शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

फळे, भाज्यांना वाढती मागणी, दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:30 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गणेशोत्सव सुरू असल्याने फळे, भाज्यांना वाढती मागणी असून, दरात मात्र वाढ झाली आहे. गावठी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गणेशोत्सव सुरू असल्याने फळे, भाज्यांना वाढती मागणी असून, दरात मात्र वाढ झाली आहे. गावठी भाज्या बाजारात उपलब्ध असून फळे, भाज्याविक्रेते गावोगावी, गल्लोगल्ली फिरत आहेत.

उत्सवामुळे घरे माणसांनी गजबजली असून, पाहुण्यांची वर्दळ वाढली आहे. साहजिकच माणसांचा राबता वाढल्याने भाजीपाल्याचा खपही वाढला आहे. बाजारात विविध प्रकारच्या भाज्या उपलब्ध असून, गावठी भाज्याही विक्रीसाठी आल्या आहेत. काकडी, चिबूडसह दोडकी, भेंडी, गवार, पडवळ, घेवडा, कोबी, फ्लाॅवर, फरसबी, वांगी, सिमला मिरची, गाजर यांना मागणी आहे. मूळा, माठ, मेथी, शेपू, पालक आदी पालेभाज्यांची उपलब्धता होत आहे. १५ ते २० रुपये दराने पालेभाज्यांची विक्री सुरू आहे.

उत्सवकाळात फळांनाही वाढती मागणी आहे. सफरचंद, केळी, चिकू, पेरू, नासपती, माेसंबी, संत्री, डाळिंब, सीताफळ पपई विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कोशिंबिरीच्या काकडीसह वड्यासाठी लागणाऱ्या मोठ्या काकड्यांचा खप अधिक आहे.

दरात वाढ तरीही खरेदी

ऐन उत्सव काळात भाज्यांचे दरात वाढ झाली आहे. मात्र दरावर भाज्यांची उपलब्धता होत असल्याने दरामध्ये फारशी घासघीस न करता खरेदी करण्यात येत आहे. शहरातील नाक्यानाक्यावर तसेच गावातून भाजी व फळेविक्रेते फिरत असल्याने उपलब्धता सहज होत आहे. त्यामुळे दराकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

सीताफळांना मागणी

शंभर रुपयांना दीड किलो दराने सीताफळ विक्री सुरू आहे. सीताफळाचा हंगाम सुरू असल्याने कच्ची, तयार सीताफळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. किरकोळ विक्री मात्र ६० ते ७० रुपये किलो दराने सुरू आहे.

कणसांचा खप

मक्याची कोवळी कणसे विक्रीसाठी उपलब्ध असून, १० ते १५ रुपये नग दराने विक्री सुरू आहे. गाडीवर मात्र ४० रुपयांना तीनप्रमाणे विक्री सुरू आहे. भाज्यांसह कणसांची खरेदी ग्राहक प्राधान्यांने करीत आहेत. कणसासह दाणेही विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

सणासुदीच्या काळात भाज्यांचा खप अधिक असल्याने दरात वाढ झाली आहे. नैवेद्यामुळे भाज्यांना वाढती मागणी आहे. ऐनवेळी होणारी उपलब्धता यासाठी विक्रेते सांगतील ती किंमत मोजावी लागत आहे. शहरातील काही माॅलमध्ये भाज्यांची विक्री करण्यात येत आहे. परंतु माॅलमधील दर व प्रत्यक्ष बाजारातील दर यामध्ये कमालीचा फरक आहे. यामध्ये ग्राहकांची फरफट होत आहे.

- सोनाली कांबळे, रत्नागिरी

एकाच शहरात भाज्या असो वा फळे प्रत्येक ठिकाणचे दर वेगवेगळे आहे. अंतरात फरक असला तरी दरात फरक कशासाठी? बहुतांश भाज्या परजिल्ह्यातून येतात. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव झालेनंतर भाज्या विक्रीसाठी उपलब्ध होतात. लिलावावेळचे दर व प्रत्यक्ष विक्री दरात कमालीचा फरक आहे. त्यातच प्रत्येक ठिकाणचा दर वेगळा लावला जात आहे.

- प्रणाली जोयशी, रत्नागिरी