शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे सव्वाकोटींचे नुकसान

By admin | Updated: August 13, 2014 23:29 IST

आपत्तीमुळे पाचजणांचा मृत्यू : मृतांच्या नातेवाईकांना जिल्हा प्रशासनाकडून तातडीची मदत

रत्नागिरी : जिल्ह्यात वादळी पावसाने गेल्या दोन महिन्यांत ३८७ घरांची पडझड झाली असून, त्यात एकूण ५८ लाखा २९ हजार ९१७ रूपयांचे नुकसान झाले आहे. सार्वजनिक आणि खासगी मालमत्तांचे एकूण ६४ लाख २ हजार २८६ रूपयांचे नुकसान झाले आहे. या पावसात मृत झालेल्यांची संख्या ५ असून, ६ जनावरांचा बळी गेला आहे. या सर्व नुकसानापोटी जिल्ह्यात आतापर्यंत १ कोटी २३ लाख ५४ हजार २०३ रूपयांच्या नुकसानाची नोंद आहे. यातील मृतांपैकी जणांच्या वारसांना जिल्हा प्रशासनाकडून तत्काळ मदत देण्यात आली. यावर्षी जूनमध्ये पाऊस गायब झाला असला तरी जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने जोरदार वृष्टी करून जिल्ह्यातील अनेक घरे, गोठे, सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. यात १० घरांचे आणि ११ गोठ्यांचे पूर्णत: नुकसान झाले आहे, तर ३४० घरांची आणि ३३ गोठ्यांची पडझड झाली आहे. जिल्ह्यात पडझड झालेल्या घरांची एकूण संख्या ३९४ असून, यापैकी फक्त २० घरे व गोठे यांना मदत दिलेली आहे. उर्वरित घरे आणि गोठे यांचे पंचनामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. या सर्वांचे एकूण नुकसान ५८ लाख ४५ हजार ४३२ रूपये इतके झाले आहे.जिल्ह्यातील २४ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान ४ लाख ६६ हजार ७५, तर खासगी ४३ मालमत्तेचे ५९ लाख ३६ हजार २११ रूपयांचे नुकसान झाले आहे. या दोन्ही मालमत्तांचे एकूण ६४ लाख ०२ हजार २८६ रूपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय पुरात, वीज पडून, दरड भिंत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या वारसांना प्रत्येकी दीड लाखप्रमाणे साडेपाच लाख रूपये जिल्हा प्रशासनाकडून तत्काळ मदत देण्यात आली आहे. याच काळात आणखी ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र तो नैसर्गिक आपत्तीने झाला नसल्याचे सांगत त्यांना मदत देण्यात आलेली नाही. तसेच या पावसात ६ जनावरांचा बळी गेला असून, एकूण १ लाख ३९ हजार ५०० रूपयांचे नुकसान झाले आहे. या जनावरांच्या मालकांना नुकसानीची रक्कम देण्यात आली आहे. मात्र, पंचनामे वेळेवर न झाल्याने पडझड झालेल्या घरांची नुकसानभरपाई मिळण्यात अडचण येत आहे. (प्रतिनिधी)