शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:37 IST

गुहागर : तालुक्यातील आवरे-भातगाव रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गुहागर-आबलोली मार्गे आवरे, असोरे, शिवणे, कोडवली, भातगाव रस्त्याची दुरवस्था झाली असून ...

गुहागर : तालुक्यातील आवरे-भातगाव रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गुहागर-आबलोली मार्गे आवरे, असोरे, शिवणे, कोडवली, भातगाव रस्त्याची दुरवस्था झाली असून वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. डांबरीकरण उखडले असून, रस्त्यावर खड्डे पडले आहेत. शिवाय साईडपट्टी निकामी झाली आहे.

आरिफा मोनये यांची निवड

राजापूर : तालुक्यातील कोतापूर ग्रामपंचायतीच्या व सरपंचपदी शिवसेनेच्या आरिफा मोनये यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विद्यमान उपसरपंच प्रमोद जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर मोनये यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी उपतालुकाप्रमुख राजन कुवळेकर, संतोष हातणकर उपस्थित होते.

आज निवड चाचणी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन १६ वर्षाखालील क्रिकेट संघासाठी निवड चाचणी घेण्यात येणार आहे. दि. १७ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे निवड चाचणी होणार आहे. सकाळी ७.३० वाजता मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे दीपक देसाई यांनी केले आहे.

मोफत नेत्र तपासणी

रत्नागिरी : अनुलोम प्रेरित जनसेवा सामाजिक मंडळ, गोळप यांच्यातर्फे लायन्स आय हॉस्पिटल, रत्नागिरी यांच्या सौजन्याने मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पाटणकर कार्यालय येथे हे शिबिर होणार आहे.

इंटरनेट समस्या मार्गी

राजापूर : नेटवर्कअभावी ग्रामपंचायतीच्या कामात येणारे अडथळे दूर करण्यासाठी कुवेशी ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य व सामाजिक कार्यकर्ते मनोहर कांबळी यांनी स्वखर्चाने नेटवर्क बुस्टर बसवून इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून घेतली आहे. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

कौशल्य स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई यांच्यातर्फे आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर १७ व १८ ऑगस्ट रोजी कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा विभाग राज्य व देशपातळीवर उमेदवारांची निवड करून जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहे.

ग्रामसेवकांच्या बदल्या

रत्नागिरी : तालुक्यातील आठ ग्रामसेवक व दोन ग्रामविकास अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. चांदोर, शिवार आंबेरे, चाफेरी, खानू, काळबादेवी, सैतवडे, जांभारी, पोमेंडी खुर्द येथील ग्रामसेवकांच्या बदल्या झाल्या आहेत. पावस येथून ग्रामविकास अधिकारी आंबेरे यांची बदली रत्नागिरीत तर कुवारबाव येथून गुरव यांची बदली पावस येथे झाली आहे.