शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

विघ्ने तीच, उत्साहही तोच!

By admin | Updated: September 10, 2016 00:40 IST

-- कोकण किनारा

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या माणसांसमोरची विघ्ने यंदाही कमी झाली नाहीत. महामार्ग खड्ड्यांनी भरलेलाच आहे. जादा रेल्वे, जादा एस्. टी. बसेस सोडूनही गर्दी, चेंगराचेंगरी तशीच आहे. धान्य, भाजीपाला महागलेलाच आहे. पण तरीही लोकांच्या उत्साहात कमी नाही. बाप्पांच्या आगमनाचा, पुजेचा आनंद तेवढाच आहे. बऱ्याच दिवसांनी नातेवाईकांना भेटायला मिळण्याचा आनंद तोच आहे. यंदा त्यातल्या त्यात जमेची बाजू एवढीच की ऐन गणेशोत्सवात कुठे मुसळधार पाऊस पडला नाहीये. त्यामुळे बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या आहेत आणि मुंबैकरांच्या आनंदाला उधाण आलं आहे.गणेशोत्सव दरवर्षीच येतो. कामानिमित्त आपलं मूळ घर, मूळ गाव सोडून बाहेर गेलेली माणसं एका अनामिक ओढीने गावाकडे येतात. आरास सजते. मंडपीच्या झाडोऱ्याची टवटवी यजमानांच्या चेहऱ्यावर झळकते. दोन, चार, पाच दिवस रजा काढून आलेले मुंबईकर वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा या दिवसात साठवून घेतात आणि पुन्हा मार्गस्थ होतात धकाधकीच्या आयुष्याकडे.काय असतं नेमकं या दिवसात? वर्षानुवर्षे रजा घेऊन गणपतीला गावी येणाऱ्या या मुंबईकरांच्या मनात नेमकं असतं तरी काय? काय करतात ते गावाला येऊन? एरवी असतं तसंच गाव याही दिवसात असतं ना? पण या दिवसांचं खास वैशिष्ट्य काय? एरवी जनरलच्या डब्यातून झोपून प्रवास करता येतो. पण मग रिझर्व्हेशनच्या डब्यातही प्रचंड गर्दी उसळते अशा प्रवासाची एनर्जी कुठून मिळत असेल? लोंबकळत का होईना, पण गावाला वेळेत पोहोचायचंच असतं.या साऱ्या धडपडीमागे एक श्रद्धा आहे. बाप्पा हा मुळात साऱ्यांचा आवडता देव. त्यामुळे त्याची प्रतिष्ठापना करण्यातला आनंद वेगळा. कामानिमित्त गाव आणि मूळ घर सोडायला लागलं, ही खंत काहीशी भरून निघते ती याच दिवसात. पोटाची खळगी भरण्यासाठी घरातली तरूण मंडळी मुंबई-पुण्याकडे गेली, घरात फक्त म्हातारा-म्हातारी आणि असालाच तर घर-शेती बघणारा एक भाऊ आणि त्याचं कुटुंब... कोकणातल्या असंख्य ग्रामीण भागांमधलं हे चित्र. एरवी कसलीच जाग नसलेल्या या घरांना मुंबईकरांच्या येण्याने चैतन्य येतं. म्हातारा-म्हातारीच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांच्या जागी समाधानाच्या रेषा उमटतात. कुणा एका घरात आलेले पाहुणे वाडीतल्या प्रत्येक घराला कळतात. मग चार दिवस फक्त आपलेपणाचाच शिडकावा होत राहतो, विचारपूस होते. आरत्या, भजनांच्या निमित्ताने पुन्हा-पुन्हा भेटी होत राहतात.गणपतीची आरास तयार करण्यापासून विसर्जनाच्या क्षणापर्यंत कोकणातली घरं आनंदानं खिदळत असतात. मुळात गावात पाऊल ठेवल्या ठेवल्याच येताना लोंबकळत केलेल्या प्रवासाचा ताण संपून जातो. घराच्या वाटेवर भेटणारी गावातली चार माणसं ‘अरे तू अमक्याचा ना रे... अरे तू तमक्याचा ना रे....’ अशी चौकशी करतात आणि त्याचवेळी मुंबईकर पुन्हा गाववाला होऊन जातो. परतीच्या प्रवासातही लोंबकळणं चुकत नाही. तीन महिन्यांपूर्वी रिझर्व्हेशन केलेले असते तरी रिझर्व्हेशनच्या डब्यातही भरपूरच गर्दी असते. पण मिळालेली एनर्जी इतकी भरपूर असते की या लोंबकळण्याचाही त्रास होत नाही.काळ कितीही बदलत गेला तरी गणेशोत्सवाचा आनंद कमी झालेला नाही. उलट दिवसागणिक तो वाढतोच आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावात हेच चित्र दिसतं. मे महिन्यानंतर काहीशा मंदीत चालणाऱ्या या दोन्ही जिल्ह्यातील बाजारपेठा गणेशोत्सवात भरभरून वाहतात. खूप मोठी आर्थिक उलाढाल या काळात दोन्ही जिल्ह्यात होते. काही लाख माणसे या दोन जिल्ह्यांमध्ये येतात. गणपतीची आरास तयार करण्याचे साहित्य, मिठाई, कपडे यासारख्या खरेदीबरोबरच घरांची डागडुजी, रंगरंगोटी यासारख्या गोष्टींवरही मोठ्या प्रमाणात खर्च होतो. आर्थिक दृष्ट्या विचार केला तर दोन्ही जिल्ह्यात कोट्यवधी रूपयांची उलाढाल होते. अगदी फुल विक्रेत्यांपासून टी.व्ही., फ्रीज विकणाऱ्यांपर्यंत सर्वच दुकानांमध्ये गर्दी लोटते. यंदाही तेच चित्र दिसतंय. महाडमधल्या दुर्घटनेमुळे यंदा मुंबईकरांची संख्या थोडी कमी होईल की काय, अशी भीती होती. पण कितीही विघ्नं आली तरी कोकणी माणसाचं गणेशोत्सवावरचं प्रेम कायम आहे, हेच यातून दिसून आलं. शिमगा आणि गणपती सणादरम्यान कितीही विघ्नं आली तरी कोकण असाच फुललेला दिसेल, हे नक्की.मनोज मुळ््ये