शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्तीचे वय ५८वरुन ६० झाल्याची अफवा

By admin | Updated: April 8, 2015 00:31 IST

शासन निर्णय नाही : व्हॉटस्अ‍ॅपच्या अफवेमुळे अनेकांचे धाबे दणाणले!

सागर पाटील - टेंभ्ये -राज्य शासनाने कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वरुन ६० केले असल्याचे वृत्त गेल्या चार दिवसांपासून व्हॉटस्अ‍ॅपवर फिरत आहे. या वृत्तामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत, तर काहीजणांना अत्यानंद झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रत्यक्षात मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. गेल्या काही वर्षांपासून हा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. आर्थिक बाबीशी संबंधित असल्याने याबाबत इतक्या तडकाफडकी निर्णय घेतला जाणार नसल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.राज्य शासनाने राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८वरून ६० केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन तशी घोषणा केल्याची माहिती दि. १ एप्रिल रोजी व्हॉटस्अ‍ॅपवर टाकण्यात आली. हा हा म्हणता हे वृत्त सर्वत्र पसरले व शिक्षण क्षेत्रातील अनेकांचे धाबे दणाणले तर काहींना अत्यानंद झाला. या वृत्तामध्ये पुढे असे नमूद करण्यात आले होते की, जानेवारी २०१५ पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. तत्काळ प्रभावाने निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याने ३९६७ निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. असा उल्लेख असल्याने मुख्याध्यापकपदाची सूत्र स्वीकारलेल्या अनेक नवनिर्वाचित मुख्याध्यापकांना मोठा धक्का बसला. याचवेळी ही बातमी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचल्यामुळे आपल्याला पुन्हा दोन वर्षे नोकरी करायला मिळणार असल्याने त्यांना अत्यानंद झाला. त्यामुळे एकाच वेळी ‘कही खुशी कही गम’ असे वातावरण पाहायला मिळाले.प्रत्यक्षात मात्र याबाबत शासन स्तरावरुन कोणताही निर्णय झालेला नाही. एका संघटनेशी बोलताना मुख्य सचिवांनी हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविणार असल्याचे केवळ सांगितले असल्याचे समजते. याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरु आहे. परंतु हा निर्णय आर्थिक बाबीशी संबंधित असल्याने याबाबत तडकाफडकी निर्णय होणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे. अशा निर्णयाची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने करणे अशक्य आहे. क्षणभर अनेकजणांच्या हृदयाचा ठोका मात्र चुकला, हे या वृत्ताने दाखवून दिले. नेटवर्कमध्ये येणाऱ्या बातम्या, शासनस्तरावरील संपर्क क्षेत्र, महत्त्वपूर्ण घटकांबाबत पिकविली जाणारी वृत्त याबाबत आता गांभीर्याने घेण्याची वेळ आली असून, निवृत्तीचे वय एका दिवसात ठरणार नाही, हे माहीत असणाऱ्यांचा विश्वास बसावा, हे नवलच मानायला लागेल, असे मत व्यक्त केले जात आहे.सेवानिवृत्तीचे वय ५८वरुन ६० झाल्याचा कोणताही अधिकृत निर्णय नाही. अफवेला बळी पडू नये. हा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. अजून याबाबत निर्णय जाहीर केलेला नाही. शासन निर्णय झाल्यानंतर यावर विश्वास ठेवणे योग्य आहे. सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यासंदर्भात निर्णय होताच संबंधितांना रितसर कळविण्यात येईल.- ज्ञानेश्वर कानडे,राज्य अध्यक्ष, माध्यमिक अध्यापक संघ