शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण शेती कालबाह्य

By admin | Updated: November 2, 2015 23:59 IST

समीर जाधव : शेतमजूर नव्या मजुरीप्रमाणे न परवडणारे

खेड : अलिकडच्या काळात कोकणातील शेतकऱ्यांनी शेतीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहेत. काही वर्षापूर्वी खरिप हंगामात येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीच्या कामात व्यस्त दिसत असत़ मात्र, आता त्याच्या उलट चित्र असून, ते चिंताजनक आहे. काळाच्या ओघात ग्रामीण शेती कालबाह्य झाली असून, याकरीता शेतकऱ्यांनी मानसिकता बदलण्याची गरज येथील प्रथितयश शेतकरी समीर सूर्यकांत जाधव यांनी व्यक्त केली आहे़ तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी तर आधुनिक शेतीसाठी आवश्यक असलेले शेतमजूर नव्या मजुरीप्रमाणे परवडणार नसल्याने ही शेती करणे आता अशक्य झाल्याचे सांगितले आहे़दरवर्षी शेती करणाऱ्यांची संख्या घटत असून, शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे़ तरूणवर्गही शेतीमध्ये उतरण्यास तयार नसल्याने काळाच्या ओघात कोकणातील शेतीच कालबाह्य होईल की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. कोकणात अनेक गावातून आई - वडील असेपर्यंतच शेती केली जात आहे. त्यापुढील त्यांची पिढी ही शिकलेली असल्याने शेतीत काम करेल, याची खात्री राहिलेली नाही. त्याशिवाय कोकणातील शेतकरी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास अजूनही तयार नसल्याने आपल्याकडील शेती तोट्यातच राहते.़ त्यातच महागाई वाढल्याने शेती करणे अवघड होत चालले आहे. कोकणात अनेकजण स्वत:ची शेती नसल्याने अर्ध्या हिश्शाने शेती करतात़ त्यामुळे तीही आता परवडत नाही. गावागावातून शेतीसाठी मिळणारे मजूरही कमी असून, उपलब्ध मजुरांची मजुरी शेतकऱ्यांना न परवडणारी आहे. कष्ट ज्यादा आणि फायद्यापेक्षा तोटाच जास्त हे लक्षात आल्याने बाहेरूनच धान्य विकत घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांनी स्वीकारल्याचे दिसून येत आहे. एकूणच या सर्वांमधून एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे कोकणातील शेतकरी जोपर्यंत आपल्या पारंपरिक शेतीचा हट्ट सोडत नाहीत तोपर्यंत त्यात सुधारणा होणे शक्य नाही़ शेती ही मागासलेल्या अवस्थेतच राहणार असून, असलेली शेती देखील कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे़ अनेक शेतकऱ्यांनी याबाबत आपली भूमिका प्रकर्षाने मांडली आहे़ यामध्ये त्यांची उदासीनता आणि नकारात्मताच दिसून येत असून, यामध्ये बदल घडवून आणणे आवश्यक असल्याचे समीर जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)