शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
4
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
5
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
6
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
7
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
8
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
9
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
10
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
11
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
12
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
13
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
14
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
15
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
16
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
18
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
19
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
20
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?

समाधानकारक पाणी

By admin | Updated: February 26, 2015 00:13 IST

पाटबंधारे विभाग : २२ धरणांमध्ये ५३ टक्के उपयुक्त पाणीसाठा

प्रकाश वराडकर - रत्नागिरी पाटबंधारेच्या दक्षिण विभागाअंतर्गत जिल्ह्यात असलेल्या नातूवाडीवाडीसह एकूण २४ धरणांमधील पाणीपातळीत २५ फेब्रुवारी २०१५ अखेर सरासरी निम्म्याने घट झाली आहे. या धरणांमध्ये सध्या २८. ६१६ दशलक्ष घनमीटर अर्थात ५३.९६४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. २४ पैकी दोन धरणांमध्ये तांत्रिक कारणाने पाणीसाठाच उपलब्ध नाही. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा या धरणातील पाणीसाठा समाधानकारक असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूूत्रांकडून सांगण्यात आले.गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील धरणांची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. या विभागाअंतगर्त चिपळूण तालुक्यातील मालघर या एकमेव धरणात २५ फेब्रुवारीअखेर एकूण क्षमतेच्या ९०. ७१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. आंबतखोल धरणात ८८. ६९ टक्के, संगमेश्वरमधील तेलेवाडी धरणात ८५. ९५ टक्के व खोपड धरणात ८२.३५ टक्के पाणीसाठा असून पाणी स्थिती चांगली आहे. अडरे, गुहागर, शिरवली, सोंडेघर, कडवई, शिपोशी, व्हेळ व झापडे या आठ धरणांत ६० टक्केपेक्षा अधिक व ८० टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे. हा साठा समाधानकारक आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात शिपोशी व व्हेळ या धरणांत उपयुक्त असा पाणीसाठा कमी राहत होता. या धरणांचे दुरुस्ती काम पूर्ण झाल्याने या दोन्ही धरणातील पाणी पातळी समाधानकारक आहे. जिल्ह्यातील या धरणांतील पाणी हे प्राधान्याने सिंचनाकरिता असून, प्रत्यक्षात सिंचनासाठी पाण्याचा वापर कमीच होत आहे. मात्र, या पाण्याचा अनेक नळपाणी योजनांना उपयोग होत आहे. या धरणांतील पाण्याचा वापर सिंचनाकरिता अधिक होण्याची अपेक्षा आहे. उन्हाळी शेतीसाठी या पाण्याचा अधिक उपयोग झाल्यास शेतीतून नक्कीच अधिक उत्पादन मिळू शकणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत पुरेसा साठापाच धरणात कमी पाणीया विभागाअंतर्गत असलेल्या खेड तालुक्यातील नातूवाडी मध्यम प्रकल्पात सध्या १३. ०२ दशलक्ष घन मीटर म्हणजेच ४७. ८३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. २३ लघूपाटबंधारे धरणांपैकी फणसवाडी (चिपळूण), निवे (संगमेश्वर), बेनी, गवाणे (लांजा) व कोंड्ये (राजापूर) या पाच धरणांमध्ये २५ फेब्रुवारी २०१५ अखेर असलेला उपयुक्त पाणीसाठा हा ३२ ते ४६ टक्के एवढा कमी आहे. केळंबे, बारेवाडी धरणे कोरडी !रत्नागिरी पाटबंधारे दक्षिण विभागाकडील जी दोन धरणे कोरडी आहेत, त्यांमध्ये लांजा तालुक्यातील केळंबे व राजापूर तालुक्यातील बारेवाडी लघू पाटबंधारे धरणांचा समावेश आहे. यांपैकी केळंबा धरणाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता संपुष्टात आली आहे. गळतीमुळे या धरणात पाणी साठा होत नाही. तर बारेवाडी धरणात गाळ मोठ्या प्रमाणात असल्याने पाणीसाठा होत नाही. गाळ उपसा काम येत्या काही कालावधीत हाती घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्यातरी ही दोन्ही धरणे कोरडीच आहेत.