शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटू आपटू मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
4
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
5
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
6
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
7
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
8
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
9
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
10
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
11
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
12
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
13
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
14
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
15
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
16
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
17
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
18
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
19
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
20
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

बियाण्यावरील अनुदान केले रद्द

By admin | Updated: June 17, 2015 00:39 IST

गेले ते ‘अच्छे दिन’ : शेतकऱ्यांनी पेरले जुनेच बियाणे

शिवाजी गोरे - दापोलीकोकणातील शेतकऱ्याला भात बियाणे खरेदीत ७५ टक्के सुट आघाडी सरकारच्या काळात दिली जात होती. मात्र नवीन सरकारने सबसीडी बंद केल्यामुळे कोकणातील शेतकऱ्याला १०० टक्के रक्कम मोजण्याची वेळ आली असून सरकारने भात बियाण्याची सबसिडी रद्द केल्यामुळे वाढत्या महागाईमुळे महाग बियाणे खरेदी करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी चक्क गेल्या वर्षीचे जुने बियाण्याची पेरणी केल्यामुळे यंदा भात उत्पादन घटण्याची भिती व्यक्त होत आहे.कोकणातील शेतकऱ्याला दिलासा म्हणून आघाडी सरकारच्या काळात दरवर्षी शेतकऱ्याला भात बियाण्यावर सबसिडी देण्यात येत होती. परंतु आघाडी सरकार पाय उतार होवून शिवसेना - भाजपाचे सरकार सत्तेत आले आहे. या सरकारकडून शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळेल अशी अपेक्षा होती. केंद्रात मोदी सरकारने अच्छे दिनचे स्वप्न दाखविल्यामुळे राज्यातील भाजपा सरकारकडून कोकणातील शेतकऱ्यासाठी ठोस निर्णय होवून भरघोस मदत मिळेल असे वाटत असतानाच भाजपा महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांना मिळणारी भात बियाणे सबसिडी रद्द करुन चांगलेच कंबरडे मोडले आहे.कोकणातील गरीब व छोटा शेतकरी उदरनिर्वाहासाठी भातशेती करीत आहे. भातपीक सध्या परवडत नसून भाताचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्याला सरकारच्या मदतीची गरज आहे. आधीच भातशेतीसमोर मोठमोठी आव्हाने उभी असताना दुसरीकडे शेतकऱ्यांना भातबियाण्यांवर देण्यात येणारे अनुदानही बंद केल्याने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.उत्पन्नात घट होणार ?वाढत्या महागाईमुळे गरीब शेतकऱ्याला भाताचे बियाणे खरेदी करणे कठीण झाले आहे. त्यातच सबसिडी रद्द केल्यामुळे शेतकऱ्यानी जुने बियाणे पेरले आहे. हे बियाणे उगवलं तर उत्पादनात घट होईल. त्याला सरकार जबाबदार असेल. कोकणातील शेतकऱ्यावर हा अन्याय आहे. अच्छे दिन हेच का? जर शेतकऱ्यांचाच कणा मोडला जात असेल तर भविष्यात शेती कोण करेल ?- संजय कदम, आमदार