शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरात पावसाचा रुद्रावतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:20 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : राजापूर शहर आणि तालुक्यात गेल्या बारा दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसाने बुधवारपासून रौद्ररूप धारण केले. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : राजापूर शहर आणि तालुक्यात गेल्या बारा दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसाने बुधवारपासून रौद्ररूप धारण केले. अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आल्याने पुराच्या पाण्याचे राजापूर शहरात शिरले आहे. पूरस्थितीमुळे ग्रामीण भागातील एस.टी. फेऱ्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. अर्जुना नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील अर्जुना नदीवरील वरचीपेठ येथील ब्रिटिशकालीन पूल गुरुवारी दुपारी साडेबारा वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

सततच्या पुराचा सर्वाधिक फटका शहर बाजारपेठेला बसला आहे. या हंगामात तब्बल सहा वेळा पुराच्या पाण्याने शहर बाजारपेठेत शिरकाव केला. बुधवारी सायंकाळपासून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे गुरुवारी पुन्हा एकदा शहर बाजारपेठेत शिरकाव केला. पुराच्या पाण्याने यावेळी जवाहर चौक मार्गे कुशे मेडिकल, नवाळे कॉम्प्लेक्सपर्यंत, तर बाजारपेठेत अभ्यंकर ग्राहक बाजार व मुन्शीनाका मार्गे उर्दू शाळेपर्यंत धडक मारली, तर मालपेकर रोड पाण्याखाली गेला आहे. मात्र, नगरपरिषदेने पुराचा धोका लक्षात घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन केल्याने सर्वांनी वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवल्या आहेत. मात्र, बाजारपेठेत पाणी शिरल्याने बहुतांशी दुकाने बंद राहिली आहेत.

शहरातील शिवाजीपथ, चिंचबांध, बंदधक्का, वरचीपेठ, कोंढेतड, आंबेवाडी, गुजराळी परिसरातील रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे, तर वरचीपेठ येथील राजीव गांधी क्रीडांगण पाण्याखाली गेले आहे, तर शहर बाजारपेठेला जोडणारा कोंढेतड पूल, कै. वैशंपायन गुरुजी पूल, जवाहरचौक नजीकचा नैनेसाहेब पूल, भटाळी येथील कै. वासुकाका जोशी पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या भागाचा शहर बाजारपेठेशी असलेला संपर्क तुटला आहे. पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने राजापूर-शीळ मार्गे चिखलगाव रस्ता गेले बारा दिवस पाण्याखाली गेला आहे.

तालुक्यातील परटवली-ओशिवळे ताम्हाणे रस्ता पाण्याखाली गेला आहे. तसेच कशेळी येथील गणपत राड्ये यांचा गोठा कोसळून नुकसान झाले आहे, तर हर्डी-रानतळे रस्ता पुन्हा खचला आहे. महाळुंगे बौद्धवाडी येथे बुद्धविहारावर झाड पडून नुकसान झाले आहे. परटवली ग्रामपंचायत इमारतीमध्ये, तसेच सलाम बलबले यांच्या घरामध्ये अर्जुनाच्या पुराचे पाणी शिरले आहे.

राजापूर शहरात गुरुवारी सकाळी पुराचे पाणी शिरताच तहसीलदार प्रतिभा वराळे, पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, माजी आमदार अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे, मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी पाहणी केली.

-----------------------------------------

वीज पुरवठा विस्कळीत

गेले बारा दिवस वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठ्यावर परिणाम होत आहे. वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. मात्र, महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी भर पावसातही जिवाची बाजी लावून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे अनेक भागात माेठ्या प्रमाणात पाऊस पडून वीजपुरवठा सुरळीत सुरू आहे.