शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात रासपतर्फे आघाडी सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:39 IST

चिपळूण : महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे व गलथान कारभारामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने तीन अटींची पूर्तता करेपर्यंत ...

चिपळूण : महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे व गलथान कारभारामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने तीन अटींची पूर्तता करेपर्यंत स्थगित ठेवले आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरत सरकारच्या या भूमिकेचा रासपचे जिल्हाध्यक्ष अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देत निषेध व्यक्त करण्यात आला.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या ओबीसी आरक्षणावर आवाज उठविण्यासाठी राज्यभरात जेलभरो आंदोलनाची हाक देण्यात आली होती. ओबीसी आयोगाची स्थापना करून न्यायालयीन बाबींच्या पूर्ततेसाठी काम करावे. ओबीसी समाजाची माहिती जमा करून न्यायालयाला द्यावी. न्यायालयाची स्थगिती उठेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत, अशी मागणी करण्यात आली. ओबीसी समाजात विविध जातींचा व घटकांचा समावेश आहे. ओबीसी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात असतानाही त्यांना लोकसंख्येच्या तुलनेत न्याय मिळत नाही. सरकारच्या नातर्केपणाचा तोटा समाजबांधवांना सहन करावा लागतो आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने केवळ शांततेने निवेदन देण्याचा निर्णय जिल्हाध्यक्ष अशोक पवार यांनी घेतला. त्यानुसार निवडक कार्यकर्त्याच्या उपस्थितीत नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख प्रतीक हरवंदे, सुहास नवरत, साहिल पवार, राहुल झोरे, तालुकाप्रमुख प्रकाश खरात, नेते दादा आखाडे, राजाराम पालांडे आदी उपस्थित होते.

060721\img-20210706-wa0011.jpg

चिपळुणात रासपतर्फे आघाडी सरकारचा निषेध