शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

मंडणगड तालुक्यातील ग्रामीण भाग उपेक्षितच...

By admin | Updated: April 28, 2015 23:46 IST

लोकप्रतिनिधी, प्रशासनाची डोळेझाक : कळकवणेत एस. टी. नाही, रस्ते दुर्लक्षित

देव्हारे : मंडणगड तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांची परिस्थिती बिकट झाली असून विकासाच्या सर्व प्रश्नांवर हा भाग मागे असल्याचे पाहायला मिळत आहे. रस्ते, वीज, पाणी या प्रश्नांवर तालुक्यात कोणीही लक्ष देत नसल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. कळकवणे, रानवली, केरीळ, बलदेवाडी गावांचा समावेश आहे़ आपल्या ग्रामिण भागाचा विकास होईल, या उद्देशाने लोकं त्यांना निवडून देतात. मात्र, ग्रामीण भागांच्या या गरजांकडे वर्षानुवर्ष कानाडोळा करण्यात येतो़ याला जबाबदार कोण? या गावाना तालुक्यातील जोडणारे रस्ते आजही लाल मातीचे आहेत.एस. टी.चे दर्शनही झाले नसलेल्या कळकवणे गावात १०० पेक्षा अधिक घरे आहेत़ या गावाची लोकसंख्या ३५० आहे़ मात्र, गावाला एस. टी. येत नसल्याने या गावातील शालेय विद्यार्थ्यांना लाल मातीच्या रत्यावरून पायीच चालत शाळा, हायस्कूल व कॉलेजला यावे लागते.़ हीच अवस्था रानवली, केरीळ व बलदेवाडी या गावांची आहे. या गावांमध्ये दोनशेपेक्षा जास्त घरे आहेत़ व या तिन्ही गावांची लोकसंख्या सुमारे सातशेपेक्षा जास्त आहे. मात्र, एस. टी.चे दर्शन या गावांनाही झालेले नाही. या गावांना तालुक्याशी जोडणारे रस्ते आजही डांबरीकरण्याच्या प्रतीक्षेत आहेत.़ असलेल्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे या गावांमधे रिक्षा घेऊन जाणेही जोखमीचे होते. गावामधे एखादी व्यक्ती आजारी पडल्यास तिला खाजगी वाहनाने घेऊन जाण्याशिवाय दुसरा पर्यायच राहत नाही. तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था पाहिली की, या रस्त्यांवरून प्रवास करणे म्हणजे जीवघेणे वाटते. या रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था रस्त्यांची झालेली आहे.या सर्व गावांमधे प्राथमिक शाळा आहेत़ मात्र, यांना माध्यामिक शिक्षणासाठी परीसरातील मध्यवर्ती ठिकाणी देव्हारे येथे यावे लागते. एस. टी. नसल्याने या गावांमधील विद्यार्थ्यांना देव्हारेपासूनचे अंतर पायी चालत जावे लागते. त्याचबरोबर बाजारासाठी येणाऱ्या ग्रामस्थांनाही पायी चालत जाण्या येण्याशिवाय पर्याय उरत नाही़ (वार्ताहर)