शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

पारंपरिक ऊर्जानिर्मितीतून बचत

By admin | Updated: October 31, 2014 00:30 IST

‘काटकसरी’ची ऊर्जा : पवनचक्की, सोलर ऊर्जाने दिला प्रकाश

मेहरुन नाकाडे ल्ल रत्नागिरीवीज, पाणी या मूलभूत गरजा आहेत. मात्र, त्यासाठीदेखील पैसे मोजावे लागत आहेत. जेवढा वापर अधिक तेवढा पैसा अधिक जातो. परंतु वापरामध्ये जशी बचत केली जाते, त्याप्रमाणे निर्मितीसाठी प्रयत्न केल्यास संबंधित ग्राहकांना अन्यत्र पैसे मोजावे लागत नाहीत. किंबहुना पैशांची बचत होते. शहरातील एका खासगी रूग्णालयाने सौरऊर्जा प्रकल्पाचे एक युनिट बसविले असून, त्यांना त्याव्दारे दरमहा २२५ युनिट वीज उपलब्ध होते. तसेच औषधालयामध्ये पवनचक्की प्रकल्प उभारल्याने त्यांना १५० युनिट वीज सहज उपलब्ध होते. एकूणच संबंधित मंडळीनी ऊर्जानिर्मितीची छोटी उपकरणे बनवून स्वत:च्या गरजेपुरती वीजनिर्मिती सुरू केली आहे. यामुळे महावितरणला द्याव्या लागणाऱ्या पैशांची बचत होतेच शिवाय वापरावरही निर्बंध घालून घेतले आहेत.शहरातील डॉ. गिरीश करमरकर यांचे स्वत:चे इस्पितळ आहे. रूग्णालयासाठी दरमहा ९०० ते ९५० युनिट वीज लागते. त्यासाठी महावितरण कंपनीला बिलापोटी हजारो रूपये मोजावे लागतात. यावर उपाय म्हणून डॉ. करमरकर यांनी सोलर ऊर्जानिर्मिती उपकरण बसविले आहे. त्याव्दारे त्यांना २१० ते २५० युनिट वीज उपलब्ध होते. शिवाय त्यांनी पवनचक्कीदेखील उभारली आहे. मात्र, वाऱ्याअभावी पवनचक्कीव्दारे केवळ दहा युनिट वीज निर्मिती होते. एकूणच करमरकर यांना स्वयंनिर्मितीमुळे २५० ते २६० युनिट वीज उपलब्ध होते. साहजिकच यामुळे बिलाचे हजारो रूपये वाचतात.रूग्णालयातील पंखे व दिवे सौरऊर्जेवर चालविण्यात येतात. मात्र, अत्यंत तातडीच्या अशा आॅपरेशन थिएटर्स व अन्यत्र महावितरणची वीज वापरली जाते. वाऱ्याअभावी पवनचक्की उपकरणातून कमी वीज उपलब्ध होते असल्याचे डॉ. करमरकर यांनी सांगितले. बहुतांश रूग्णालयांनी केवळ पाणी तापवण्यासाठी सौरऊर्जा उपकरण बसविण्यात आले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हे उपकरण बसवल्यामुळे करमरकर यांची बचत झाली आहे.सायंटिफीक मेडीकलचे सतीश जोशी यांनी तर पवनचक्की उपकरण बसविले आहे. त्यांना दररोज ५ युनिट वीज पवनचक्कीव्दारे उपलब्ध होते. काही औषधे फ्रीजमध्ये ठेवावी लागतात. त्यांना दरमहा ३५० युनिट वीज लागते. महावितरणकडून घेण्यात येणाऱ्या विजेला वाणिज्य दराने प्रत्येक युनिटला ९ ते १० रूपये मोजावे लागतात. परंतु पवनचक्कीमुळे १५० युनिट वीज उपलब्ध होते. त्यामुळे २०० युनिट वीज त्यांना महावितरणकडून विकत घ्यावी लागते. वारा कमी उपलब्ध होत असल्यामुळे तितकीशी वीजनिर्मिती होत नाही. केवळ चार तास वारा मिळत असल्याने वीजनिर्मिती कमी होते. पावसाळ्यातील ढगाळ हवामानामुळे सौरऊर्जा निर्मितीवर परिणाम होतो. वास्तविक औषधालये वा रूग्णालयांसाठी २४ तास विजेची गरज असते. परंतु अपारंपरिक ऊर्जास्त्रोतावर ऊर्जा निर्मिती केली तर नक्कीच पैशाची बचत होत असल्याचे करमकर व जोशी यांनी दाखवून दिले आहे. रत्नागिरी शहराला दररोज ४० मेगावॅट तर दरमहा १२० मेगावॅट वीज लागते. विजेच्या वापरावरील निर्बंध ही मुख्य बाब असली तरीही पारंपरिक ऊर्जानिर्मितीतून ग्राहकांचा फायदा होऊ शकतो. जोशी व करमरकर यांच्या मते सौरऊर्जा व पवनचक्कीतून वीजनिर्मिती होणारे प्रकल्प फायदेशीर असून, शहरातील विविध रूग्णालये किंवा, कार्यालयांनी या प्रकारची वीजनिर्मिती केली तर नक्कीच लाभदायक आहे. शिवाय शासकीय मालमत्तेचीही बचत होईल. या साऱ्यासाठी पारंपरिक ऊर्जानिर्मितीमुळे अनेक स्तरांवर फायदा होणार आहे.४पैशांची बचत करायला त्यांनी शिकविले. ४एका खासगी रूग्णालयाने निर्माण केला सौरऊर्जा प्रकल्प. ४ऊर्जानिर्मितीची छोटी उपकरणे बसवून समोर ठेवला काटकसरीचा आदर्श. ४वीज काटेकोरपणे वापरा हाच संदेश. ४पैशांची बचत; त्याचबरोबर उत्पादनक्षमताही वाढेल. ४बिलाचे हजारो रूपये वाचविण्यात त्यांना मिळतेय यश.