शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

राजापुरात पावसाचा रुद्रावतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:20 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : राजापूर शहर आणि तालुक्यात गेल्या बारा दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसाने बुधवारपासून रौद्ररूप धारण केले. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : राजापूर शहर आणि तालुक्यात गेल्या बारा दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसाने बुधवारपासून रौद्ररूप धारण केले. अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आल्याने पुराच्या पाण्याचे राजापूर शहरात शिरले आहे. पूरस्थितीमुळे ग्रामीण भागातील एस.टी. फेऱ्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. अर्जुना नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील अर्जुना नदीवरील वरचीपेठ येथील ब्रिटिशकालीन पूल गुरुवारी दुपारी साडेबारा वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

सततच्या पुराचा सर्वाधिक फटका शहर बाजारपेठेला बसला आहे. या हंगामात तब्बल सहा वेळा पुराच्या पाण्याने शहर बाजारपेठेत शिरकाव केला. बुधवारी सायंकाळपासून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे गुरुवारी पुन्हा एकदा शहर बाजारपेठेत शिरकाव केला. पुराच्या पाण्याने यावेळी जवाहर चौक मार्गे कुशे मेडिकल, नवाळे कॉम्प्लेक्सपर्यंत, तर बाजारपेठेत अभ्यंकर ग्राहक बाजार व मुन्शीनाका मार्गे उर्दू शाळेपर्यंत धडक मारली, तर मालपेकर रोड पाण्याखाली गेला आहे. मात्र, नगरपरिषदेने पुराचा धोका लक्षात घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन केल्याने सर्वांनी वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवल्या आहेत. मात्र, बाजारपेठेत पाणी शिरल्याने बहुतांशी दुकाने बंद राहिली आहेत.

शहरातील शिवाजीपथ, चिंचबांध, बंदधक्का, वरचीपेठ, कोंढेतड, आंबेवाडी, गुजराळी परिसरातील रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे, तर वरचीपेठ येथील राजीव गांधी क्रीडांगण पाण्याखाली गेले आहे, तर शहर बाजारपेठेला जोडणारा कोंढेतड पूल, कै. वैशंपायन गुरुजी पूल, जवाहरचौक नजीकचा नैनेसाहेब पूल, भटाळी येथील कै. वासुकाका जोशी पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या भागाचा शहर बाजारपेठेशी असलेला संपर्क तुटला आहे. पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने राजापूर-शीळ मार्गे चिखलगाव रस्ता गेले बारा दिवस पाण्याखाली गेला आहे.

तालुक्यातील परटवली-ओशिवळे ताम्हाणे रस्ता पाण्याखाली गेला आहे. तसेच कशेळी येथील गणपत राड्ये यांचा गोठा कोसळून नुकसान झाले आहे, तर हर्डी-रानतळे रस्ता पुन्हा खचला आहे. महाळुंगे बौद्धवाडी येथे बुद्धविहारावर झाड पडून नुकसान झाले आहे. परटवली ग्रामपंचायत इमारतीमध्ये, तसेच सलाम बलबले यांच्या घरामध्ये अर्जुनाच्या पुराचे पाणी शिरले आहे.

राजापूर शहरात गुरुवारी सकाळी पुराचे पाणी शिरताच तहसीलदार प्रतिभा वराळे, पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, माजी आमदार अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे, मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी पाहणी केली.

-----------------------------------------

वीज पुरवठा विस्कळीत

गेले बारा दिवस वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठ्यावर परिणाम होत आहे. वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. मात्र, महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी भर पावसातही जिवाची बाजी लावून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे अनेक भागात माेठ्या प्रमाणात पाऊस पडून वीजपुरवठा सुरळीत सुरू आहे.