शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

नदीतील गाळ मंदिराच्या सौंदर्यासाठी

By admin | Updated: June 21, 2016 01:16 IST

गुहागर तालुका : समृद्ध पोमेंडी प्रतिष्ठानच्या उपक्रमाची मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली दखल

संकेत गोयथळे -- गुहागर -एखाद्या कामाचे उद्घाटन होते व काम सुरुही होते. ते काम पूर्णत्वास नेण्याअगोदर अनेक विघ्न येतात. अशावेळी ते काम मध्येच बंद झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. मात्र, समृद्ध पोमेंडी प्रतिष्ठानच्या तरुणांनी एका ध्येयाने एकत्र येत सुरु केलेले नदीतील गाळउपसा करण्याचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वास नेऊन तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे. लोकसहभागातून केलेल्या या कामासाठी सुमारे ३ लाख ५ हजार रुपये खर्च झाला असून, यातून ८००० घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.गेले तीन-चार महिने संपूर्ण महाराष्ट्रासह रत्नागिरी जिल्ह्यातही पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले होते. दरवर्षी पडणाऱ्या दुष्काळाकडे अजूनही गांभीर्याने पाहिले जात नाही. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही पाणीटंचाई निर्माण होते. या पाणीटंचाईवरील उपाययोजनांमध्ये नदीनाल्यांतील गाळ काढणे हा पर्याय उपलब्ध आहे. पोमेंडी गावातील काही तरुणांनी एकत्र येत समृद्धी पोमेंडी प्रतिष्ठान नावाची संस्था स्थापन केली. पोमेंडी गावाच्या समृद्धीचे चित्र उभे करताना पाणी दुष्काळावर मात करण्याचे ठरवले. पाण्याशिवाय समृद्धी नाही, यासाठीच या तरुणांनी पुढाकार घेतला. नदीतील गाळउपशाचे काम सुरु केले आणि दोन महिन्यात हे काम पूर्ण झाले. सुमारे ६०० मीटर लांब असलेल्या नदीतील गाळ उपसण्यात आला. यामुळे परिसरातील बायांचा डोह या जिवंत झऱ्याचे पुनर्जीवन झाले आहे. सर्वसाधारण ९ मीटर रुंद व १.५ (दीड) मीटर खोल याप्रमाणे ८१०० घनमीटर गाळ नदीतून काढण्यात या तरुणांना यश आले आहे. जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने हे काम करण्यात आले. सुमारे ३ लाख ५ हजारांचा निधी यासाठी खर्च करण्यात आला. गाळउपशाचे काम सुरु झाले आणि म्हणता म्हणता ३ लाख रुपये गोळा झाले. गेल्या १००-१५० वर्षांपासून नदीतील बायांच्या डोह या ठिकाणी गाळ साचला होता. दैवी प्रतिभा लाभलेल्या या ठिकाणाला स्वच्छ व सुंदर स्थान करण्याचा विडाच जणू या तरुणांनी उचलला आणि तो पूर्णही केला.तालुक्यात लोकसहभागातून प्रथम काम सुरु करण्याचा मान मिळालेल्या या गावाला प्रांताधिकारी रवींद्र हजारे, कोकण भूमी प्रतिष्ठानचे कार्यवाह संजय यादवराव यांच्यासह मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांनी या उपक्रमाला भेट देत कौतुक केले. दुष्काळग्रस्तांसाठी काम करणाऱ्या ‘नाम’ संस्थेचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनीही या उपक्रमाला भेट देऊन या तरुणांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. समृद्ध पोमेंडी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजित विचारे, सचिव रुपेश विचारे, खजिनदार योगेश विचारे, सदस्य मिलिंद विचारे, दर्शन विचारे, श्रीकांत विचारे, संदेश विचारे, प्रतीक विचारे, संदेश विचारे, परशुराम विचारे यांच्यासह श्रीधर विचारे, बंटी विचारे, प्रमोद विचारे यांनी यासाठी परिश्रम घेतले.तरूणांचा आदर्श : सुशोभिकरण करणारअनेक ठिकाणी नदीनाल्यातील काढलेला गाळ कुठे टाकायचा, असा प्रश्न पडतो. त्यामुळे मग नदीपात्रातच तो बाजूला करुन ठेवला जातो. मात्र, या प्रतिष्ठानच्या तरुणांनी कल्पकतेचा वापर करत पुढील उपक्रम डोळ्यापुढे ठेवून हा गाळ सोमेश्वर मंदिराच्या आवारात टाकून सुशोभिकरण केले आहे.