शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
4
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
5
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
6
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
7
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
8
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
9
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
10
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
11
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
12
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
13
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
14
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
15
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
16
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
17
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
18
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
19
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
20
WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!

एस. टी. कर्मचाऱ्यांचे विमा कवच गेले कोठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:31 IST

रत्नागिरी : कोरोना तसेच अन्य कारणांमुळे मृत झालेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वारसांची १०० पेक्षा अधिक प्रकरणे मध्यवर्ती कार्यालयात प्रलंबित ...

रत्नागिरी : कोरोना तसेच अन्य कारणांमुळे मृत झालेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वारसांची १०० पेक्षा अधिक प्रकरणे मध्यवर्ती कार्यालयात प्रलंबित आहेत. याबाबत तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे. ५० लाखांचे विमा कवच देताना जाचक अटी घातल्याने आतापर्यंत फक्त दहाजणांनाच याचा लाभ मिळाला आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांना विमा मिळाला नाही, याचा विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली आहे.

एस. टी. कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित असल्याने संघटनेने निर्णायक भूमिका घ्यावी, अशा संतप्त प्रतिक्रिया कामगारांतून उमटत आहेत. त्यामुळे महामंडळाने त्वरित कार्यवाही करावी. कोरोना संकट काळातही एस. टी. कर्मचारी जिवावर उदार होऊन काम करीत आहेत. कर्मचाऱ्यांचा थेट प्रवाशांशी संपर्क येत असल्याने अनेक कर्मचारी बाधित होत आहेत. राज्यभरात मृत कर्मचाऱ्यांची संख्या १४५ झाली आहे. कोविड योद्धा म्हणून एस. टी. कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली जाते. मात्र, त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. महामंडळाच्या वर्धापनदिनी कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा कवच देण्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केले होते. मात्र, परिपत्रकातील जाचक अटींमुळे हे कवच अवघ्या दहा कर्मचाऱ्यांना मिळाले आहे.

कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च मिळण्याबाबतचा निर्णय होऊनही अंमलबजावणी होत नाही. एस. टी. कर्मचाऱ्यांनाही शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १४ दिवसांची खास रजा मिळणे अपेक्षित आहे. तीही दिली जात नाही. अद्याप एस. टी. कर्मचाऱ्यांचे लसीकरण केलेले नाही. आतापर्यंत परिवहन मंत्री अनिल परब यांनी एकच बैठक घेतली. त्यामध्ये वेतनवाढीबाबत एकतर्फी चर्चा करण्यात आली होती. शासकीय कर्मचाऱ्यांबाबत वेतनवाढीचा दर, घरभाडे, भत्ता कर्मचाऱ्यांना देणे आवश्यक आहे. त्याबाबत अंमलबजावणी व्हावी अशी मागणी होत आहे.