शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षणासाठी शाळा बंद ?

By admin | Updated: October 1, 2014 01:07 IST

निमित्त निवडणुकीचे : एकाच शाळेतील जास्तीत जास्त शिक्षकांची नियुक्ती

सागर पाटील / टेंभ्येनिवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांबाबतच्या चुकीच्या नियोजनामुळे प्रशिक्षण काळात शाळा बंद ठेवण्याची वेळ मुख्याध्यापकांवर आली आहे. काही ठराविक शाळांमधीलच जास्तीत जास्त शिक्षक निवडणूक कामासाठी नियुक्त केल्यामुळे प्रशिक्षण व निवडणूक काळातील शाळांच्या कामकाजाच्या दिवशी अध्यापन कोणी करायचे, हा प्रश्न शाळासमोर निर्माण झाला आहे.अनेक शाळांमधून मुख्याध्यापक व एक-दोन शिक्षक सोडून सर्वच शिक्षक निवडणूक कामासाठी नियुक्त केल्याने अशा शाळांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे काही शाळांमधील एकाही शिक्षकाची निवडणूक कामासाठी नियुक्ती करण्यात आलेली नाही.सध्या राज्यात सुरु असलेल्या विधानसभा निवडणूक कामासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची मोठ्या प्रमाणात नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमध्ये विसंगती असल्याने अनेक शाळांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यामध्ये निवडणुकीसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना जिल्ह्यातील सर्व शाळांमधून सम प्रमाणात शिक्षक नियुक्त करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात अनेक शाळांमधून २८ शिक्षकांपैकी २५, १५ शिक्षकांपैकी १२ अशा प्रमाणात शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विरोधाभासात्मक बाब म्हणजे काही शाळांमधून एकाही शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. या प्रकारामुळे प्रशिक्षण काळात व प्रत्यक्षात निवडणूक काळात शालेय कामकाजादिवशी अध्यापन कोणी करायचे? हा प्रश्न संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाला आहे. शिक्षक नसल्याने शाळा बंद ठेवण्याची वेळ या शाळांवर आली आहे. जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने सर्व शाळांमधील शिक्षकांची समप्रमाणात नियुक्ती करावी, यामुळे अध्यापन कार्यात अडथळा येणार नाही. अशी मागणी निवडणूक प्रशासनाकडे केली होती. प्रत्यक्षात मात्र निवडणूक प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे मित्र पाहायला मिळत आहे. विशेष बाब म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान केलेल्या शिक्षक नियुक्तीच्या नियोजनान प्रशासनाने कोणताही बदल केला नसल्याचे मत शिक्षकांमधून व्यक्त केले जात आहे. सर्व शाळांमधील समप्रमाण शिक्षक नियुक्त करण्यात आले असते, तर विद्यार्थ्यांचे ऐन परीक्षेच्या काळात होणारे नुकसान टाळता आले असते, असे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. निवडणूक प्रशिक्षण दोन टप्प्यामध्ये घेण्यात येणार आहे. यामध्ये पहिला टप्पा दि. २८ ते २९ सप्टेंबर रोजी घेण्यात आला. दुसरा टप्पा दि. ४ ते ५ आॅक्टोबर या दरम्यान होणार आहे. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेसाठी दि. १४ ते १६ आॅक्टोबर हे दिवस लागणार आहेत. याच कालावधीत प्रथम सत्र परीक्षा सुरु होत आहेत. दि. ७ ते १८ आॅक्टोबर दरम्यान परीक्षा होणार आहेत. यामुळे दि. १४ ते १६ आॅक्टोबर रोजी परीक्षा संयोजनामध्ये अडथळा निर्माण होणार आहे.