शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
4
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
5
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
6
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
7
उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
8
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
9
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
10
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
11
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
12
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
14
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
15
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
16
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
17
रात्री खोकल्याचं औषध प्यायला, पण सकाळी उठलाच नाही; ५ वर्षाच्या मुलाच्या मृत्युनं खळबळ!
18
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
19
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
20
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...

नदीतील गाळ मंदिराच्या सौंदर्यासाठी

By admin | Updated: June 21, 2016 01:16 IST

गुहागर तालुका : समृद्ध पोमेंडी प्रतिष्ठानच्या उपक्रमाची मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली दखल

संकेत गोयथळे -- गुहागर -एखाद्या कामाचे उद्घाटन होते व काम सुरुही होते. ते काम पूर्णत्वास नेण्याअगोदर अनेक विघ्न येतात. अशावेळी ते काम मध्येच बंद झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. मात्र, समृद्ध पोमेंडी प्रतिष्ठानच्या तरुणांनी एका ध्येयाने एकत्र येत सुरु केलेले नदीतील गाळउपसा करण्याचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वास नेऊन तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे. लोकसहभागातून केलेल्या या कामासाठी सुमारे ३ लाख ५ हजार रुपये खर्च झाला असून, यातून ८००० घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.गेले तीन-चार महिने संपूर्ण महाराष्ट्रासह रत्नागिरी जिल्ह्यातही पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले होते. दरवर्षी पडणाऱ्या दुष्काळाकडे अजूनही गांभीर्याने पाहिले जात नाही. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही पाणीटंचाई निर्माण होते. या पाणीटंचाईवरील उपाययोजनांमध्ये नदीनाल्यांतील गाळ काढणे हा पर्याय उपलब्ध आहे. पोमेंडी गावातील काही तरुणांनी एकत्र येत समृद्धी पोमेंडी प्रतिष्ठान नावाची संस्था स्थापन केली. पोमेंडी गावाच्या समृद्धीचे चित्र उभे करताना पाणी दुष्काळावर मात करण्याचे ठरवले. पाण्याशिवाय समृद्धी नाही, यासाठीच या तरुणांनी पुढाकार घेतला. नदीतील गाळउपशाचे काम सुरु केले आणि दोन महिन्यात हे काम पूर्ण झाले. सुमारे ६०० मीटर लांब असलेल्या नदीतील गाळ उपसण्यात आला. यामुळे परिसरातील बायांचा डोह या जिवंत झऱ्याचे पुनर्जीवन झाले आहे. सर्वसाधारण ९ मीटर रुंद व १.५ (दीड) मीटर खोल याप्रमाणे ८१०० घनमीटर गाळ नदीतून काढण्यात या तरुणांना यश आले आहे. जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने हे काम करण्यात आले. सुमारे ३ लाख ५ हजारांचा निधी यासाठी खर्च करण्यात आला. गाळउपशाचे काम सुरु झाले आणि म्हणता म्हणता ३ लाख रुपये गोळा झाले. गेल्या १००-१५० वर्षांपासून नदीतील बायांच्या डोह या ठिकाणी गाळ साचला होता. दैवी प्रतिभा लाभलेल्या या ठिकाणाला स्वच्छ व सुंदर स्थान करण्याचा विडाच जणू या तरुणांनी उचलला आणि तो पूर्णही केला.तालुक्यात लोकसहभागातून प्रथम काम सुरु करण्याचा मान मिळालेल्या या गावाला प्रांताधिकारी रवींद्र हजारे, कोकण भूमी प्रतिष्ठानचे कार्यवाह संजय यादवराव यांच्यासह मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांनी या उपक्रमाला भेट देत कौतुक केले. दुष्काळग्रस्तांसाठी काम करणाऱ्या ‘नाम’ संस्थेचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनीही या उपक्रमाला भेट देऊन या तरुणांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. समृद्ध पोमेंडी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजित विचारे, सचिव रुपेश विचारे, खजिनदार योगेश विचारे, सदस्य मिलिंद विचारे, दर्शन विचारे, श्रीकांत विचारे, संदेश विचारे, प्रतीक विचारे, संदेश विचारे, परशुराम विचारे यांच्यासह श्रीधर विचारे, बंटी विचारे, प्रमोद विचारे यांनी यासाठी परिश्रम घेतले.तरूणांचा आदर्श : सुशोभिकरण करणारअनेक ठिकाणी नदीनाल्यातील काढलेला गाळ कुठे टाकायचा, असा प्रश्न पडतो. त्यामुळे मग नदीपात्रातच तो बाजूला करुन ठेवला जातो. मात्र, या प्रतिष्ठानच्या तरुणांनी कल्पकतेचा वापर करत पुढील उपक्रम डोळ्यापुढे ठेवून हा गाळ सोमेश्वर मंदिराच्या आवारात टाकून सुशोभिकरण केले आहे.