शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

प्रशिक्षणासाठी शाळा बंद ?

By admin | Updated: October 1, 2014 01:07 IST

निमित्त निवडणुकीचे : एकाच शाळेतील जास्तीत जास्त शिक्षकांची नियुक्ती

सागर पाटील / टेंभ्येनिवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांबाबतच्या चुकीच्या नियोजनामुळे प्रशिक्षण काळात शाळा बंद ठेवण्याची वेळ मुख्याध्यापकांवर आली आहे. काही ठराविक शाळांमधीलच जास्तीत जास्त शिक्षक निवडणूक कामासाठी नियुक्त केल्यामुळे प्रशिक्षण व निवडणूक काळातील शाळांच्या कामकाजाच्या दिवशी अध्यापन कोणी करायचे, हा प्रश्न शाळासमोर निर्माण झाला आहे.अनेक शाळांमधून मुख्याध्यापक व एक-दोन शिक्षक सोडून सर्वच शिक्षक निवडणूक कामासाठी नियुक्त केल्याने अशा शाळांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे काही शाळांमधील एकाही शिक्षकाची निवडणूक कामासाठी नियुक्ती करण्यात आलेली नाही.सध्या राज्यात सुरु असलेल्या विधानसभा निवडणूक कामासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची मोठ्या प्रमाणात नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमध्ये विसंगती असल्याने अनेक शाळांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यामध्ये निवडणुकीसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना जिल्ह्यातील सर्व शाळांमधून सम प्रमाणात शिक्षक नियुक्त करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात अनेक शाळांमधून २८ शिक्षकांपैकी २५, १५ शिक्षकांपैकी १२ अशा प्रमाणात शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विरोधाभासात्मक बाब म्हणजे काही शाळांमधून एकाही शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. या प्रकारामुळे प्रशिक्षण काळात व प्रत्यक्षात निवडणूक काळात शालेय कामकाजादिवशी अध्यापन कोणी करायचे? हा प्रश्न संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाला आहे. शिक्षक नसल्याने शाळा बंद ठेवण्याची वेळ या शाळांवर आली आहे. जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने सर्व शाळांमधील शिक्षकांची समप्रमाणात नियुक्ती करावी, यामुळे अध्यापन कार्यात अडथळा येणार नाही. अशी मागणी निवडणूक प्रशासनाकडे केली होती. प्रत्यक्षात मात्र निवडणूक प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे मित्र पाहायला मिळत आहे. विशेष बाब म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान केलेल्या शिक्षक नियुक्तीच्या नियोजनान प्रशासनाने कोणताही बदल केला नसल्याचे मत शिक्षकांमधून व्यक्त केले जात आहे. सर्व शाळांमधील समप्रमाण शिक्षक नियुक्त करण्यात आले असते, तर विद्यार्थ्यांचे ऐन परीक्षेच्या काळात होणारे नुकसान टाळता आले असते, असे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. निवडणूक प्रशिक्षण दोन टप्प्यामध्ये घेण्यात येणार आहे. यामध्ये पहिला टप्पा दि. २८ ते २९ सप्टेंबर रोजी घेण्यात आला. दुसरा टप्पा दि. ४ ते ५ आॅक्टोबर या दरम्यान होणार आहे. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेसाठी दि. १४ ते १६ आॅक्टोबर हे दिवस लागणार आहेत. याच कालावधीत प्रथम सत्र परीक्षा सुरु होत आहेत. दि. ७ ते १८ आॅक्टोबर दरम्यान परीक्षा होणार आहेत. यामुळे दि. १४ ते १६ आॅक्टोबर रोजी परीक्षा संयोजनामध्ये अडथळा निर्माण होणार आहे.