शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

नदीतील गाळ मंदिराच्या सौंदर्यासाठी

By admin | Updated: June 21, 2016 01:16 IST

गुहागर तालुका : समृद्ध पोमेंडी प्रतिष्ठानच्या उपक्रमाची मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली दखल

संकेत गोयथळे -- गुहागर -एखाद्या कामाचे उद्घाटन होते व काम सुरुही होते. ते काम पूर्णत्वास नेण्याअगोदर अनेक विघ्न येतात. अशावेळी ते काम मध्येच बंद झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. मात्र, समृद्ध पोमेंडी प्रतिष्ठानच्या तरुणांनी एका ध्येयाने एकत्र येत सुरु केलेले नदीतील गाळउपसा करण्याचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वास नेऊन तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे. लोकसहभागातून केलेल्या या कामासाठी सुमारे ३ लाख ५ हजार रुपये खर्च झाला असून, यातून ८००० घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.गेले तीन-चार महिने संपूर्ण महाराष्ट्रासह रत्नागिरी जिल्ह्यातही पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले होते. दरवर्षी पडणाऱ्या दुष्काळाकडे अजूनही गांभीर्याने पाहिले जात नाही. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही पाणीटंचाई निर्माण होते. या पाणीटंचाईवरील उपाययोजनांमध्ये नदीनाल्यांतील गाळ काढणे हा पर्याय उपलब्ध आहे. पोमेंडी गावातील काही तरुणांनी एकत्र येत समृद्धी पोमेंडी प्रतिष्ठान नावाची संस्था स्थापन केली. पोमेंडी गावाच्या समृद्धीचे चित्र उभे करताना पाणी दुष्काळावर मात करण्याचे ठरवले. पाण्याशिवाय समृद्धी नाही, यासाठीच या तरुणांनी पुढाकार घेतला. नदीतील गाळउपशाचे काम सुरु केले आणि दोन महिन्यात हे काम पूर्ण झाले. सुमारे ६०० मीटर लांब असलेल्या नदीतील गाळ उपसण्यात आला. यामुळे परिसरातील बायांचा डोह या जिवंत झऱ्याचे पुनर्जीवन झाले आहे. सर्वसाधारण ९ मीटर रुंद व १.५ (दीड) मीटर खोल याप्रमाणे ८१०० घनमीटर गाळ नदीतून काढण्यात या तरुणांना यश आले आहे. जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने हे काम करण्यात आले. सुमारे ३ लाख ५ हजारांचा निधी यासाठी खर्च करण्यात आला. गाळउपशाचे काम सुरु झाले आणि म्हणता म्हणता ३ लाख रुपये गोळा झाले. गेल्या १००-१५० वर्षांपासून नदीतील बायांच्या डोह या ठिकाणी गाळ साचला होता. दैवी प्रतिभा लाभलेल्या या ठिकाणाला स्वच्छ व सुंदर स्थान करण्याचा विडाच जणू या तरुणांनी उचलला आणि तो पूर्णही केला.तालुक्यात लोकसहभागातून प्रथम काम सुरु करण्याचा मान मिळालेल्या या गावाला प्रांताधिकारी रवींद्र हजारे, कोकण भूमी प्रतिष्ठानचे कार्यवाह संजय यादवराव यांच्यासह मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांनी या उपक्रमाला भेट देत कौतुक केले. दुष्काळग्रस्तांसाठी काम करणाऱ्या ‘नाम’ संस्थेचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनीही या उपक्रमाला भेट देऊन या तरुणांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. समृद्ध पोमेंडी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजित विचारे, सचिव रुपेश विचारे, खजिनदार योगेश विचारे, सदस्य मिलिंद विचारे, दर्शन विचारे, श्रीकांत विचारे, संदेश विचारे, प्रतीक विचारे, संदेश विचारे, परशुराम विचारे यांच्यासह श्रीधर विचारे, बंटी विचारे, प्रमोद विचारे यांनी यासाठी परिश्रम घेतले.तरूणांचा आदर्श : सुशोभिकरण करणारअनेक ठिकाणी नदीनाल्यातील काढलेला गाळ कुठे टाकायचा, असा प्रश्न पडतो. त्यामुळे मग नदीपात्रातच तो बाजूला करुन ठेवला जातो. मात्र, या प्रतिष्ठानच्या तरुणांनी कल्पकतेचा वापर करत पुढील उपक्रम डोळ्यापुढे ठेवून हा गाळ सोमेश्वर मंदिराच्या आवारात टाकून सुशोभिकरण केले आहे.