शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

बियाण्यावरील अनुदान केले रद्द

By admin | Updated: June 17, 2015 00:39 IST

गेले ते ‘अच्छे दिन’ : शेतकऱ्यांनी पेरले जुनेच बियाणे

शिवाजी गोरे - दापोलीकोकणातील शेतकऱ्याला भात बियाणे खरेदीत ७५ टक्के सुट आघाडी सरकारच्या काळात दिली जात होती. मात्र नवीन सरकारने सबसीडी बंद केल्यामुळे कोकणातील शेतकऱ्याला १०० टक्के रक्कम मोजण्याची वेळ आली असून सरकारने भात बियाण्याची सबसिडी रद्द केल्यामुळे वाढत्या महागाईमुळे महाग बियाणे खरेदी करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी चक्क गेल्या वर्षीचे जुने बियाण्याची पेरणी केल्यामुळे यंदा भात उत्पादन घटण्याची भिती व्यक्त होत आहे.कोकणातील शेतकऱ्याला दिलासा म्हणून आघाडी सरकारच्या काळात दरवर्षी शेतकऱ्याला भात बियाण्यावर सबसिडी देण्यात येत होती. परंतु आघाडी सरकार पाय उतार होवून शिवसेना - भाजपाचे सरकार सत्तेत आले आहे. या सरकारकडून शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळेल अशी अपेक्षा होती. केंद्रात मोदी सरकारने अच्छे दिनचे स्वप्न दाखविल्यामुळे राज्यातील भाजपा सरकारकडून कोकणातील शेतकऱ्यासाठी ठोस निर्णय होवून भरघोस मदत मिळेल असे वाटत असतानाच भाजपा महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांना मिळणारी भात बियाणे सबसिडी रद्द करुन चांगलेच कंबरडे मोडले आहे.कोकणातील गरीब व छोटा शेतकरी उदरनिर्वाहासाठी भातशेती करीत आहे. भातपीक सध्या परवडत नसून भाताचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्याला सरकारच्या मदतीची गरज आहे. आधीच भातशेतीसमोर मोठमोठी आव्हाने उभी असताना दुसरीकडे शेतकऱ्यांना भातबियाण्यांवर देण्यात येणारे अनुदानही बंद केल्याने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.उत्पन्नात घट होणार ?वाढत्या महागाईमुळे गरीब शेतकऱ्याला भाताचे बियाणे खरेदी करणे कठीण झाले आहे. त्यातच सबसिडी रद्द केल्यामुळे शेतकऱ्यानी जुने बियाणे पेरले आहे. हे बियाणे उगवलं तर उत्पादनात घट होईल. त्याला सरकार जबाबदार असेल. कोकणातील शेतकऱ्यावर हा अन्याय आहे. अच्छे दिन हेच का? जर शेतकऱ्यांचाच कणा मोडला जात असेल तर भविष्यात शेती कोण करेल ?- संजय कदम, आमदार