शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

ग्रामीण शेती कालबाह्य

By admin | Updated: November 2, 2015 23:59 IST

समीर जाधव : शेतमजूर नव्या मजुरीप्रमाणे न परवडणारे

खेड : अलिकडच्या काळात कोकणातील शेतकऱ्यांनी शेतीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहेत. काही वर्षापूर्वी खरिप हंगामात येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीच्या कामात व्यस्त दिसत असत़ मात्र, आता त्याच्या उलट चित्र असून, ते चिंताजनक आहे. काळाच्या ओघात ग्रामीण शेती कालबाह्य झाली असून, याकरीता शेतकऱ्यांनी मानसिकता बदलण्याची गरज येथील प्रथितयश शेतकरी समीर सूर्यकांत जाधव यांनी व्यक्त केली आहे़ तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी तर आधुनिक शेतीसाठी आवश्यक असलेले शेतमजूर नव्या मजुरीप्रमाणे परवडणार नसल्याने ही शेती करणे आता अशक्य झाल्याचे सांगितले आहे़दरवर्षी शेती करणाऱ्यांची संख्या घटत असून, शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे़ तरूणवर्गही शेतीमध्ये उतरण्यास तयार नसल्याने काळाच्या ओघात कोकणातील शेतीच कालबाह्य होईल की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. कोकणात अनेक गावातून आई - वडील असेपर्यंतच शेती केली जात आहे. त्यापुढील त्यांची पिढी ही शिकलेली असल्याने शेतीत काम करेल, याची खात्री राहिलेली नाही. त्याशिवाय कोकणातील शेतकरी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास अजूनही तयार नसल्याने आपल्याकडील शेती तोट्यातच राहते.़ त्यातच महागाई वाढल्याने शेती करणे अवघड होत चालले आहे. कोकणात अनेकजण स्वत:ची शेती नसल्याने अर्ध्या हिश्शाने शेती करतात़ त्यामुळे तीही आता परवडत नाही. गावागावातून शेतीसाठी मिळणारे मजूरही कमी असून, उपलब्ध मजुरांची मजुरी शेतकऱ्यांना न परवडणारी आहे. कष्ट ज्यादा आणि फायद्यापेक्षा तोटाच जास्त हे लक्षात आल्याने बाहेरूनच धान्य विकत घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांनी स्वीकारल्याचे दिसून येत आहे. एकूणच या सर्वांमधून एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे कोकणातील शेतकरी जोपर्यंत आपल्या पारंपरिक शेतीचा हट्ट सोडत नाहीत तोपर्यंत त्यात सुधारणा होणे शक्य नाही़ शेती ही मागासलेल्या अवस्थेतच राहणार असून, असलेली शेती देखील कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे़ अनेक शेतकऱ्यांनी याबाबत आपली भूमिका प्रकर्षाने मांडली आहे़ यामध्ये त्यांची उदासीनता आणि नकारात्मताच दिसून येत असून, यामध्ये बदल घडवून आणणे आवश्यक असल्याचे समीर जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)