शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

आरकेपी काजूला कृषिमाल प्रक्रिया पुरस्कार

By admin | Updated: July 9, 2014 00:27 IST

राज्यातील कृषीक्षेत्रातील प्रतिक्षेष्ठेचा पुरस्कार

लांजा : राज्याच्या कृषिक्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘वसंतराव नाईक कृ षी पुरस्कार’ यावर्षी गवाणे (ता. लांजा) येथील रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेला मिळाला आहे. वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्यावतीने हा पुरस्कार मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते समारंभपूर्वक संस्थेला नुकताच प्रदान करण्यात आला. संस्थेच्या आजवरच्या यशस्वी कारकिर्दीत या पुरस्काराने संस्थेच्या शीरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या १०१व्या जन्मदिनाचे औचित्य साधून वसंतराव नाईक कृ षी पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार, १ जुलै रोजी मुंबई, नरिमन पॉर्इंट येथे यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला. राज्याच्या कृषिक्षेत्रात उल्लेखनीय व कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या राज्यातील मोजक्या संस्थांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते.कृषी क्षेत्राशी संबंधित फलोत्पादन, उत्पादननिर्यात, भाजीपाला उत्पादन, फुलशेती, सामाजिक वनीकरण, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, जलसंधारण, कृ षीमाल प्रक्रिया, उद्योग या क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या संस्थांचा या पुरस्कारासाठी विचार केला जातो. यासाठी या संस्थांचे त्यांच्या कृषी क्षेत्राशी संबंधित कामगिरीचा विचार केला जातो. या सर्व मापदंड व निकषांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील गवाणे येथील रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेची निवड झाली असून कोकणामध्ये या पुरस्कारासाठी निवड झालेली एकमेव संस्था आहे.मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेचे चेअरमन जयवंत विचारे, उपाध्यक्ष अशोक बोरकर,सुरेंद्र खानविलकर, महेंद्र जाधव, शंकर सुर्वे, प्राजक्ता खानविलकर यांच्या उपस्थितीत पुरस्कार स्विकारला. यावेळी मंत्री व कोकणातील अनेक हितचिंतक उपस्थित होते. यावेळी विचारे यांनी आरके कोकणने केलेल्या कामगिरीवर प्रकाशझोत टाकला व त्यानी यापुढे अशा व्यवसायात तरूणांनी उतरावे असे आवाहन केले. या पुरस्काराबद्दल कृषीक्षेत्रातील कार्यकर्त्यांनी त्यांचे ्अभिनंदन केले. (प्रतिनिधी)