शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

चिपळुणात वणवामुक्त गाव स्पर्धेसाठी १६ गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:32 IST

अडरे : चिपळूणमधे यावर्षी वणवामुक्त कोकण संघटनेच्या माध्यमातून कोकणातील वणव्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. या मोहिमेचा ...

अडरे : चिपळूणमधे यावर्षी वणवामुक्त कोकण संघटनेच्या माध्यमातून कोकणातील वणव्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून ‘वणवामुक्त गाव’ ही स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. यावर्षी चिपळूण परिसरातील १६ गावांना या स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक २५ हजार, द्वितीय क्रमांक १५ हजार, तृतीय क्रमांक १० हजार व उत्तेजनार्थ प्रत्येकी ५ हजाराची २ बक्षिसे तसेच प्रमाणपत्र व चषक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ही बक्षिसे गावाच्या उपयोगाच्या वस्तू स्वरुपात १५ ऑगस्ट राेजी एका विशेष कार्यक्रमात देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी टेरव, खेर्डी, कळंबस्ते, धामणवणे, कापसाळ, कामथे, कळवंडे, धामणदेवी, पेढे, परशुराम, मिरजोळी, वालोटी, शिरळ, भागाडी, पाचाड, कालुस्ते ही १६ गावे निवडण्यात आली आहेत.

या स्पर्धेसाठी गावात पावसाळ्यापर्यंत वणवा न लागणे, वणवा लागू नये म्हणून गावाने केलेले प्रयत्न, वणवा लागलाच तर तो विझवला किंवा विझवण्याचा प्रयत्न केला, वणवामुक्त गाव संकल्पनेबाबत जनजागृती इत्यादी बाबींचा विचार करून विजेते ठरवण्यात येतील. वणव्यामुळे वनस्पती, प्राणी, पक्षी यांची अपरिमित हानी होते. तसेच तापमानात वाढ होते व मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. हे सर्व थांबावे, यासाठी वणवामुक्त कोकण समिती विविध प्रकारे प्रयत्न करत आहे.

चाैकट

वणवामुक्त कोकण समितीचे सभासद स्वतंत्रपणे एका गावाची जबाबदारी घेऊन वरील उपक्रमाबाबत संपूर्ण माहिती घेईल व अहवाल समितीला सादर करील. या कामामध्ये गावातील सरपंच, पोलीसपाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष, ग्रामसेवक या सर्वांचे मार्गदर्शन व सहकार्य घेतले जाईल. या स्पर्धेसाठी एक विशेष समिती नेमण्यात आली आहे. ही समिती सर्व गावांची माहिती अभ्यासून अंतिम निर्णय घेईल.

काेट

संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे. अनेक गावांमध्ये लागलेले वणवे ग्रामस्थांच्या मदतीने विझवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोळा गावातील पदाधिकारी व नागरिक यांनी आपला गाव वणवामुक्त राहील, याची काळजी घेऊन ‘वणवामुक्त गाव’ स्पर्धेत सहभागी व्हावे.

- रामशेठ रेडीज, अध्यक्ष, वणवामुक्त गाव