शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
4
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
7
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
8
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
9
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
10
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
11
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
12
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
13
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
14
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
15
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
16
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
17
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
18
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
19
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
20
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?

समाधानकारक पाणी

By admin | Updated: February 26, 2015 00:13 IST

पाटबंधारे विभाग : २२ धरणांमध्ये ५३ टक्के उपयुक्त पाणीसाठा

प्रकाश वराडकर - रत्नागिरी पाटबंधारेच्या दक्षिण विभागाअंतर्गत जिल्ह्यात असलेल्या नातूवाडीवाडीसह एकूण २४ धरणांमधील पाणीपातळीत २५ फेब्रुवारी २०१५ अखेर सरासरी निम्म्याने घट झाली आहे. या धरणांमध्ये सध्या २८. ६१६ दशलक्ष घनमीटर अर्थात ५३.९६४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. २४ पैकी दोन धरणांमध्ये तांत्रिक कारणाने पाणीसाठाच उपलब्ध नाही. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा या धरणातील पाणीसाठा समाधानकारक असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूूत्रांकडून सांगण्यात आले.गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील धरणांची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. या विभागाअंतगर्त चिपळूण तालुक्यातील मालघर या एकमेव धरणात २५ फेब्रुवारीअखेर एकूण क्षमतेच्या ९०. ७१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. आंबतखोल धरणात ८८. ६९ टक्के, संगमेश्वरमधील तेलेवाडी धरणात ८५. ९५ टक्के व खोपड धरणात ८२.३५ टक्के पाणीसाठा असून पाणी स्थिती चांगली आहे. अडरे, गुहागर, शिरवली, सोंडेघर, कडवई, शिपोशी, व्हेळ व झापडे या आठ धरणांत ६० टक्केपेक्षा अधिक व ८० टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे. हा साठा समाधानकारक आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात शिपोशी व व्हेळ या धरणांत उपयुक्त असा पाणीसाठा कमी राहत होता. या धरणांचे दुरुस्ती काम पूर्ण झाल्याने या दोन्ही धरणातील पाणी पातळी समाधानकारक आहे. जिल्ह्यातील या धरणांतील पाणी हे प्राधान्याने सिंचनाकरिता असून, प्रत्यक्षात सिंचनासाठी पाण्याचा वापर कमीच होत आहे. मात्र, या पाण्याचा अनेक नळपाणी योजनांना उपयोग होत आहे. या धरणांतील पाण्याचा वापर सिंचनाकरिता अधिक होण्याची अपेक्षा आहे. उन्हाळी शेतीसाठी या पाण्याचा अधिक उपयोग झाल्यास शेतीतून नक्कीच अधिक उत्पादन मिळू शकणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत पुरेसा साठापाच धरणात कमी पाणीया विभागाअंतर्गत असलेल्या खेड तालुक्यातील नातूवाडी मध्यम प्रकल्पात सध्या १३. ०२ दशलक्ष घन मीटर म्हणजेच ४७. ८३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. २३ लघूपाटबंधारे धरणांपैकी फणसवाडी (चिपळूण), निवे (संगमेश्वर), बेनी, गवाणे (लांजा) व कोंड्ये (राजापूर) या पाच धरणांमध्ये २५ फेब्रुवारी २०१५ अखेर असलेला उपयुक्त पाणीसाठा हा ३२ ते ४६ टक्के एवढा कमी आहे. केळंबे, बारेवाडी धरणे कोरडी !रत्नागिरी पाटबंधारे दक्षिण विभागाकडील जी दोन धरणे कोरडी आहेत, त्यांमध्ये लांजा तालुक्यातील केळंबे व राजापूर तालुक्यातील बारेवाडी लघू पाटबंधारे धरणांचा समावेश आहे. यांपैकी केळंबा धरणाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता संपुष्टात आली आहे. गळतीमुळे या धरणात पाणी साठा होत नाही. तर बारेवाडी धरणात गाळ मोठ्या प्रमाणात असल्याने पाणीसाठा होत नाही. गाळ उपसा काम येत्या काही कालावधीत हाती घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्यातरी ही दोन्ही धरणे कोरडीच आहेत.