शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

पूरग्रस्त भागातील शाळा दुरुस्ती करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:37 IST

चिपळूण : चिपळुणातील महापुरात अनेक शाळांच्या इमारतींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे फाऊंडेशनच्या माध्यमातून आगामी काळात शाळा दुरुस्तीची कामे हाती ...

चिपळूण : चिपळुणातील महापुरात अनेक शाळांच्या इमारतींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे फाऊंडेशनच्या माध्यमातून आगामी काळात शाळा दुरुस्तीची कामे हाती घेणार असल्याचे मत साद फाऊंडेशनचे अध्यक्ष वामन कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

चिपळूण शहरासह खेर्डी, कळंबस्ते, कालुस्ते, मजरेकाशी, मिरजोळी परिसरात महापुराने थैमान घातले होते. त्यात हजारो लोकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. पूरग्रस्त कुटुंबांचा संसार सावरण्यासाठी विविध संस्थांनी मदतीचा हात दिला. महापुरानंतर साद फाऊंडेशनने केलेल्या कामाची माहिती देताना अध्यक्ष वामन कांबळे म्हणाले की, चिपळूणसह महाड येथील पूरग्रस्तांना संस्थेने तातडीची मदत दिली. पहिल्या टप्प्यात पूरग्रस्त गावे निश्चित करून तिथे मदत पोहोचविण्यात आली. अन्नधान्याचे वाटप झाल्यानंतर कुटुंबांना आवश्यक असलेले संसारोपयोगी साहित्य दिले आहे. त्यानंतर आलोरे व पेठमाप येथील गरजू कुटुंबांना भांडी देण्यात आली. गरजू मुलांना स्कॉलरशिप दिली जाते. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी यापुढील कालावधीत शैक्षणिक कामे हाती घेतली जाणार आहेत. ज्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत आवश्यक आहे, त्यांना ती पुरविण्याचा संस्थेचा मानस आहे. यावेळी साद फाऊंडेशनचे जगदीश पाटणकर, अनिल कांबळे, हेमराज कुरडीया, सुरेश वाडेकर, रमाकांत कांबळे, सुनील कांबळे, दीपक कांबळे उपस्थित होते.