शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षितता महत्वाची (फेरफटका)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:19 IST

शासनाकडून आरोग्याबाबत दक्षता घेण्यासाठी सूचनाही करण्यात येत असून पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, प्रशासन सक्रिय झाले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी ...

शासनाकडून आरोग्याबाबत दक्षता घेण्यासाठी सूचनाही करण्यात येत असून पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, प्रशासन सक्रिय झाले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. राज्य सरकारने प्रशासनाला तयारी करण्याचे आदेश दिले असल्याने लाॅकडाऊनची शक्यता आहे. होळीच्या सणानंतर दि.२ एप्रिलच्या बैठकीत लाॅकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाचा प्रत्येक विभाग सतर्क झाला आहे.

गतवर्षी लाॅकडाऊनमुळे उद्योग, व्यवसाय ठप्प झाल्याचे पडसाद सर्वांनाच सोसावे लागले. गतवर्षी अनेक भारतीयांना आखाती प्रदेश, परदेशातील उद्योग व्यवसाय बंद झाल्याने मायदेशी परतावे लागले होते. इतकेच नव्हे तर कित्येक स्थानिकांंना नोकरी गमावल्याने आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले होते पैकी काहीजणांनी धक्का पचवता न आल्याने आत्महत्येचा मार्ग अवलंबला. त्यामुळे कित्येक घरे, संसार उद्‌ध्वस्त झाले आहेत. हळूहळू उद्योग, व्यवसायांची गाडी रूळावर येत असताना, पुन्हा लाॅकडाऊनचे संकेत जनमाणसांना धक्का देणारे आहेत.

रत्नागिरी जिल्ह्याची अर्थव्यवस्था आंबा, काजू, मत्स्य, पर्यटन या प्रमुख चार स्तंभांवर उभी आहे. मात्र, यावर्षी ऋतुमानातील बदलामुळे आधीच आंबा उत्पादन धोक्यात असताना लाॅकडाऊनमध्ये आंबा विक्री व्यवस्थेवर परिणाम होण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत आहे. काजू बी खरेदी सुरू झाली असली तरी दर कमी आहेत. मासेमारी सुरू असली तरी खर्चाच्या तुलनेत मासळी सापडत नसल्याने मच्छिमारी संकटात आहे. कोरोनामुळे दिवाळीनंतर मंदिरे सुरू झाली. त्यानंतर पर्यटकांचे आगमन सुरू झाले. गतवर्षी पर्यटन लाॅकडाऊनमुळे आठ ते नऊ महिने बंद असल्याने संबंधित व्यवसायावर परिणाम झाला. एकूणच समाजातील प्रत्येक घटकांची आर्थिक स्थिती कमजोर झाली असली तरी लाॅकडाऊनचा निर्णय प्रशासनाला नाईलाजाने घ्यावा लागणार आहे. मात्र, प्राप्त परिस्थितीत समाजातील प्रत्येक घटकांना उभारण्यासाठी मनोबल उंचावणे गरजेचे आहे. रुग्णवाढीमुळे लाॅकडाऊन हा पर्याय निवडावा लागला तरी सर्वसामान्यांच्या रोजगारावर परिणाम होणार नाही, याबाबत विचार करूनच निर्बंध जारी करणे आवश्यक आहे. कोरोना चाचणी पाॅझिटीव्ह आली तर आपल्याला योग्य उपचार मिळतील, विलगीकरणात सुविधा प्राप्त होतील की नाही यामुळे कित्येक चाचणी करणे टाळत आहेत. शिवाय युवावर्गात कोरोनाबाबत बेफिकीरी अधिक आहे. त्यामुळे लाॅकडाऊन व त्याचे पडसाद टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. मास्क, सॅनिटायझर वापराबरोबर सामाजिक सुरक्षितता गरजेची आहे.