शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सेनेचा रिमोट रत्नागिरीत?

By admin | Updated: March 24, 2017 00:26 IST

सेनेचा रिमोट रत्नागिरीत?

निष्ठावंतांची दैना : जिल्हा शिवसेनेत असंतोषाचे वादळ$$्निरत्नागिरी : जिल्हा परिषदेत गटनेता व अध्यक्षपदाचा मान रत्नागिरी तालुक्याला मिळाला. जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्या पत्नी रचना महाडिक यांच्या अध्यक्षपदाच्या मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली. त्यामुळे जिल्हा शिवसेनेचा रिमोट ‘मातोश्री’वरूनच रत्नागिरीच्या नेत्यांकडे दिला गेला आहे काय, या चर्चेला उधाण आले आहे. परिणामी ‘सेनेतील निष्ठावंतांची दैना आणि त्यांचे म्हणणे वरिष्ठांना ऐकू येईना’, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जिल्हा शिवसेनेत असंतोषाचे वादळ घोंगावत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. रत्नागिरी नगरपरिषदेत सेनेची एकहाती सत्ता आणल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीतही रत्नागिरी तालुक्यातील सर्व जागांवर सेनेला विजय मिळाला. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील आमदार उदय सामंत व पदाधिकाऱ्यांचे जिल्हा शिवसेनेतील वजन वाढले आहे. जिल्हा परिषदेत सेनेचा गटनेता व आता जिल्हा परिषद अध्यक्षपदही रत्नागिरी तालुक्यालाच मिळाले आहे. जिल्हाप्रमुखांच्या मागणीलाही सेनेच्या वरिष्ठांनी केराची टोपली दाखवत रत्नागिरीला झुकते माप दिल्याने जिल्हा शिवसेनेवर रत्नागिरी तालुक्याचे वर्चस्व निर्माण झाले आहे. त्यामुळे जिल्हा सेनेतील अनेक नेते मंडळी धास्तावली आहेत.जिल्हा शिवसेनेत असलेल्या काहीजणांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी केलेल्या काही चुका आता त्यांना भोवत असून, त्यामुळेच काही बोलक्या नेत्यांची तोंडे बंद झाली आहेत. संघटनेत तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी स्थिती झालेल्या या नेत्यांनी आपल्याच पायावर धोंडा मारून घेतल्याची चर्चाही जोरात आहे. (प्रतिनिधी)