शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

Satara Bus Accident : त्यांचे पार्थिव येताच आप्तेष्टांच्या अश्रूंचा फुटला बांध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 16:50 IST

मृत्युमुखी पडलेल्या सर्वांचे मृतदेह दापोलीत आल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दापोली : दापोली येथील कृषी विद्यापिठाच्या कर्मचाऱ्यांची शनिवारी महाबळेश्वर येथे सहल गेली होती. जाताना या बसला महाबळेश्वर येथील आंबेनळी घाटात अपघात झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांचे मृतदेह दापोलीत आल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी १० जणांचे मृतदेह दापोली दाखल झाले होते तर रविवारी (29 जुलै) उर्वरीत मृतदेह दाखल झाल्यानंतर आप्तेष्टांच्या अश्रूंचा बांध फुटला. अत्यंत शोकाकूल परिस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या अपघातातील मृतांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आज सकाळी हे मृतदेह बाहेर काढल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय सोपस्कार पूर्ण केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांनी आपल्या घरी आणले. हे मृतदेह घरी येताच आप्तेष्टांनी हंबरडाच फोडला. दापोलीतील गावी हे मृतदेह आल्यानंतर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दुर्घटनेतील मृतांचे कुटुंबीय शोकाकुल

या अपघातात मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय या दुर्घटनेने शोकाकुल झाले आहेत. मयत सचिन गुजर यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी व पाच बहिणी असा परिवार आहे. संदीप सुवरे यांच्या पश्चात दोन मुली, पत्नी, आई व एक भाऊ आहे. त्यांची पत्नी शिक्षिका आहे. विनायक सावंत हे फोंडाघाट येथील राहणारे असून, ते लिपीक म्हणून कार्यरत होते. नीलेश तांबे यांचा विवाह मे महिन्यातच पार पडला. ते चंद्रनगर - दापोली येथील राहणारे असून, त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी असा परिवार आहे. रितेश जाधव यांच्या पश्चात पत्नी, आई व एक मुलगी असा परिवार आहे. तर सुनील कदम यांच्या पश्चात पत्नी, आई व दोन मुली. राजू बंडबे यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे. त्यांची पत्नी प्राथमिक शिक्षिका आहे. पागडे यांच्या पश्चात आई, भाऊ, दोन मुले व पत्नी असा परिवार आहे.

सकाळी नऊ वाजेपर्यंत चॅटिंग केलं

सहकाऱ्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर फोटोही पाठवले. सकाळी नऊ वाजेपर्यंत चॅटिंग सुरु होतं. मात्र, त्यानंतर आपला संपर्कच तुटला, असे प्रवीण रणदिवे म्हणाले. रणदिवे हे दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी आहेत.

कुणी कुणाला सावरायचे?

अपघातात मृत पावलेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या घरी हे कर्मचारी म्हणजेच कर्ते होते. घरातील कर्ता व्यक्तीच निघून गेल्याने या मृतांच्या घरावर शोककळा पसरली आहे. मात्र, दापोली आणि परिसरावर एवढा मोठा दु:खाचा डोंगर कोसळला की यातून कोणी कोणाला सावरायचे, हाच प्रश्न पडला आहे.

अफवा, चर्चा, संभ्रम आणि गोंधळ

अपघाताचा प्रकार झाल्यानंतर काही वेळातच व्हॉट्सअ‍ॅपवर एकापाठोपाठ एक मेसेज धडकू लागले. त्यातून बसमधल्या प्रवाशांचा आकडा, बस नेमकी किती फूट खोल दरीत कोसळली, याबाबतची वेगवेगळी माहिती पुढे येत होती. त्यामुळे संभ्रम वाढत गेला. दापोली कृषी विद्यापीठाला एकतर सुट्टी होती आणि ही घटना घडल्याचे कळताच महत्त्वाचे अधिकारी, कर्मचारी तत्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले. त्यामुळे नेमकी आणि अधिकृत माहिती कोणाकडूनही मिळत नव्हती. त्यामुळे नातेवाईकांमध्ये संभ्रमाची अवस्था होती.

कृषी विद्यापीठ सुनेसुने

दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठ सोमवारपासून सुनसान असेल. कारण कोकण कृषी विद्यापीठाने अनेक महत्वाचे कर्मचारी गमावले आहेत. एकाच कार्यालयातील एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांचा मृत्यू होण्याची ही पहिली वेळ आहे.

रोशनचे आईवडील अडकले पंढरपूरमध्ये

अपघातग्रस्त बसमधील रोशन तबीब (हर्णै) याचे मार्च महिन्यात लग्न झाले होते. त्याचे आई-वडील आषाढीसाठी पंढरपूरला गेले आहेत. मोर्चा आणि आंदोलनांमुळे ते तेथेच अडकून पडले आहेत. रोशन याच्या पश्चात एक भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे. लग्नानंतर चार महिन्यातच त्याला काळाने ओढून नेले आहे. याच बसमधील पंकज कदम आणि नीलेश तांबे या दोघांचा विवाहही नुकताच झाला होता. नीलेशचा विवाह तर मे महिन्यातच झाला होता. अपघातग्रस्तांमध्ये बहुतांश कर्मचारी २५ ते ४० या वयोगटातील आहेत. घराची जबाबदारी अंगावर घेतानाच त्यांच्यावर मृत्यूने झडप घातली आहे.

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघातRatnagiriरत्नागिरीMaharashtraमहाराष्ट्र