शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सुरक्षितता महत्वाची (फेरफटका)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:19 IST

शासनाकडून आरोग्याबाबत दक्षता घेण्यासाठी सूचनाही करण्यात येत असून पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, प्रशासन सक्रिय झाले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी ...

शासनाकडून आरोग्याबाबत दक्षता घेण्यासाठी सूचनाही करण्यात येत असून पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, प्रशासन सक्रिय झाले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. राज्य सरकारने प्रशासनाला तयारी करण्याचे आदेश दिले असल्याने लाॅकडाऊनची शक्यता आहे. होळीच्या सणानंतर दि.२ एप्रिलच्या बैठकीत लाॅकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाचा प्रत्येक विभाग सतर्क झाला आहे.

गतवर्षी लाॅकडाऊनमुळे उद्योग, व्यवसाय ठप्प झाल्याचे पडसाद सर्वांनाच सोसावे लागले. गतवर्षी अनेक भारतीयांना आखाती प्रदेश, परदेशातील उद्योग व्यवसाय बंद झाल्याने मायदेशी परतावे लागले होते. इतकेच नव्हे तर कित्येक स्थानिकांंना नोकरी गमावल्याने आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले होते पैकी काहीजणांनी धक्का पचवता न आल्याने आत्महत्येचा मार्ग अवलंबला. त्यामुळे कित्येक घरे, संसार उद्‌ध्वस्त झाले आहेत. हळूहळू उद्योग, व्यवसायांची गाडी रूळावर येत असताना, पुन्हा लाॅकडाऊनचे संकेत जनमाणसांना धक्का देणारे आहेत.

रत्नागिरी जिल्ह्याची अर्थव्यवस्था आंबा, काजू, मत्स्य, पर्यटन या प्रमुख चार स्तंभांवर उभी आहे. मात्र, यावर्षी ऋतुमानातील बदलामुळे आधीच आंबा उत्पादन धोक्यात असताना लाॅकडाऊनमध्ये आंबा विक्री व्यवस्थेवर परिणाम होण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत आहे. काजू बी खरेदी सुरू झाली असली तरी दर कमी आहेत. मासेमारी सुरू असली तरी खर्चाच्या तुलनेत मासळी सापडत नसल्याने मच्छिमारी संकटात आहे. कोरोनामुळे दिवाळीनंतर मंदिरे सुरू झाली. त्यानंतर पर्यटकांचे आगमन सुरू झाले. गतवर्षी पर्यटन लाॅकडाऊनमुळे आठ ते नऊ महिने बंद असल्याने संबंधित व्यवसायावर परिणाम झाला. एकूणच समाजातील प्रत्येक घटकांची आर्थिक स्थिती कमजोर झाली असली तरी लाॅकडाऊनचा निर्णय प्रशासनाला नाईलाजाने घ्यावा लागणार आहे. मात्र, प्राप्त परिस्थितीत समाजातील प्रत्येक घटकांना उभारण्यासाठी मनोबल उंचावणे गरजेचे आहे. रुग्णवाढीमुळे लाॅकडाऊन हा पर्याय निवडावा लागला तरी सर्वसामान्यांच्या रोजगारावर परिणाम होणार नाही, याबाबत विचार करूनच निर्बंध जारी करणे आवश्यक आहे. कोरोना चाचणी पाॅझिटीव्ह आली तर आपल्याला योग्य उपचार मिळतील, विलगीकरणात सुविधा प्राप्त होतील की नाही यामुळे कित्येक चाचणी करणे टाळत आहेत. शिवाय युवावर्गात कोरोनाबाबत बेफिकीरी अधिक आहे. त्यामुळे लाॅकडाऊन व त्याचे पडसाद टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. मास्क, सॅनिटायझर वापराबरोबर सामाजिक सुरक्षितता गरजेची आहे.