शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
6
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
7
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
8
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
9
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
10
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
11
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
12
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
13
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
14
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
15
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
16
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
17
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
18
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
19
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
20
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

बियाण्यावरील अनुदान केले रद्द

By admin | Updated: June 17, 2015 00:39 IST

गेले ते ‘अच्छे दिन’ : शेतकऱ्यांनी पेरले जुनेच बियाणे

शिवाजी गोरे - दापोलीकोकणातील शेतकऱ्याला भात बियाणे खरेदीत ७५ टक्के सुट आघाडी सरकारच्या काळात दिली जात होती. मात्र नवीन सरकारने सबसीडी बंद केल्यामुळे कोकणातील शेतकऱ्याला १०० टक्के रक्कम मोजण्याची वेळ आली असून सरकारने भात बियाण्याची सबसिडी रद्द केल्यामुळे वाढत्या महागाईमुळे महाग बियाणे खरेदी करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी चक्क गेल्या वर्षीचे जुने बियाण्याची पेरणी केल्यामुळे यंदा भात उत्पादन घटण्याची भिती व्यक्त होत आहे.कोकणातील शेतकऱ्याला दिलासा म्हणून आघाडी सरकारच्या काळात दरवर्षी शेतकऱ्याला भात बियाण्यावर सबसिडी देण्यात येत होती. परंतु आघाडी सरकार पाय उतार होवून शिवसेना - भाजपाचे सरकार सत्तेत आले आहे. या सरकारकडून शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळेल अशी अपेक्षा होती. केंद्रात मोदी सरकारने अच्छे दिनचे स्वप्न दाखविल्यामुळे राज्यातील भाजपा सरकारकडून कोकणातील शेतकऱ्यासाठी ठोस निर्णय होवून भरघोस मदत मिळेल असे वाटत असतानाच भाजपा महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांना मिळणारी भात बियाणे सबसिडी रद्द करुन चांगलेच कंबरडे मोडले आहे.कोकणातील गरीब व छोटा शेतकरी उदरनिर्वाहासाठी भातशेती करीत आहे. भातपीक सध्या परवडत नसून भाताचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्याला सरकारच्या मदतीची गरज आहे. आधीच भातशेतीसमोर मोठमोठी आव्हाने उभी असताना दुसरीकडे शेतकऱ्यांना भातबियाण्यांवर देण्यात येणारे अनुदानही बंद केल्याने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.उत्पन्नात घट होणार ?वाढत्या महागाईमुळे गरीब शेतकऱ्याला भाताचे बियाणे खरेदी करणे कठीण झाले आहे. त्यातच सबसिडी रद्द केल्यामुळे शेतकऱ्यानी जुने बियाणे पेरले आहे. हे बियाणे उगवलं तर उत्पादनात घट होईल. त्याला सरकार जबाबदार असेल. कोकणातील शेतकऱ्यावर हा अन्याय आहे. अच्छे दिन हेच का? जर शेतकऱ्यांचाच कणा मोडला जात असेल तर भविष्यात शेती कोण करेल ?- संजय कदम, आमदार