शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

‘रोजगार हमी’ची दुसरी इनिंग सुरू

By admin | Updated: September 24, 2015 00:11 IST

रत्नागिरी जिल्हा : ५४१ हेक्टरचे उद्दिष्ट

रत्नागिरी : गेली दोन वर्षे रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना बंद करण्यात आली होती. रोहयोऐवजी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना सुरू करण्यात आली. मात्र, या योजनेतील जाचक अटीमुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद न लाभल्यामुळे शासनाने पुन्हा यावर्षी ‘रोजगार हमी योजनेला’ मान्यता दिली आहे. जिल्ह्यासाठी ५४१ हेक्टर क्षेत्रावर लागवडीस मान्यता देण्यात आली आहे.सन १९९० पूर्वी जिल्ह्यात फळबाग लागवडीखालील क्षेत्र ३८,६४४ हेक्टर होते. मात्र, रोहयोअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रमाच्या माध्यमातून २०१२-१३पर्यंत जिल्ह्यात १ लाख २६ हजार २७५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली, त्यामुळे १ लाख ६२ हजार ५४७ हेक्टर क्षेत्र फळबाग लागवडीखाली आले. परंतु २०१३ साली रोहयो योजना बंद करण्यात आली. त्याऐवजी मनरेगा सुरू करण्यात आली. मात्र, योजनेसाठी असलेल्या अटींमुळे शेतकऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. याबाबत ‘लोकमत’ने मालिका प्रसिध्द करून जिल्ह्यातील लागवड परिस्थितीवर प्रकाश टाकला होता. मात्र, पुन्हा शासनाने यावर्षी रोजगार हमी योजनेला मान्यता दिली आहे.रोहयोअंतर्गत लागवडीनंतर शेतकऱ्यांना सलग तीन वर्षे अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या बँकेच्या खात्यात थेट जमा होणार आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचा सातबारा, आठ अ, व अर्ज आवश्यक आहे. मात्र, लागवडीसाठीची कलमे शासकीय नर्सरीतूनच विकत घेणे आवश्यक आहे. लागवडीसाठी १० हेक्टरची मर्यादा आहे. लागवडीनंतर अंतर्गत मशागत, खड्डे खोदणे, पाणी घालणे, मृत झाडांच्या ठिकाणी नवीन लागवड करणे, पीक संरक्षक खते देणे यासाठी सलग तन वर्षे पैसे देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी लागवडीसाठी, क्षेत्र तयार करण्यासाठी आधी स्वत:कडचे पैसे खर्च केल्यानंतर शासन मंजुरीप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत. २०१५-१६ वर्षासाठी जिल्ह्यात ५४१ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. रोहयोअंतर्गत फळबाग लागवडीसाठी आंब्याकरिता ३००, काजू १८०, चिकू १०, नारळ १०, जांभूळ २, कोकम ३, फणस ३, सुपारी २, बांबू १, कातळ जमिनीतील आंबा लागवडीसाठी १०, भातखाचराच्या बांधावर आंबा लागवडीसाठी १० व नारळ लागवडीसाठी ५, नारळबागेतील मसाला पीक लागवडीअंतर्गत मिरी १, लवंग १, जायफळ १, सुपारी २ मिळून एकूण ५४१ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी मंडणगड तालुक्याला ४०, दापोली ७०, खेड ४०, चिपळूण ५०, गुहागर ७०, संगमेश्वर ६०, रत्नागिरी ९१, लांजा ७०, राजापूर तालुक्यात ५० हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी लक्षांक देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)दोन वर्षे योजना बंदहवामान, रोजगार निर्मिती व उच्च मूल्यांकित पीक रचना या सर्व बाबींचा विचार यात करण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधण्यासाठी तसेच पडिक जमिनीचा विकास करण्याच्या दृष्टीने रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड योजना सुरू करण्यात आली होती.