शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते, वाटा, पाण्याची नकारघंटाच

By admin | Updated: May 4, 2016 23:55 IST

खेड तालुका : ११ धनगरवाड्या अद्याप तहानलेल्या, कोरड्या घशासाठी ५ ते ८ किलोमीटर पायपीट--लोकमत विशेष

श्रीकांत चाळके -- खेड तालुक्यामधील ४० धनगरवाड्यांपैकी ११ धनगरवाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवत आहे़ प्रशासनाकडे या पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध नसल्याचे यावेळी प्रकर्षाने समोर आले आहे. भौगोलिक परिस्थितीमुळे या वाड्यांना पाणी पुरवठा करणे अशक्य होत आहे. रस्ते आणि वाटादेखील येथे नसल्याने या वस्त्यांना पाणी पोहोचविणे अशक्य झाल्याचे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात येत आहे़ त्यामुळे या वस्त्यांना पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे़ खेड तालुक्यात गतवर्षी २५ गावे व ६६ वाड्यांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवले होते. यावर्षी एप्रिल महिन्यात १९ गावे आणि २४ वाड्यांना पाणीटंचाई जाणवत आहे तर उर्वरीत ११ धनगरवाड्यांमध्ये रस्ते आणि पायवाटा नसल्याने पाणीपुरवठ्यामध्ये व्यत्यय येत आहे.काही गावांना व वाड्यांना अद्याप तहसीलदारांचे पाणी पुरवठ्यासंबंधीचे दाखले प्राप्त न झाल्याने त्यांना पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. हे दाखले अद्याप तहसीलदारांच्या विचाराधीन असल्याचे समोर आले आहे.प्रत्येकवर्षी पाणीटंचाईची झळ विशेषत्वाने तालुक्यातील ४० धनगरवाड्यांना पोहोचते. चिरणी, तुळशी बुद्रुक, देवाचा डोंगर, तुळशी खुर्द कुबजाई, खवटी खालचीवाडी व वरचीवाडी, चिंचवली ढेबेवाडी, आंबवली, भिंगारा, कावळे, खोपी रेमजेवाडी, तळे व घेरारसाळगड येथील १२ धनगरवाड्यांमध्ये पाण्याचे मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष्य आहे. येथील भौगोलिक परिस्थिती बेताची असल्याने या वाड्यांना पाणीपुरवठा करणे जिकरीचे होत आहे.धनगरवाड्या या बहुतांश डोंगराळ भागात वसल्या आहेत. गतवेळच्या तुलनेत यावर्षी या वाडयांना टंचाईची मोठी झळ पोहोचत आहे. पाण्याचे जवळपास साधन नसल्याने या १२ धनगरवाडयांना पाच किलोमीटर अंतरावरील पाण्याचे डबके वा लहानशा तलावामधून पाणी भरावे लागत आहे. पुरेशा पाण्याअभावी लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत साऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सध्या पाण्याचे तीन टँकर धावत आहेत. यातील रस्ता असलेल्या धनगरवाडीमध्ये टँकर पोहोचत आहे. मे महिना संपेपर्यंत या वाड्या तहानलेल्याच राहणार आहेत.ग्रामीण भागात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे. यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्यात आले असून, ही दाहकता आता नातूवाडी धरणातील पुरेशा पाणीसाठ्यामुळे कमी होणार आहे. खेड तालुक्यातील पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी प्राधान्य दण्यात येणार असून, पाणीपुरवठ्याबाबत चिंता करण्याचे कारण नसल्याचे नातूवाडी प्रकल्पाचे उपअभियंता मंगले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ सध्या तालुक्यातील १९ गावे आणि ३० वाड्यांना प्रशासनाला पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यासाठी प्रशासनाकडे केवळ ३ टॅँकर उपलब्ध आहेत. यातील दोन शासकीय आणि एक खासगी टँकर आहे. टंचाईग्रस्त गावांना एकमेव नातूवाडी धरणातून पाणीपुरवठा होत आहे. या धरणाची क्षमता २८ दशलक्ष घनमीटर आहे. मात्र, या धरणामध्ये केवळ ८.००७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. खेड तालुक्याच्या टंचाई आराखड्यातील ५० टक्के गावे व वाड्या आजही पाण्यापासून वंचित आहेत. त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, जनावरे तडफडू लागली आहेत. धनगरवाड्या तर पाण्यासाठी भटकंती करत असून, येथील जनता पाण्याअभावी तडफडू लागली आहे. पाणीपुरवठ्यासाठी केवळ २ टँकरवर तालुक्याची मदार असल्याने प्रशासनाची पुन्हा एकदा बेफिकिरी समोर आली आहे.नातूवाडी धरणातील हे पाणी सध्या सुकिवली येथील चोरद नदीमध्ये सोडले जात आहे आणि तेथून हे पाणी टँकरच्या सहाय्याने टंचाईग्रस्त गावांना पुरविण्यात येत आहे. या धरणातून खेड शहराला करारानुसार होणारा ३० लाख लीटर पाण्याचा उपसा बंद करण्यात आला आहे़ त्यामुळे खेड शहराला सध्या खोपी पिंपळवाडी धरणातून पाणीपुरवठा होत आहे़ गतवर्षी शेतीला पाणी पुरविल्यानंतर १ मे रोजी याच धरणात ६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता़ यावर्षी मात्र ८ दशलक्ष मीटर पाणीसाठा शिल्लक आहे़ २ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आम्ही वाचविला आहे़ पाण्याच्या उत्तम नियोजनामुळे हे शक्य झाल्याचे उपअभियंता मंगले म्हणाले़ नातूवाडी धरणातील पाणी शेतीला आणि पिण्यासाठी वापरण्यावर भर देण्यात आला असून, हे पाणी पूर्ण क्षमतेने पुरवण्यिात येत असल्याने कोणीही चिंता करण्याचे कारण नसल्याचे मंगले यांनी सांगितले आहे. नातूवाडी धरणाला समांतर असे शिरवली हे धरण आहे. मात्र, ते नादुरूस्त आहे. दुरूस्तीचे काम सुरू असल्याने या धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सर्रासपणे नातूवाडी धरणातील पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.