शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
3
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
4
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
5
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
6
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
7
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
9
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
10
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
11
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
12
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
13
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
14
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
15
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
16
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
17
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
18
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
19
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
20
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

पावसाची दमदार गर्जना

By admin | Updated: September 16, 2015 00:48 IST

रत्नागिरी जिल्हा : उत्सवी वातावरणाला मुसळधार सरींनी आणला उत्साह

रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून परतीच्या पावसाने पुन्हा दमदार सलामी दिली असून, रात्रीपासून संततधार सुरू आहे. आज (मंगळवार) दिवसभर पावसाचा जोर कायम असल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. गुरुवारपासून परतीच्या पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केली आहे. दोन-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने सोमवारी सायंकाळपासून मेघगर्जनेसह जोरदार सुरुवात केली आहे. रात्रीही पावसाचा जोर कायम होता. सकाळी थोड्याशा विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा सुरू झाला. शहरातील अनेक भागात गटारांचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करीतच वाहने चालवावी लागत होती. सकाळी सुमारे दीड तास शहरातील वीजपुरवठा गायब होता. दुपारनंतर मात्र थोडीशी उघडीप घेतली होती. त्यामुळे तासभर नागरिकांना सूर्यदर्शनही झाले. सायंकाळी पुन्हा पावसाने जोर धरला होता. आज दिवसभर पावसाचे रिमझिम, तर मध्येच मुसळधार बरसणे सुरूच होते. रात्रीही पावसाचा जोर कायम होता. गतवर्षी या दिवशी २.४८ मिलीमीटर इतका पाऊस झाला होता, तर आज २३.८३ मिलिमीटर सरासरी पाऊस झाला. मात्र, गतवर्षी या दिवशी झालेल्या एकूण पावसाची नोंद ३३२३.३३ मिलिमीटर होती. यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने १ जून ते १५ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसाची केवळ २०३५ मिलिमीटर इतकीच नोंद झालेली आहे. परतीचा पाऊस सलग चार दिवस मुसळधार पडणार असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला असला तरी आतापर्यंत सरासरी सुमारे १३०० मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे यावर्षी लवकरच पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)