शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

आरकेपी काजूला कृषिमाल प्रक्रिया पुरस्कार

By admin | Updated: July 9, 2014 00:27 IST

राज्यातील कृषीक्षेत्रातील प्रतिक्षेष्ठेचा पुरस्कार

लांजा : राज्याच्या कृषिक्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘वसंतराव नाईक कृ षी पुरस्कार’ यावर्षी गवाणे (ता. लांजा) येथील रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेला मिळाला आहे. वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्यावतीने हा पुरस्कार मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते समारंभपूर्वक संस्थेला नुकताच प्रदान करण्यात आला. संस्थेच्या आजवरच्या यशस्वी कारकिर्दीत या पुरस्काराने संस्थेच्या शीरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या १०१व्या जन्मदिनाचे औचित्य साधून वसंतराव नाईक कृ षी पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार, १ जुलै रोजी मुंबई, नरिमन पॉर्इंट येथे यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला. राज्याच्या कृषिक्षेत्रात उल्लेखनीय व कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या राज्यातील मोजक्या संस्थांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते.कृषी क्षेत्राशी संबंधित फलोत्पादन, उत्पादननिर्यात, भाजीपाला उत्पादन, फुलशेती, सामाजिक वनीकरण, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, जलसंधारण, कृ षीमाल प्रक्रिया, उद्योग या क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या संस्थांचा या पुरस्कारासाठी विचार केला जातो. यासाठी या संस्थांचे त्यांच्या कृषी क्षेत्राशी संबंधित कामगिरीचा विचार केला जातो. या सर्व मापदंड व निकषांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील गवाणे येथील रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेची निवड झाली असून कोकणामध्ये या पुरस्कारासाठी निवड झालेली एकमेव संस्था आहे.मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेचे चेअरमन जयवंत विचारे, उपाध्यक्ष अशोक बोरकर,सुरेंद्र खानविलकर, महेंद्र जाधव, शंकर सुर्वे, प्राजक्ता खानविलकर यांच्या उपस्थितीत पुरस्कार स्विकारला. यावेळी मंत्री व कोकणातील अनेक हितचिंतक उपस्थित होते. यावेळी विचारे यांनी आरके कोकणने केलेल्या कामगिरीवर प्रकाशझोत टाकला व त्यानी यापुढे अशा व्यवसायात तरूणांनी उतरावे असे आवाहन केले. या पुरस्काराबद्दल कृषीक्षेत्रातील कार्यकर्त्यांनी त्यांचे ्अभिनंदन केले. (प्रतिनिधी)