शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

शासन निर्णयामुळे अभियंता होण्याचा मार्ग झाला सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:31 IST

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी गणित व भौतिकशास्त्र विषय बंधनकारक नसल्याचे शासनाने जाहीर केले ...

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी गणित व भौतिकशास्त्र विषय बंधनकारक नसल्याचे शासनाने जाहीर केले आहे. यामुळे ज्या मुलांना योग्य मार्गदर्शन लाभत नाही, शिवाय ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांचे अभियंता होण्याचे स्वप्न आहे, ते नक्कीच पूर्ण होणार आहे. मात्र, अभ्यासक्रम शिकताना, मुलांना सखोल अभ्यास करावा लागणार आहे.

वास्तविक शासनाकडून नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात येत आहे. बारावी विज्ञान अभ्यासक्रम गणित, भौतिकशास्त्र विषय न घेता मुले पास होतात. मात्र, त्यांना अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करावयाचे असते अशा मुलांसाठी जणू संधी प्राप्त झाली आहे. दहावीनंतर अकरावी, बारावीत गणित विषय नसल्याने अभियांत्रिकी अभ्यासक्रम शिकणे अवघड होणार आहे. मात्र, त्यासाठी संलग्न अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. अभियांत्रिकी शिक्षणानंतर नोकरीच्या संधी असल्याने या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असतो, मात्र चुकीच्या निर्णयामुळे प्रवेशाचा प्रश्न उद्भवतो, त्यांच्यासाठी शासनाने घेतलेला निर्णय चांगला आहे. शासन निर्णय जाहीर झाला असला तरी त्याबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त होणे अपेक्षित आहेत.

गणित शिकावेच लागणार

गणित, भौतिकशास्त्र दोन्ही विषय अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये महत्त्वपूर्ण आहेत. दहावीनंतर गणित नसतानाही अभियांत्रिकीचा अभ्यास करताना अप्लायड मॅथ्स शिकावे लागणार आहे. कमी वेळेत शिकण्यासाठी त्यांना जास्त वेळ तर द्यावा लागेल, शिवाय अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहेत. आयटी, संगणक व तत्सम् अभियांत्रिकी अभ्यासक्रमानंतर रोजगाराच्या संधी असल्याने शासनाचा निर्णय होतकरू मुलांसाठी योग्य आहे.

गणित व भौतिकशास्त्र या दोन विषयांशिवाय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्श्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या निर्णयामुळे सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी जणू संधी प्राप्त झाली आहे. मात्र अप्लायड मॅथ्सचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यासाठी कमी वेळेत, अधिक परिश्रम घेऊन मुलांना यश मिळणार आहे. अभ्यासक्रमात होणारे नवीन बदल स्वीकारावे लागणार आहेत.

- डॉ. विनायक भराडी, आयटी विभागप्रमुख, फिनोलेक्स ॲकॅडमी

योग्य मार्गदर्शनाअभावी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश हुकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या नवीन निर्णयामुळे जणू नवी संधी उपलब्ध झाली आहे. मात्र अभियांत्रिकी शिक्षण घेताना भौतिकशास्त्र, गणित विषय शिकावेच लागणार आहेत. परंतु नवीन निर्णयामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशासाठी अनेक जागा रिक्त राहतात. भविष्यात रिक्त जागेचा प्रश्न मार्गी लागेल. आयटी, संगणक व तत्सम क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहेत.

प्रा. मिलिंद किरकिरे, मेकॅनिकल विभाग प्रमुख फिनोलेक्स ॲकॅडमी