शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

फळे, भाज्यांना वाढती मागणी, दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:30 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गणेशोत्सव सुरू असल्याने फळे, भाज्यांना वाढती मागणी असून, दरात मात्र वाढ झाली आहे. गावठी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गणेशोत्सव सुरू असल्याने फळे, भाज्यांना वाढती मागणी असून, दरात मात्र वाढ झाली आहे. गावठी भाज्या बाजारात उपलब्ध असून फळे, भाज्याविक्रेते गावोगावी, गल्लोगल्ली फिरत आहेत.

उत्सवामुळे घरे माणसांनी गजबजली असून, पाहुण्यांची वर्दळ वाढली आहे. साहजिकच माणसांचा राबता वाढल्याने भाजीपाल्याचा खपही वाढला आहे. बाजारात विविध प्रकारच्या भाज्या उपलब्ध असून, गावठी भाज्याही विक्रीसाठी आल्या आहेत. काकडी, चिबूडसह दोडकी, भेंडी, गवार, पडवळ, घेवडा, कोबी, फ्लाॅवर, फरसबी, वांगी, सिमला मिरची, गाजर यांना मागणी आहे. मूळा, माठ, मेथी, शेपू, पालक आदी पालेभाज्यांची उपलब्धता होत आहे. १५ ते २० रुपये दराने पालेभाज्यांची विक्री सुरू आहे.

उत्सवकाळात फळांनाही वाढती मागणी आहे. सफरचंद, केळी, चिकू, पेरू, नासपती, माेसंबी, संत्री, डाळिंब, सीताफळ पपई विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कोशिंबिरीच्या काकडीसह वड्यासाठी लागणाऱ्या मोठ्या काकड्यांचा खप अधिक आहे.

दरात वाढ तरीही खरेदी

ऐन उत्सव काळात भाज्यांचे दरात वाढ झाली आहे. मात्र दरावर भाज्यांची उपलब्धता होत असल्याने दरामध्ये फारशी घासघीस न करता खरेदी करण्यात येत आहे. शहरातील नाक्यानाक्यावर तसेच गावातून भाजी व फळेविक्रेते फिरत असल्याने उपलब्धता सहज होत आहे. त्यामुळे दराकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

सीताफळांना मागणी

शंभर रुपयांना दीड किलो दराने सीताफळ विक्री सुरू आहे. सीताफळाचा हंगाम सुरू असल्याने कच्ची, तयार सीताफळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. किरकोळ विक्री मात्र ६० ते ७० रुपये किलो दराने सुरू आहे.

कणसांचा खप

मक्याची कोवळी कणसे विक्रीसाठी उपलब्ध असून, १० ते १५ रुपये नग दराने विक्री सुरू आहे. गाडीवर मात्र ४० रुपयांना तीनप्रमाणे विक्री सुरू आहे. भाज्यांसह कणसांची खरेदी ग्राहक प्राधान्यांने करीत आहेत. कणसासह दाणेही विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

सणासुदीच्या काळात भाज्यांचा खप अधिक असल्याने दरात वाढ झाली आहे. नैवेद्यामुळे भाज्यांना वाढती मागणी आहे. ऐनवेळी होणारी उपलब्धता यासाठी विक्रेते सांगतील ती किंमत मोजावी लागत आहे. शहरातील काही माॅलमध्ये भाज्यांची विक्री करण्यात येत आहे. परंतु माॅलमधील दर व प्रत्यक्ष बाजारातील दर यामध्ये कमालीचा फरक आहे. यामध्ये ग्राहकांची फरफट होत आहे.

- सोनाली कांबळे, रत्नागिरी

एकाच शहरात भाज्या असो वा फळे प्रत्येक ठिकाणचे दर वेगवेगळे आहे. अंतरात फरक असला तरी दरात फरक कशासाठी? बहुतांश भाज्या परजिल्ह्यातून येतात. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव झालेनंतर भाज्या विक्रीसाठी उपलब्ध होतात. लिलावावेळचे दर व प्रत्यक्ष विक्री दरात कमालीचा फरक आहे. त्यातच प्रत्येक ठिकाणचा दर वेगळा लावला जात आहे.

- प्रणाली जोयशी, रत्नागिरी