शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
3
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
4
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
5
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
6
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
7
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
8
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
9
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
10
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
11
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
12
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
13
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
14
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
15
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
16
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
17
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
18
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
19
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
20
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले

स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:28 IST

दापोली : सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेच्या दापोली, मंडणगड आणि खेड विभागांच्या समूहाने किल्ले पालगड येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन ...

दापोली : सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेच्या दापोली, मंडणगड आणि खेड विभागांच्या समूहाने किल्ले पालगड येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमेमध्ये गडावरील टाके व गड परिसराची स्वच्छता करण्यात आली. पाण्याच्या टाकीतील माती काढून त्या स्वच्छ करण्यात आल्या. झाडेझुडपे तोडून परिसरही स्वच्छ केला गेला.

सराफांचे नुकसान

रत्नागिरी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्यादिनी लॉकडाऊनमुळे सराफांंची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागरिक सोन्याची तसेच इतर वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणावर करतात. मात्र यावेळी लॉकडाऊनमुळे ही खरेदी थांबली आहे.

अवकाळी पावसाचा धोका

रत्नागिरी : राज्यासह कोकणात कोरोनाचे संकट वाढू लागले असतानाच आता निसर्गानेही अवकृपा करण्यास सुरुवात केली आहे. अधूनमधून पडणाऱ्या अवकाळी पावसाने बागायतदारांची चिंता वाढवली आहे. १२ ते १४ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

रस्ते झाले धोकादायक

रत्नागिरी : शहरात आता काही ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी चर काढले आहेत. हे चर जाड्या दगडाने भरले जात आहेत. मात्र, त्यामुळे दुचाकींना मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला आहे. शहरात अनेक भागात यावरून दुचाकी घसरून अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

लॉकडाऊनचा धसका

देवरुख : १४ एप्रिलनंतर कोणत्याही क्षणी पूर्णत: लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे लॉकडाऊन झाल्यास सर्व व्यवहार ठप्प होतील या भितीने नागरिक आर्थिक तसेच अन्य कामे घाईघाईने करू लागले आहेत. गैरसोय होऊ नये यासाठी सर्व गृहोपयोगी वस्तूंचा घरात साठा करून ठेवण्यासाठी लोकांची धावपळ सुरू आहे.

रस्ता डांबरीकरणाची मागणी

दापोली : तालुक्यातील कुटाचा कोंड ते टेटवली रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविताना चालकांची कसरत होत आहेत. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करून डांबरीकरण करण्यात यावे. तसेच मोठमोठे खड्डे बुजवावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

मार्गाचे काम रखडले

देवरुख : तळेकांटे देवरुख या मार्गाचे काम सुरू आहे. मात्र, हे काम गेल्या सात ते आठ महिन्यांपासून धिम्या गतीने करण्यात येत आहे. सध्या या मार्गावर मोठ्या प्रमाणावर धूळ पसरली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासदायक होत आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी प्रवासी करीत आहेत.

माठांना मागणी

देवरुख : गरिबांचा रेफ्रिजरेटर समजल्या जाणाऱ्या माठांना आता ग्रामीण भागात मागणी वाढू लागली आहे. सध्या माठ विक्रेते मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत. राजस्थानी माठांवर डिझाईन असल्याने नागरिक या माठांना पसंती दर्शवित आहेत. सध्या या माठांची विक्री वाढली आहे.

रस्ता कामाला मंजुरी

खेड : तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या खवटी धनगरवाडी रस्त्यासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे आता या दुर्गम वाडीच्या दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे. हा रस्ता झाल्यास या ग्रामस्थांची पाण्याची तसेच विजेचीही गैरसोय दूर होणार असल्याने या ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

व्हाया बसफेरीची मागणी

दापोली : आंजर्लेकडून पाडले, आडे, केळशीकडे जाणारा मार्ग नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणारी एसटी बसफेरी बंद झाली आहे. त्यामुळे या परिसरातील प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन आंजर्ले गाव व्हाया एसटी बसफेरी सुरू करण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.