शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
5
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
8
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
9
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
10
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
11
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
12
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
13
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
14
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
15
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
16
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
17
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
18
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
19
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
20
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 

नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे रस्ते मोकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 14:51 IST

MuncipalCarporation, Atikraman, Ratnagirinews रत्नागिरी शहरातील वाढत्या अतिक्रमणावर निर्बंध आणण्यासाठी नगर परिषदेने सभागृहात सर्वानुमते ठराव घेऊन अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे.

ठळक मुद्देनगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे रस्ते मोकळे

रत्नागिरी : शहरातील वाढत्या अतिक्रमणावर निर्बंध आणण्यासाठी नगर परिषदेने सभागृहात सर्वानुमते ठराव घेऊन अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. गेला आठवडाभर अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. रस्ते, फुटपाथवरील टपऱ्या, खोके, हातगाड्या हटविण्यात आल्या असून, मुख्य तसेच अंतर्गत रस्त्याकडेला वाहतुकीस अडसर ठरणारे फलक, होर्डिंग्ज, जाहिरातीच्या पाट्या हटविण्यात आल्या आहेत.साळवी स्टॉप ते मांडवीपर्यतचा रस्ता, फूटपाथ टपऱ्या, खोक्यांनी काबीज केल्याने नागरिकांमधून तक्रारी वाढत होत्या. गेल्या आठवड्यात ९६ टपऱ्या , खोके व ६७ होर्डिंग्ज हटविण्यात यश आले आहे. अधिकारी, कर्मचारी अतिक्रमण हटाव मोहिमेत सहभागी झाले असून, खोके, टपऱ्या हटविल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.नगर परिषद करणार सर्वेक्षणशहरातील आठवडा बाजार, मंगळवार बाजार, मासळी मार्केट, मिरकरवाडा आदी महत्वाच्या ठिकाणी मर्यादित टपऱ्या किंवा वडापावची गाडी टाकण्याची परवानगी शिवाय एकाच आकारातील टपऱ्या तयार करून भाडेतत्वावर देण्याबाबतचा विचार सुरू आहे. त्याबाबत नगर परिषद सर्वेक्षण करणार आहे.माल रस्त्यावर आणू नयेशहरातील दुकानदार माल रस्त्यापर्यत लावत असल्याने वाहतुकीस अडसर ठरत आहे. शहरातील व्यापारी पेठ असलेल्या रामआळी, मारूती आळी, धनजीनाका, गोखलेनाका परिसरातील व्यापाऱ्यांनी विक्रीचा माल रस्त्यावर आणू नये. पादचारी, वाहनचालकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.

शहरातील गर्दी कमी करण्यासाठी अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. मर्यादित टपऱ्या हातगाड्या महत्वाच्या ठिकाणी लावण्यासाठी परवानगी देण्याचा विचार सुरू आहे. तत्पूर्वी हा विषय सभागृहापुढे मांडून ठराव घेण्यात येणार आहे.- प्रदीप साळवी, नगराध्यक्ष

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiri Nagar Parishadरत्नागिरी नगर परिषद