शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
5
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
6
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
7
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
8
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
9
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
11
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
12
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
13
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
14
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
15
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
16
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
17
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
18
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
19
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
20
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली

‘रोजगार हमी’ची दुसरी इनिंग सुरू

By admin | Updated: September 24, 2015 00:11 IST

रत्नागिरी जिल्हा : ५४१ हेक्टरचे उद्दिष्ट

रत्नागिरी : गेली दोन वर्षे रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना बंद करण्यात आली होती. रोहयोऐवजी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना सुरू करण्यात आली. मात्र, या योजनेतील जाचक अटीमुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद न लाभल्यामुळे शासनाने पुन्हा यावर्षी ‘रोजगार हमी योजनेला’ मान्यता दिली आहे. जिल्ह्यासाठी ५४१ हेक्टर क्षेत्रावर लागवडीस मान्यता देण्यात आली आहे.सन १९९० पूर्वी जिल्ह्यात फळबाग लागवडीखालील क्षेत्र ३८,६४४ हेक्टर होते. मात्र, रोहयोअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रमाच्या माध्यमातून २०१२-१३पर्यंत जिल्ह्यात १ लाख २६ हजार २७५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली, त्यामुळे १ लाख ६२ हजार ५४७ हेक्टर क्षेत्र फळबाग लागवडीखाली आले. परंतु २०१३ साली रोहयो योजना बंद करण्यात आली. त्याऐवजी मनरेगा सुरू करण्यात आली. मात्र, योजनेसाठी असलेल्या अटींमुळे शेतकऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. याबाबत ‘लोकमत’ने मालिका प्रसिध्द करून जिल्ह्यातील लागवड परिस्थितीवर प्रकाश टाकला होता. मात्र, पुन्हा शासनाने यावर्षी रोजगार हमी योजनेला मान्यता दिली आहे.रोहयोअंतर्गत लागवडीनंतर शेतकऱ्यांना सलग तीन वर्षे अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या बँकेच्या खात्यात थेट जमा होणार आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचा सातबारा, आठ अ, व अर्ज आवश्यक आहे. मात्र, लागवडीसाठीची कलमे शासकीय नर्सरीतूनच विकत घेणे आवश्यक आहे. लागवडीसाठी १० हेक्टरची मर्यादा आहे. लागवडीनंतर अंतर्गत मशागत, खड्डे खोदणे, पाणी घालणे, मृत झाडांच्या ठिकाणी नवीन लागवड करणे, पीक संरक्षक खते देणे यासाठी सलग तन वर्षे पैसे देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी लागवडीसाठी, क्षेत्र तयार करण्यासाठी आधी स्वत:कडचे पैसे खर्च केल्यानंतर शासन मंजुरीप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत. २०१५-१६ वर्षासाठी जिल्ह्यात ५४१ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. रोहयोअंतर्गत फळबाग लागवडीसाठी आंब्याकरिता ३००, काजू १८०, चिकू १०, नारळ १०, जांभूळ २, कोकम ३, फणस ३, सुपारी २, बांबू १, कातळ जमिनीतील आंबा लागवडीसाठी १०, भातखाचराच्या बांधावर आंबा लागवडीसाठी १० व नारळ लागवडीसाठी ५, नारळबागेतील मसाला पीक लागवडीअंतर्गत मिरी १, लवंग १, जायफळ १, सुपारी २ मिळून एकूण ५४१ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी मंडणगड तालुक्याला ४०, दापोली ७०, खेड ४०, चिपळूण ५०, गुहागर ७०, संगमेश्वर ६०, रत्नागिरी ९१, लांजा ७०, राजापूर तालुक्यात ५० हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी लक्षांक देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)दोन वर्षे योजना बंदहवामान, रोजगार निर्मिती व उच्च मूल्यांकित पीक रचना या सर्व बाबींचा विचार यात करण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधण्यासाठी तसेच पडिक जमिनीचा विकास करण्याच्या दृष्टीने रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड योजना सुरू करण्यात आली होती.