शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदी काळात एस. टी. कामगारांचे प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:33 IST

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळ सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा देत असली तरी एस.टी.चे उत्पन्न वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी रत्नागिरी ...

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळ सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा देत असली तरी एस.टी.चे उत्पन्न वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी रत्नागिरी आगाराचे आगार व्यवस्थापक दहा ते पंधरा कर्मचाऱ्यांना एकत्र बोलावून प्रबोधन करीत आहेत. कोरोनामुळे संचारबंदीचे आदेश असताना दहा बाय दहाच्या खोलीत दहा ते पंधरा कर्मचाऱ्यांना बोलावून मार्गदर्शन सुरू आहे. यामुळे प्रशासनाच्या नियमांची पायमल्ली होत असून, कोरोना संसर्गाची भीतीही व्यक्त केली जात आहे.

राज्य परिवहन महामंडळाला अत्यावश्यक सेवा म्हणून लाॅकडाऊनमधून वगळण्यात आले असले तरी प्रवासी भारमानाअभावी एस. टी. आर्थिक संकटात आहे. त्यामुळे कोरोना संकट काळातही एस. टी.चे कर्मचारी जिवाची काळजी न करता सेवा बजावत आहेत. विभागीय पातळीवर कोरोना काळात कर्मचाऱ्यांनी घ्यावयाची काळजी, रुग्णालय, रुग्णवाहिका, उपचाराची आवश्यकता तसेच बाधित कर्मचाऱ्यांनी न घाबरता उपचार घ्यावेत यासाठी प्रबोधन व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ सेवा उपलब्ध व्हावी यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली असली तरी उत्पन्नवाढीच्या प्रबोधनाकरिता कोणतीही समिती स्थापन केलेली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, रत्नागिरी आगारात असे प्रबोधनवर्ग भरवले जात आहेत.

गेले दहा - बारा दिवस रत्नागिरी आगारात प्रबोधनवर्ग सुरू आहे. दहा / बारा बायच्या खोलीत उत्पन्न वाढीसाठी स्वत: आगार व्यवस्थापक मार्गदर्शन करीत आहेत. कर्मचाऱ्यांनी प्रबोधनवर्ग नियमात आहे का, याबाबत विचारणा केली असता, सार्वजनिक वाहतूक सेवा असल्याचे सांगितले जात असून, कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली जात आहे. मात्र, या प्रबोधन वर्गामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने सर्वत्र कडक निर्बंध जारी केले असताना, रत्नागिरी आगार व्यवस्थापकांना प्रबोधन वर्ग घेण्याची परवानगी कोणी दिली आणि त्यामुळे कर्मचारी बाधित झाले तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न कर्मचारी करत आहेत.