहे, तर कोरोनाबाधितांची संख्या निम्म्यावर आली असून, सोमवारी २५९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकूण १५,८८९ कोरोनाबाधित झाले आहेत.

कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या वाढत असल्याने, चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये युवकांपासून ते वृद्धांपर्यंत व्यक्ती असल्याने आरोग्य यंत्रणेसमोर आवाहन उभे ठाकले आहे. वर्षभराच्या कालावधीत प्रथमच १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील ४ रुग्ण, खेडमधील ६ रुग्ण, गुहागरातील ३ रुग्ण आणि चिपळूण, राजापूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मृतांमध्ये ११ पुरुष आणि ४ महिला कोरोना रुग्ण आहेत. रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली असून, २.९२ टक्के आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आरटीपीसीआर चाचणीतील १४८ रुग्ण तर अँटिजन चाचणीतील १११ रुग्ण आहेत. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात साेमवारी पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची संख्या शून्य आहे, तर रत्नागिरी तालुक्यात ५३ रुग्ण, दापोलीत ४३, खेडमध्ये २२, गुहागरात ४, चिपळुणात ६३, संगमेश्वरमध्ये ५४, लांजात ५ आणि राजापुरात १५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण मिळण्याचे प्रमाण १२.१६ टक्के असून, रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७६.९१ टक्के आहे.