शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

सचिवांचा राजीनामा हा पूर्वनियोजित कट : प्रकाश काजवे

By admin | Updated: July 15, 2017 15:24 IST

मनमानी कारभाराविरूध्द जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार दाखल करणार

आॅनलाईन लोकमतराजापूर (जि. रत्नागिरी), दि. १५ : रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीमधील सचिवांचा राजीनामा घेणे, हे पूर्वनियोजित कारस्थान आहे. संचालक मंडळाला मनमानीपणे कारभार करण्यात अडथळा ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांना दबावतंत्र वापरून त्रास देण्याचे काम सुरु असल्याचा आरोप प्राथमिक शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष प्रकाश काजवे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.दोन वर्षांपासून पतपेढीच्या सचिवांविरुध्द काहींनी कारस्थाने रचली होती. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी सचिव प्रसाद खडवे यांचा राजीनामा घेतला, असा थेट आरोप माजी अध्यक्ष काजवे यांनी संचालक मंडळावर केला आहे. पतपेढीची निवडणूक चांगलीच रंगतदार ठरली होती. दोन पॅनेलकडून एकमेकांवर आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या होत्या. यापूर्वी कधी झाली नव्हती, अशी चुरसपूर्ण लढत यावेळी झाली होती. तत्कालिन सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करीत शिक्षकांच्या काही संघटनांनी महायुती करून १५पैकी १३ जागा जिंकून अनेक वर्षांची असलेली सत्ता उलथवून टाकली होती. नवीन संचालक मंडळ सत्तेवर आल्यानंतर त्यांनी सुडाचे राजकारण सुरु केले आहे. त्यातूनच त्यांनी सचिवांचा राजीनामा घेतला आहे, असा आरोप माजी अध्यक्ष काजवे यांनी केला आहे. सर्वसाधारणपणे किमान तीन वर्षे एकाच ठिकाणी काम केल्यानंतर कर्मचाऱ्याची बदली करणे, असा नियम असताना तो डावलून प्रशासकीय बदलीच्या नावाखाली सचिव प्रसाद खडवे यांचा बळी दिला आहे, असे काजवे यांचे म्हणणे आहे. आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना त्या जागेवर काम करण्याची संधी मिळावी, यासाठीच केलेला हा खटाटोप झाला असून, या मनमानी कारभाराविरूध्द जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार दाखल करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.