शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

‘एआरटी सेंटर’मध्ये औषधांचा तुटवडा

By admin | Updated: May 3, 2016 00:53 IST

एड्सग्रस्तांसमोर समस्या : गुरुप्रसाद ट्रस्टतर्फे आज मूकमोर्चा

रत्नागिरी : महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात एड्स प्रतिबंधक उपचार केंद्राला (ए. आर. टी. सेंटर) औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. याची झळ येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाला मोठ्या प्रमाणावर बसली असून, एड्सग्रस्तांचे आयुष्य धोक्यात आले आहे. शासनाचे लक्ष या बाबीकडे वेधून घेण्यासाठी उद्या मंगळवारी येथील गुरूप्रसाद ट्रस्टतर्फे जिल्ह्यातील एच. आय. व्ही. संसर्गित व्यक्तिंचा मूक मोर्चा जिल्हा शासकीय रुग्णालय ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान काढण्यात येणार आहे.शासनस्तरावर एड्स या महाभयंकर रोगाबाबत जागृती होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. एच. आय. व्ही. बाधितांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी शासकीय रूग्णालयांतर्गत चालवण्यात येणाऱ्या एड्स प्रतिबंधक उपचार केंद्रातून या रूग्णांना झेडएलएन टीएलई आणि झेडएल गोळ्या व इतर औषधे पुरविण्यात येतात. या औषधांचा पुरवठा महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंंबई (एम सॅक) यांच्याकडून केला जातो. मात्र, यापैकी झेडएल या गोळ्यांचा तुटवडा गेल्या सहा महिन्यांपासून जाणवू लागला असल्याने या गोळ्यांच्या दुप्पट प्रभाव असलेली झेडएलएन टीएलई ही गोळी सरसकट दिली जात आहे. मात्र, ही गोळी रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या रूग्णांना दिल्यास त्यांच्या पचनक्रियेकवर परिणाम होऊन मृत्यूदर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.सध्या राज्यातील सर्वच ए. आर. टी. केंद्रांना या गोळ्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे राज्यातील एक लाख ७० हजार रूग्णांचे जीवन धोक्यात आले आहे. मात्र, शासनाला याबाबत काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसत आहे. पुण्यातील एनएमपी प्लस या संस्थेने रूग्णांच्या जीविताला असलेला हा धोका लक्षात घेऊन या परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता उद्या ३ मे रोजी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे.एड्सग्रस्तांसाठी कार्यरत असलेल्या येथील गुरूप्रसाद टस्ट्रतर्फेही मंगळवारी जिल्ह्यातील एच. आय. व्ही. संसर्गित व्यक्तिंचा मूक मोर्चा जिल्हा शासकीय रुग्णालय ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान काढण्यात येणार असून, जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)