शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पावसाची दमदार गर्जना

By admin | Updated: September 16, 2015 00:48 IST

रत्नागिरी जिल्हा : उत्सवी वातावरणाला मुसळधार सरींनी आणला उत्साह

रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून परतीच्या पावसाने पुन्हा दमदार सलामी दिली असून, रात्रीपासून संततधार सुरू आहे. आज (मंगळवार) दिवसभर पावसाचा जोर कायम असल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. गुरुवारपासून परतीच्या पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केली आहे. दोन-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने सोमवारी सायंकाळपासून मेघगर्जनेसह जोरदार सुरुवात केली आहे. रात्रीही पावसाचा जोर कायम होता. सकाळी थोड्याशा विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा सुरू झाला. शहरातील अनेक भागात गटारांचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करीतच वाहने चालवावी लागत होती. सकाळी सुमारे दीड तास शहरातील वीजपुरवठा गायब होता. दुपारनंतर मात्र थोडीशी उघडीप घेतली होती. त्यामुळे तासभर नागरिकांना सूर्यदर्शनही झाले. सायंकाळी पुन्हा पावसाने जोर धरला होता. आज दिवसभर पावसाचे रिमझिम, तर मध्येच मुसळधार बरसणे सुरूच होते. रात्रीही पावसाचा जोर कायम होता. गतवर्षी या दिवशी २.४८ मिलीमीटर इतका पाऊस झाला होता, तर आज २३.८३ मिलिमीटर सरासरी पाऊस झाला. मात्र, गतवर्षी या दिवशी झालेल्या एकूण पावसाची नोंद ३३२३.३३ मिलिमीटर होती. यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने १ जून ते १५ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसाची केवळ २०३५ मिलिमीटर इतकीच नोंद झालेली आहे. परतीचा पाऊस सलग चार दिवस मुसळधार पडणार असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला असला तरी आतापर्यंत सरासरी सुमारे १३०० मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे यावर्षी लवकरच पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)