शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

समाधानकारक पाणी

By admin | Updated: February 26, 2015 00:13 IST

पाटबंधारे विभाग : २२ धरणांमध्ये ५३ टक्के उपयुक्त पाणीसाठा

प्रकाश वराडकर - रत्नागिरी पाटबंधारेच्या दक्षिण विभागाअंतर्गत जिल्ह्यात असलेल्या नातूवाडीवाडीसह एकूण २४ धरणांमधील पाणीपातळीत २५ फेब्रुवारी २०१५ अखेर सरासरी निम्म्याने घट झाली आहे. या धरणांमध्ये सध्या २८. ६१६ दशलक्ष घनमीटर अर्थात ५३.९६४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. २४ पैकी दोन धरणांमध्ये तांत्रिक कारणाने पाणीसाठाच उपलब्ध नाही. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा या धरणातील पाणीसाठा समाधानकारक असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूूत्रांकडून सांगण्यात आले.गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील धरणांची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. या विभागाअंतगर्त चिपळूण तालुक्यातील मालघर या एकमेव धरणात २५ फेब्रुवारीअखेर एकूण क्षमतेच्या ९०. ७१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. आंबतखोल धरणात ८८. ६९ टक्के, संगमेश्वरमधील तेलेवाडी धरणात ८५. ९५ टक्के व खोपड धरणात ८२.३५ टक्के पाणीसाठा असून पाणी स्थिती चांगली आहे. अडरे, गुहागर, शिरवली, सोंडेघर, कडवई, शिपोशी, व्हेळ व झापडे या आठ धरणांत ६० टक्केपेक्षा अधिक व ८० टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे. हा साठा समाधानकारक आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात शिपोशी व व्हेळ या धरणांत उपयुक्त असा पाणीसाठा कमी राहत होता. या धरणांचे दुरुस्ती काम पूर्ण झाल्याने या दोन्ही धरणातील पाणी पातळी समाधानकारक आहे. जिल्ह्यातील या धरणांतील पाणी हे प्राधान्याने सिंचनाकरिता असून, प्रत्यक्षात सिंचनासाठी पाण्याचा वापर कमीच होत आहे. मात्र, या पाण्याचा अनेक नळपाणी योजनांना उपयोग होत आहे. या धरणांतील पाण्याचा वापर सिंचनाकरिता अधिक होण्याची अपेक्षा आहे. उन्हाळी शेतीसाठी या पाण्याचा अधिक उपयोग झाल्यास शेतीतून नक्कीच अधिक उत्पादन मिळू शकणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत पुरेसा साठापाच धरणात कमी पाणीया विभागाअंतर्गत असलेल्या खेड तालुक्यातील नातूवाडी मध्यम प्रकल्पात सध्या १३. ०२ दशलक्ष घन मीटर म्हणजेच ४७. ८३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. २३ लघूपाटबंधारे धरणांपैकी फणसवाडी (चिपळूण), निवे (संगमेश्वर), बेनी, गवाणे (लांजा) व कोंड्ये (राजापूर) या पाच धरणांमध्ये २५ फेब्रुवारी २०१५ अखेर असलेला उपयुक्त पाणीसाठा हा ३२ ते ४६ टक्के एवढा कमी आहे. केळंबे, बारेवाडी धरणे कोरडी !रत्नागिरी पाटबंधारे दक्षिण विभागाकडील जी दोन धरणे कोरडी आहेत, त्यांमध्ये लांजा तालुक्यातील केळंबे व राजापूर तालुक्यातील बारेवाडी लघू पाटबंधारे धरणांचा समावेश आहे. यांपैकी केळंबा धरणाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता संपुष्टात आली आहे. गळतीमुळे या धरणात पाणी साठा होत नाही. तर बारेवाडी धरणात गाळ मोठ्या प्रमाणात असल्याने पाणीसाठा होत नाही. गाळ उपसा काम येत्या काही कालावधीत हाती घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्यातरी ही दोन्ही धरणे कोरडीच आहेत.