शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘रोजगार हमी’ची दुसरी इनिंग सुरू

By admin | Updated: September 24, 2015 00:11 IST

रत्नागिरी जिल्हा : ५४१ हेक्टरचे उद्दिष्ट

रत्नागिरी : गेली दोन वर्षे रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना बंद करण्यात आली होती. रोहयोऐवजी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना सुरू करण्यात आली. मात्र, या योजनेतील जाचक अटीमुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद न लाभल्यामुळे शासनाने पुन्हा यावर्षी ‘रोजगार हमी योजनेला’ मान्यता दिली आहे. जिल्ह्यासाठी ५४१ हेक्टर क्षेत्रावर लागवडीस मान्यता देण्यात आली आहे.सन १९९० पूर्वी जिल्ह्यात फळबाग लागवडीखालील क्षेत्र ३८,६४४ हेक्टर होते. मात्र, रोहयोअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रमाच्या माध्यमातून २०१२-१३पर्यंत जिल्ह्यात १ लाख २६ हजार २७५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली, त्यामुळे १ लाख ६२ हजार ५४७ हेक्टर क्षेत्र फळबाग लागवडीखाली आले. परंतु २०१३ साली रोहयो योजना बंद करण्यात आली. त्याऐवजी मनरेगा सुरू करण्यात आली. मात्र, योजनेसाठी असलेल्या अटींमुळे शेतकऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. याबाबत ‘लोकमत’ने मालिका प्रसिध्द करून जिल्ह्यातील लागवड परिस्थितीवर प्रकाश टाकला होता. मात्र, पुन्हा शासनाने यावर्षी रोजगार हमी योजनेला मान्यता दिली आहे.रोहयोअंतर्गत लागवडीनंतर शेतकऱ्यांना सलग तीन वर्षे अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या बँकेच्या खात्यात थेट जमा होणार आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचा सातबारा, आठ अ, व अर्ज आवश्यक आहे. मात्र, लागवडीसाठीची कलमे शासकीय नर्सरीतूनच विकत घेणे आवश्यक आहे. लागवडीसाठी १० हेक्टरची मर्यादा आहे. लागवडीनंतर अंतर्गत मशागत, खड्डे खोदणे, पाणी घालणे, मृत झाडांच्या ठिकाणी नवीन लागवड करणे, पीक संरक्षक खते देणे यासाठी सलग तन वर्षे पैसे देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी लागवडीसाठी, क्षेत्र तयार करण्यासाठी आधी स्वत:कडचे पैसे खर्च केल्यानंतर शासन मंजुरीप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत. २०१५-१६ वर्षासाठी जिल्ह्यात ५४१ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. रोहयोअंतर्गत फळबाग लागवडीसाठी आंब्याकरिता ३००, काजू १८०, चिकू १०, नारळ १०, जांभूळ २, कोकम ३, फणस ३, सुपारी २, बांबू १, कातळ जमिनीतील आंबा लागवडीसाठी १०, भातखाचराच्या बांधावर आंबा लागवडीसाठी १० व नारळ लागवडीसाठी ५, नारळबागेतील मसाला पीक लागवडीअंतर्गत मिरी १, लवंग १, जायफळ १, सुपारी २ मिळून एकूण ५४१ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी मंडणगड तालुक्याला ४०, दापोली ७०, खेड ४०, चिपळूण ५०, गुहागर ७०, संगमेश्वर ६०, रत्नागिरी ९१, लांजा ७०, राजापूर तालुक्यात ५० हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी लक्षांक देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)दोन वर्षे योजना बंदहवामान, रोजगार निर्मिती व उच्च मूल्यांकित पीक रचना या सर्व बाबींचा विचार यात करण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधण्यासाठी तसेच पडिक जमिनीचा विकास करण्याच्या दृष्टीने रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड योजना सुरू करण्यात आली होती.