शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
5
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
6
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
7
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
8
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
9
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
10
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
11
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."
12
Operation Sindoor: मोठी बातमी! कंदहार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
13
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानच्या दोन मित्रराष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर, जयशंकर यांची भेट
15
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
16
तुम्हीही वारंवार पर्सनल लोन घेता? मग 'हे' ५ मोठे तोटे समजून घ्या; अनेकजण करतात दुर्लक्ष
17
Mumbai: पत्नीची हत्या करून मृतदेह बेडमध्ये लपवला, मुंबईतील गोरेगाव येथील धक्कादायक प्रकार
18
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
19
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
20
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!

सेवानिवृत्तीचे वय ५८वरुन ६० झाल्याची अफवा

By admin | Updated: April 8, 2015 00:31 IST

शासन निर्णय नाही : व्हॉटस्अ‍ॅपच्या अफवेमुळे अनेकांचे धाबे दणाणले!

सागर पाटील - टेंभ्ये -राज्य शासनाने कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वरुन ६० केले असल्याचे वृत्त गेल्या चार दिवसांपासून व्हॉटस्अ‍ॅपवर फिरत आहे. या वृत्तामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत, तर काहीजणांना अत्यानंद झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रत्यक्षात मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. गेल्या काही वर्षांपासून हा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. आर्थिक बाबीशी संबंधित असल्याने याबाबत इतक्या तडकाफडकी निर्णय घेतला जाणार नसल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.राज्य शासनाने राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८वरून ६० केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन तशी घोषणा केल्याची माहिती दि. १ एप्रिल रोजी व्हॉटस्अ‍ॅपवर टाकण्यात आली. हा हा म्हणता हे वृत्त सर्वत्र पसरले व शिक्षण क्षेत्रातील अनेकांचे धाबे दणाणले तर काहींना अत्यानंद झाला. या वृत्तामध्ये पुढे असे नमूद करण्यात आले होते की, जानेवारी २०१५ पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. तत्काळ प्रभावाने निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याने ३९६७ निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. असा उल्लेख असल्याने मुख्याध्यापकपदाची सूत्र स्वीकारलेल्या अनेक नवनिर्वाचित मुख्याध्यापकांना मोठा धक्का बसला. याचवेळी ही बातमी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचल्यामुळे आपल्याला पुन्हा दोन वर्षे नोकरी करायला मिळणार असल्याने त्यांना अत्यानंद झाला. त्यामुळे एकाच वेळी ‘कही खुशी कही गम’ असे वातावरण पाहायला मिळाले.प्रत्यक्षात मात्र याबाबत शासन स्तरावरुन कोणताही निर्णय झालेला नाही. एका संघटनेशी बोलताना मुख्य सचिवांनी हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविणार असल्याचे केवळ सांगितले असल्याचे समजते. याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरु आहे. परंतु हा निर्णय आर्थिक बाबीशी संबंधित असल्याने याबाबत तडकाफडकी निर्णय होणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे. अशा निर्णयाची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने करणे अशक्य आहे. क्षणभर अनेकजणांच्या हृदयाचा ठोका मात्र चुकला, हे या वृत्ताने दाखवून दिले. नेटवर्कमध्ये येणाऱ्या बातम्या, शासनस्तरावरील संपर्क क्षेत्र, महत्त्वपूर्ण घटकांबाबत पिकविली जाणारी वृत्त याबाबत आता गांभीर्याने घेण्याची वेळ आली असून, निवृत्तीचे वय एका दिवसात ठरणार नाही, हे माहीत असणाऱ्यांचा विश्वास बसावा, हे नवलच मानायला लागेल, असे मत व्यक्त केले जात आहे.सेवानिवृत्तीचे वय ५८वरुन ६० झाल्याचा कोणताही अधिकृत निर्णय नाही. अफवेला बळी पडू नये. हा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. अजून याबाबत निर्णय जाहीर केलेला नाही. शासन निर्णय झाल्यानंतर यावर विश्वास ठेवणे योग्य आहे. सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यासंदर्भात निर्णय होताच संबंधितांना रितसर कळविण्यात येईल.- ज्ञानेश्वर कानडे,राज्य अध्यक्ष, माध्यमिक अध्यापक संघ