शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:33 IST

रत्नागिरी : परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ५ वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ...

रत्नागिरी : परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ५ वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ८ वी ही २३ मे २०२१ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार होती; परंतु सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही परीक्षा तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे.

काम वाटप समितीची सभा

जिल्हा परिषद रत्नागिरीचे काम वाटप समितीची सभा २१ व २२ मे रोजी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार २१ मे रोजी सुशिक्षीत बेरोजगार अभियंता (स्थापत्य) रत्नागिरी बांधकाम विभागाकडील तर २२ रोजी चिपळूण बांधकाम विभागाकडील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामाचे वाटप करण्यात येणार आहे.

संचारबंदीमुळे व्यवसायांवर परिणाम

देवरूख : शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे छोट्या छोट्या व्यावसायिकांचे व्यवसाय बंद राहिले आहेत. त्यामुळे त्यांचे उत्पन्न थांबले असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्याचबरोबर आता कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३१,६२२ बाधित सापडले आहेत तर आतापर्यंत २७,२७६ रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. बरे हाेण्याचे प्रमाण ८२ टक्क्यांपेक्षा वाढले आहे.

इंधनाचे दर भडकले

चिपळूण : पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅस आदी इंधनाचे दर वाढले आहेत. त्यामुळे सामान्य माणसाचे जगणे मुश्किल झाले आहे. त्याचबरोबर आता खतांच्या किमतीही वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

दारूबंदीचा बाेजवारा

रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. नागरिकांना कुठल्याच कामासाठी बाहेर पडता येत नाही. मात्र, लाॅकडाऊन असुनही अनेक भागांमध्ये अवैध दारूधंदे खुलेआम सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

रस्ता खड्डेमय

गणपतीपुळे : सागरी किनारपट्टीवरील सुप्रसिद्ध देवस्थान म्हणून गणल्या जाणाऱ्या रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची सध्या दुरावस्था झाली आहे. हा रस्ता काही महिन्यांपूर्वी दुरूस्त करण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा त्याची दुरावस्था झाली आहे.

पाणीटंचाई वाढली

राजापूर : तालुक्यात दरवर्षी भरपूर पाऊस पडतो तरीही उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई सुरू होते. यावर्षी तालुक्यातही पाऊस चांगला झाला होता. मात्र, आता मे महिना उलटू लागताच पाणीटंचाईने उग्र रूप धारण करण्यास सुरूवात केली आहे.

मोबाईल दुकाने बंद

दापोली : जिल्हा प्रशासनाने १५ एप्रिलपासून लाॅकडाऊन सुरू केले आहे. त्यामुळे सर्वच दुकाने बंद आहेत. मात्र, सध्याच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या जगात मोबाईलची महत्त्वाची भूमिका आहे; परंतु सध्या ही दुकाने बंद असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.

विद्युत पुरवठा अनियमित

खेड : सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिक घरात बसलेले आहेत. त्यातच सतत वीज येत जात असल्याने नागरिक हैराण झाले आहे. सातत्याने लाईट जात असून पंखेही बंद होत आहेत. त्यामुळे नागरिकांना उकाड्याने हैराण व्हायला झाले आहे.