शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

बियाण्यावरील अनुदान केले रद्द

By admin | Updated: June 17, 2015 00:39 IST

गेले ते ‘अच्छे दिन’ : शेतकऱ्यांनी पेरले जुनेच बियाणे

शिवाजी गोरे - दापोलीकोकणातील शेतकऱ्याला भात बियाणे खरेदीत ७५ टक्के सुट आघाडी सरकारच्या काळात दिली जात होती. मात्र नवीन सरकारने सबसीडी बंद केल्यामुळे कोकणातील शेतकऱ्याला १०० टक्के रक्कम मोजण्याची वेळ आली असून सरकारने भात बियाण्याची सबसिडी रद्द केल्यामुळे वाढत्या महागाईमुळे महाग बियाणे खरेदी करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी चक्क गेल्या वर्षीचे जुने बियाण्याची पेरणी केल्यामुळे यंदा भात उत्पादन घटण्याची भिती व्यक्त होत आहे.कोकणातील शेतकऱ्याला दिलासा म्हणून आघाडी सरकारच्या काळात दरवर्षी शेतकऱ्याला भात बियाण्यावर सबसिडी देण्यात येत होती. परंतु आघाडी सरकार पाय उतार होवून शिवसेना - भाजपाचे सरकार सत्तेत आले आहे. या सरकारकडून शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळेल अशी अपेक्षा होती. केंद्रात मोदी सरकारने अच्छे दिनचे स्वप्न दाखविल्यामुळे राज्यातील भाजपा सरकारकडून कोकणातील शेतकऱ्यासाठी ठोस निर्णय होवून भरघोस मदत मिळेल असे वाटत असतानाच भाजपा महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांना मिळणारी भात बियाणे सबसिडी रद्द करुन चांगलेच कंबरडे मोडले आहे.कोकणातील गरीब व छोटा शेतकरी उदरनिर्वाहासाठी भातशेती करीत आहे. भातपीक सध्या परवडत नसून भाताचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्याला सरकारच्या मदतीची गरज आहे. आधीच भातशेतीसमोर मोठमोठी आव्हाने उभी असताना दुसरीकडे शेतकऱ्यांना भातबियाण्यांवर देण्यात येणारे अनुदानही बंद केल्याने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.उत्पन्नात घट होणार ?वाढत्या महागाईमुळे गरीब शेतकऱ्याला भाताचे बियाणे खरेदी करणे कठीण झाले आहे. त्यातच सबसिडी रद्द केल्यामुळे शेतकऱ्यानी जुने बियाणे पेरले आहे. हे बियाणे उगवलं तर उत्पादनात घट होईल. त्याला सरकार जबाबदार असेल. कोकणातील शेतकऱ्यावर हा अन्याय आहे. अच्छे दिन हेच का? जर शेतकऱ्यांचाच कणा मोडला जात असेल तर भविष्यात शेती कोण करेल ?- संजय कदम, आमदार