शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

बेपत्ता रोशनने गळफास घेतला

By admin | Updated: September 19, 2014 00:29 IST

अंबी नदीच्या किनारी असलेल्या कांबळे डोहानजीकच्या जंगली भागात आढळून आला

रत्नागिरी/खालगाव: तालुक्यातील खालगाव येथे नववीत शिकणारा विद्यार्थी शनिवारपासून बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत खालगाव येथील अंबी नदीच्या किनारी असलेल्या कांबळे डोहानजीकच्या जंगली भागात आढळून आला. त्याच्या मृत्यूचे कारण मात्र पुढे आलेले नाही. त्याबाबतचे अनेक प्रश्न अनुत्तरीत असल्याने गूढ वाढले आहे. रत्नागिरी तालुक्यातील खालगाव येथील रहिवासी व जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीत शिकत असलेला रोशन मिलिंद मुळ्ये (१४) हा विद्यार्थी दि. १३ सप्टेंबर रोजी दुपारनंतर बेपत्ता झाला होता. शनिवारी शाळा सुटल्यानंतर तो घरी न जाता रस्त्यातून जाकादेवी स्टॅण्डकडे गेल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले होते. मात्र, तो सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने त्याचे वडील मिलिंद मुळ्ये यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. दरम्यान, ग्रामस्थांसह रोशन याचे पालकही गेले चार दिवस त्याचा शोध घेत होते. गुरुवारीही त्याचा शोध सुरू होता. त्यावेळी अंबी नदीच्या कांबळे डोहानजीकच्या जंगलात त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. बेपत्ता झाल्याच्या दिवशीच त्याने हा गळफास घेतला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शाळेचा गणवेश त्याच्या अंगावर असल्याने तो शाळा सुटल्यावर लगेचच या जंगलात आला आणि त्याने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. (प्रतिनिधी)

अनेक प्रश्न अनुत्तरित रोशन या अवघ्या १४ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास का लावला? इथपासून अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत. रोशन हा त्या दिवशी शाळेतून सुटल्यानंतर घरी न येता थेट जंगलात गेला. त्यामुळे त्याच्याकडे गळफास लावण्यासाठी साडी आली कोठून? तसेच ज्या ठिकाणी त्याने गळफास घेतला, तो परिसर जंगलमय असून, वस्तीपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे, त्यामुळे इतक्या लांब येऊन त्याने आत्महत्या कशी केली? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अजूनही सापडलेली नाहीत.