शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

थेट सरपंच निवडणुकीत सेना-राष्टÑवादीची टक्कर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्हा परिषद व पंचायत समितीनंतर आॅक्टोबरमध्ये होणाºया २३२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यातील आपली राजकीय शक्ती आजमावण्याची संधी सर्वच पक्षांना उपलब्ध झाली आहे. या निवडणुकीत सरपंच निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याने शिवसेना, राष्टÑवादी, भाजप व कॉँग्रेससह सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. जिल्हा ...

ठळक मुद्दे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्हा परिषद व पंचायत समितीनंतर आॅक्टोबरमध्ये होणाºया २३२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यातील आपली राजकीय शक्ती आजमावण्याची संधी सर्वच पक्षांना उपलब्ध झाली आहे. या निवडणुकीत सरपंच निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याने शिवसेना, राष्टÑवादी, भाजप व कॉँग्रेससह सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत वर्चस्व सिध्द करणाºया शिवसेनेला २३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्टÑवादी कॉँग्रेस टक्कर देणार का, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेने ५ पैकी ३ विधानसभा मतदारसंघात विजय संपादन केला होता, तर राष्टÑवादी काँग्रेसने २ विधानसभा मतदारसंघ जिंकले होते. रत्नागिरी, लांजा-राजापूर व चिपळूण या तीन ठिकाणी सेनेचे आमदार निवडून आले. दापोली व गुहागर या दोन मतदारसंघात राष्टÑवादीने बाजी मारली. मात्र, त्यानंतर अलिकडेच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेने मोठी बाजी मारली. जिल्हा परिषदेच्या ५५पैकी ३९ जागा सेनेने पटकावल्या व जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता स्थापन केली. राष्टÑवादीला १६ जागांवर विजय मिळाला. मात्र, अन्य पक्षांचा या निवडणुकीत पुरता सफाया झाला.येत्या आॅक्टोबरमध्ये जिल्ह्यातील २३२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. मात्र, यावेळी राज्य सरकारने नगराध्यक्षांप्रमाणेच गावचा सरपंचही थेट जनतेतून निवडून आणण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. थेट नगराध्यक्ष निवडणुकीच्या वेळी पक्षीय चिन्ह देण्यात आली होती. थेट सरपंच निवडणुकीसाठीही पक्षाची चिन्ह वापरली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाचे ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य निवडून आले यापेक्षा थेट सरपंच निवडून आणण्यास अधिक महत्व येणार आहे. सरपंच निवडून आल्यास ग्रामपंचायतीची सत्ता संबंधित पक्षाच्या हाती येणार आहे. त्यामुळेच जनतेतून सरपंच म्हणून थेट निवडून येऊ शकेल, अशा लोकप्रिय उमेदवारांचा शोध सर्वच पक्षांकडून घेतला जात आहे.जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला जिल्ह्यात जागा मिळाल्या नाहीत तरीही आता भाजपकडील इनकमिंग सध्या जोरात वाढले आहे. पक्ष राज्यात सत्तेवर असल्याने जिल्ह्यात थेट सरपंच अधिक प्रमाणात निवडून आणण्याची रणनीती भाजपकडून आखली जाण्याची शक्यता आहे. कॉँगे्रस अद्यापही कूल कुलच आहे.निवडणूक : राजकीय शक्ती पणाला लागणारनिवडणुकीला मिनी विधानसभेचे स्वरुप येणार.राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू.जिल्ह्याच्या राजकारणावर सेना, राष्टÑवादीचे वर्चस्व.थेट सरपंचपदासाठी पक्षांकडून लोकप्रिय उमेदवारांचा शोध.आॅक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या २३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा निवडणुका समजल्या जात आहेत. २०१९मध्ये विधानसभा निवडणुका जिल्ह्यात जिंकायच्या असतील तर येणाºया ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच पदाच्या रुपाने गावावर राजकीय वर्चस्व ठेवण्याची आवश्यकता आहे.