शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
2
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
3
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
4
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
5
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
6
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
7
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
8
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
9
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
10
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
11
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
12
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
13
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
14
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
15
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
16
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
17
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
18
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
19
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

तीन लाख कोटी रुपयांचा प्रकल्प गावकाराच्या मर्जीनुसार येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:08 IST

- राजापुरातील प्रकल्पसमर्थकांत खुमासदार चर्चा लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : रिफायनरी प्रकल्पाला बारसू - सोलगावमध्ये वाढते समर्थन पाहता ...

- राजापुरातील प्रकल्पसमर्थकांत खुमासदार चर्चा

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : रिफायनरी प्रकल्पाला बारसू - सोलगावमध्ये वाढते समर्थन पाहता सर्वच राजकीय पक्षांनी प्रकल्पाला हिरवा कंदील दर्शवला आहे. त्यामुळे प्रकल्पविरोधकांनी ग्रामस्थांना काबीज करण्याचे नाणारमधील यशस्वी हत्यार बाहेर काढले आहे. या भागातील दोन - तीन गावांतील गावकारांना हाताशी धरून प्रकल्पाविरोधात नारळ ठेवून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याने तीन लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेला रिफायनरीसदृश शासकीय प्रकल्प कोकणात आला तर तो मुख्यमंत्र्यांच्या नव्हे तर गावकाराच्या मर्जीनुसारच येणार आहे, अशी चर्चा शहरासह तालुक्यात सुरू आहे.

ग्रामीण भागातील जनता देवभोळी आहे, विशेषतः महिला आपल्यासाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी एखादी गोष्ट चांगली की वाईट ? ती स्वीकारावी की नाकारावी ? याचा निर्णय ते सर्वस्वी गावातील गावकारावर सोपवतात. त्यानंतर सर्वज्ञ असल्याप्रमाणे हे गावकार गावाच्या हिताचे भासवून सर्व बरे - वाईट निर्णय आपल्या मर्जीने घेतात. आजपर्यंत येथील बहुतांश गावांची निर्णय प्रक्रिया या गावकारांच्या मर्जीनुसार चालत आली आहे. मात्र, अशा निर्णयांमुळे गावावर कसा कसा परिणाम झाला आहे, हेही गावातील सार्वजनिक सुविधांच्या झालेल्या दैनावस्थेवरून लक्षात येऊ लागले आहे.

ग्रामपंचायतीच्या अथवा इतर निवडणुकीत अशा नारळ प्रथेचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र, आता रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधासाठी याचा वापर करण्यात येत असून, कोणत्याही स्थितीत कंपनी अथवा शासनाची बाजूच ऐकून घ्यायची नाही, यासाठी ग्रामस्थांवर दबाव टाकण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहे. प्रकल्प स्वीकारायचा का नाकारायचा ? बहुतेकदा नाकारायचेच, हे फक्त गावकार ठरवणार असल्याने लोकशाहीतील सर्वसामान्यांच्या निर्णय प्रक्रियेचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नारळाद्वारे शपथा घ्यायला लावून गावातील महत्त्वाच्या गोष्टींसंदर्भात निर्णय घेणे, एखाद्याला वाईट ठरवून वाळीत टाकणे, प्रकल्पाच्या कोणत्याही बऱ्या - वाईट बाजू समजून न घेता प्रकल्पास विरोध करण्यास भाग पाडणे अथवा प्रकल्पांना नकार देणे असे उघड प्रकार होऊ लागल्याची खंत याच गावांतील प्रकल्प समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आज तीन लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेला रिफायनरीसदृश प्रकल्प कोकणात आला तर तो मुख्यमंत्र्यांच्या नाही तर गावकाराच्या मर्जीनुसारच येणार आहे, अशी चर्चा प्रकल्पसमर्थकांतून होत आहे. प्रकल्पाची बाजू स्थानिक जनतेसमोर येऊच नये, यासाठी प्रकल्प विरोधकांचा चाललेला आटापिटा आणखी कोणते टप्पे गाठतो, याबाबत तर्क लढवले जात आहेत.