शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

शासन निर्णयामुळे अभियंता होण्याचा मार्ग झाला सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:31 IST

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी गणित व भौतिकशास्त्र विषय बंधनकारक नसल्याचे शासनाने जाहीर केले ...

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी गणित व भौतिकशास्त्र विषय बंधनकारक नसल्याचे शासनाने जाहीर केले आहे. यामुळे ज्या मुलांना योग्य मार्गदर्शन लाभत नाही, शिवाय ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांचे अभियंता होण्याचे स्वप्न आहे, ते नक्कीच पूर्ण होणार आहे. मात्र, अभ्यासक्रम शिकताना, मुलांना सखोल अभ्यास करावा लागणार आहे.

वास्तविक शासनाकडून नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात येत आहे. बारावी विज्ञान अभ्यासक्रम गणित, भौतिकशास्त्र विषय न घेता मुले पास होतात. मात्र, त्यांना अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करावयाचे असते अशा मुलांसाठी जणू संधी प्राप्त झाली आहे. दहावीनंतर अकरावी, बारावीत गणित विषय नसल्याने अभियांत्रिकी अभ्यासक्रम शिकणे अवघड होणार आहे. मात्र, त्यासाठी संलग्न अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. अभियांत्रिकी शिक्षणानंतर नोकरीच्या संधी असल्याने या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असतो, मात्र चुकीच्या निर्णयामुळे प्रवेशाचा प्रश्न उद्भवतो, त्यांच्यासाठी शासनाने घेतलेला निर्णय चांगला आहे. शासन निर्णय जाहीर झाला असला तरी त्याबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त होणे अपेक्षित आहेत.

गणित शिकावेच लागणार

गणित, भौतिकशास्त्र दोन्ही विषय अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये महत्त्वपूर्ण आहेत. दहावीनंतर गणित नसतानाही अभियांत्रिकीचा अभ्यास करताना अप्लायड मॅथ्स शिकावे लागणार आहे. कमी वेळेत शिकण्यासाठी त्यांना जास्त वेळ तर द्यावा लागेल, शिवाय अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहेत. आयटी, संगणक व तत्सम् अभियांत्रिकी अभ्यासक्रमानंतर रोजगाराच्या संधी असल्याने शासनाचा निर्णय होतकरू मुलांसाठी योग्य आहे.

गणित व भौतिकशास्त्र या दोन विषयांशिवाय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्श्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या निर्णयामुळे सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी जणू संधी प्राप्त झाली आहे. मात्र अप्लायड मॅथ्सचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यासाठी कमी वेळेत, अधिक परिश्रम घेऊन मुलांना यश मिळणार आहे. अभ्यासक्रमात होणारे नवीन बदल स्वीकारावे लागणार आहेत.

- डॉ. विनायक भराडी, आयटी विभागप्रमुख, फिनोलेक्स ॲकॅडमी

योग्य मार्गदर्शनाअभावी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश हुकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या नवीन निर्णयामुळे जणू नवी संधी उपलब्ध झाली आहे. मात्र अभियांत्रिकी शिक्षण घेताना भौतिकशास्त्र, गणित विषय शिकावेच लागणार आहेत. परंतु नवीन निर्णयामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशासाठी अनेक जागा रिक्त राहतात. भविष्यात रिक्त जागेचा प्रश्न मार्गी लागेल. आयटी, संगणक व तत्सम क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहेत.

प्रा. मिलिंद किरकिरे, मेकॅनिकल विभाग प्रमुख फिनोलेक्स ॲकॅडमी