शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

आरकेपी काजूला कृषिमाल प्रक्रिया पुरस्कार

By admin | Updated: July 9, 2014 00:27 IST

राज्यातील कृषीक्षेत्रातील प्रतिक्षेष्ठेचा पुरस्कार

लांजा : राज्याच्या कृषिक्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘वसंतराव नाईक कृ षी पुरस्कार’ यावर्षी गवाणे (ता. लांजा) येथील रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेला मिळाला आहे. वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्यावतीने हा पुरस्कार मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते समारंभपूर्वक संस्थेला नुकताच प्रदान करण्यात आला. संस्थेच्या आजवरच्या यशस्वी कारकिर्दीत या पुरस्काराने संस्थेच्या शीरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या १०१व्या जन्मदिनाचे औचित्य साधून वसंतराव नाईक कृ षी पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार, १ जुलै रोजी मुंबई, नरिमन पॉर्इंट येथे यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला. राज्याच्या कृषिक्षेत्रात उल्लेखनीय व कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या राज्यातील मोजक्या संस्थांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते.कृषी क्षेत्राशी संबंधित फलोत्पादन, उत्पादननिर्यात, भाजीपाला उत्पादन, फुलशेती, सामाजिक वनीकरण, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, जलसंधारण, कृ षीमाल प्रक्रिया, उद्योग या क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या संस्थांचा या पुरस्कारासाठी विचार केला जातो. यासाठी या संस्थांचे त्यांच्या कृषी क्षेत्राशी संबंधित कामगिरीचा विचार केला जातो. या सर्व मापदंड व निकषांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील गवाणे येथील रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेची निवड झाली असून कोकणामध्ये या पुरस्कारासाठी निवड झालेली एकमेव संस्था आहे.मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेचे चेअरमन जयवंत विचारे, उपाध्यक्ष अशोक बोरकर,सुरेंद्र खानविलकर, महेंद्र जाधव, शंकर सुर्वे, प्राजक्ता खानविलकर यांच्या उपस्थितीत पुरस्कार स्विकारला. यावेळी मंत्री व कोकणातील अनेक हितचिंतक उपस्थित होते. यावेळी विचारे यांनी आरके कोकणने केलेल्या कामगिरीवर प्रकाशझोत टाकला व त्यानी यापुढे अशा व्यवसायात तरूणांनी उतरावे असे आवाहन केले. या पुरस्काराबद्दल कृषीक्षेत्रातील कार्यकर्त्यांनी त्यांचे ्अभिनंदन केले. (प्रतिनिधी)