शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

संचारबंदी काळात एस. टी. कामगारांचे प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:33 IST

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळ सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा देत असली तरी एस.टी.चे उत्पन्न वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी रत्नागिरी ...

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळ सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा देत असली तरी एस.टी.चे उत्पन्न वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी रत्नागिरी आगाराचे आगार व्यवस्थापक दहा ते पंधरा कर्मचाऱ्यांना एकत्र बोलावून प्रबोधन करीत आहेत. कोरोनामुळे संचारबंदीचे आदेश असताना दहा बाय दहाच्या खोलीत दहा ते पंधरा कर्मचाऱ्यांना बोलावून मार्गदर्शन सुरू आहे. यामुळे प्रशासनाच्या नियमांची पायमल्ली होत असून, कोरोना संसर्गाची भीतीही व्यक्त केली जात आहे.

राज्य परिवहन महामंडळाला अत्यावश्यक सेवा म्हणून लाॅकडाऊनमधून वगळण्यात आले असले तरी प्रवासी भारमानाअभावी एस. टी. आर्थिक संकटात आहे. त्यामुळे कोरोना संकट काळातही एस. टी.चे कर्मचारी जिवाची काळजी न करता सेवा बजावत आहेत. विभागीय पातळीवर कोरोना काळात कर्मचाऱ्यांनी घ्यावयाची काळजी, रुग्णालय, रुग्णवाहिका, उपचाराची आवश्यकता तसेच बाधित कर्मचाऱ्यांनी न घाबरता उपचार घ्यावेत यासाठी प्रबोधन व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ सेवा उपलब्ध व्हावी यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली असली तरी उत्पन्नवाढीच्या प्रबोधनाकरिता कोणतीही समिती स्थापन केलेली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, रत्नागिरी आगारात असे प्रबोधनवर्ग भरवले जात आहेत.

गेले दहा - बारा दिवस रत्नागिरी आगारात प्रबोधनवर्ग सुरू आहे. दहा / बारा बायच्या खोलीत उत्पन्न वाढीसाठी स्वत: आगार व्यवस्थापक मार्गदर्शन करीत आहेत. कर्मचाऱ्यांनी प्रबोधनवर्ग नियमात आहे का, याबाबत विचारणा केली असता, सार्वजनिक वाहतूक सेवा असल्याचे सांगितले जात असून, कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली जात आहे. मात्र, या प्रबोधन वर्गामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने सर्वत्र कडक निर्बंध जारी केले असताना, रत्नागिरी आगार व्यवस्थापकांना प्रबोधन वर्ग घेण्याची परवानगी कोणी दिली आणि त्यामुळे कर्मचारी बाधित झाले तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न कर्मचारी करत आहेत.