शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
4
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
5
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
6
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
7
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
8
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
9
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
10
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
11
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
12
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
13
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
14
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
15
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
16
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
17
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
18
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
19
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
20
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?

स्वबळ, अपक्षांमुळे उमेदवार वाढले

By admin | Updated: October 30, 2016 23:45 IST

निवडणुकीची धामधूम : अपक्ष उमेदवारांचा भाव वधारणार; अर्ज मागे घेण्यासाठी ‘गळ’

रत्नागिरी : जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण, खेड आणि राजापूर नगर परिषदांबरोबरच दापोली नगरपंचायतीसाठी निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. जिल्हाभरातील एकूण १०७ जागांसाठी ४७३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यात युतीची बोलणी फिसकटल्याने शिवसेना - भाजप हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरले आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारांची संख्या वाढली आहे, तर अपक्ष उमेदवारांचाही अधिक भरणा असल्याचे दिसत आहे. ६९ अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केल्याने अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अपक्षांना माघार घेण्यासाठी गळ घालण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणुकीत अपक्षांचा भाव चांगलाच वधारणार असल्याचे दिसत आहे. ऐन दिवाळीतच निवडणूक जाहीर झाल्याने फटाके जोरात फुटू लागले आहेत. या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने उमेदवारांची भाऊगर्दी झाली आहे. त्यातच जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने उमेदवारांची संख्या दुप्पट झाली आहे. या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार उभे करून एकमेकांसमोर आव्हान उभे केले आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सावध भूमिका घेत आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या उमेदवारांची संख्या फारसी वाढणार नसल्याचे दिसत आहे. चिपळूणमध्ये मात्र आघाडीची बोलणी फिसकटल्याने दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले आहेत. एरव्ही निवडणुकीच्या रिंगणात हे चारही पक्ष युती आणि आघाडी करून उतरत असल्याने पक्षांच्या उमेदवारांची संख्या तुलनेने कमी असते. त्यात अपक्षांचा भरणा मात्र अधिक असतो. यावेळेला मात्र सेना, भाजपच्या उमेदवारांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात १०७ जागांसाठी निवडणूक होत असून, रत्नागिरीत ३०, चिपळूणमध्ये २६ आणि खेड, राजापूर, दापोली येथे प्रत्येकी १७ जागांसाठी निवडणूक लढविली जाणार आहे. रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर आणि दापोलीत सर्व जागांवर सेनेने उमेदवार उभे केले आहेत. भाजपने रत्नागिरी, चिपळूण, राजापूर आणि दापोलीत उमेदवार केले आहेत, तर खेडमध्ये १५ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादीने रत्नागिरीत २५, चिपळुणात २७, खेडमध्ये मनसेसोबत २५, राजापुरात ४, तर दापोलीत ११ उमेदवार उभे केल्याचे दिसत आहे. काँग्रेसने रत्नागिरीत ६, चिपळुणात २२, खेडमध्ये ८, राजापुरात १४ आणि दापोलीत ६ उमेदवार उभे केल्याचे दिसत आहे. या प्रमुख पक्षांबरोबरच रत्नागिरीत २६, चिपळुणात ६, राजापुरात १५ आणि दापोलीत ३९ उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यामुळे प्रमुख पक्षांबरोबरच अपक्षांची संख्यादेखील वाढल्याचे दिसत आहे. यामध्ये कितीजण इतर पक्षांच्या गळाला लागून उमेदवारी मागे घेतात ते लवकरच स्पष्ट होईल. रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, खेड, दापोली या पाचही ठिकाणी सेना, भाजपचे स्वतंत्र उमेदवार उभे असल्याने दोन्ही पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. युती न करता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या या पक्षांना कोण किती पाण्यात आहे, हे निवडणूक निकालानंतर कळणार आहे. चिपळूणमध्ये या दोन्ही पक्षांबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी निवडणूक महत्त्वाची आहे. खेडमध्ये मनसेची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. राजापूरमध्ये शिवसेनेबरोबरच काँग्रेस पक्षाची कसोटी पणाला लागणार आहे. त्यामुळे कोणते पक्ष बाजी मारतात, ते लवकरच कळणार आहे. (प्रतिनिधी)