शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

फळे, भाज्यांना वाढती मागणी, दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:30 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गणेशोत्सव सुरू असल्याने फळे, भाज्यांना वाढती मागणी असून, दरात मात्र वाढ झाली आहे. गावठी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गणेशोत्सव सुरू असल्याने फळे, भाज्यांना वाढती मागणी असून, दरात मात्र वाढ झाली आहे. गावठी भाज्या बाजारात उपलब्ध असून फळे, भाज्याविक्रेते गावोगावी, गल्लोगल्ली फिरत आहेत.

उत्सवामुळे घरे माणसांनी गजबजली असून, पाहुण्यांची वर्दळ वाढली आहे. साहजिकच माणसांचा राबता वाढल्याने भाजीपाल्याचा खपही वाढला आहे. बाजारात विविध प्रकारच्या भाज्या उपलब्ध असून, गावठी भाज्याही विक्रीसाठी आल्या आहेत. काकडी, चिबूडसह दोडकी, भेंडी, गवार, पडवळ, घेवडा, कोबी, फ्लाॅवर, फरसबी, वांगी, सिमला मिरची, गाजर यांना मागणी आहे. मूळा, माठ, मेथी, शेपू, पालक आदी पालेभाज्यांची उपलब्धता होत आहे. १५ ते २० रुपये दराने पालेभाज्यांची विक्री सुरू आहे.

उत्सवकाळात फळांनाही वाढती मागणी आहे. सफरचंद, केळी, चिकू, पेरू, नासपती, माेसंबी, संत्री, डाळिंब, सीताफळ पपई विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कोशिंबिरीच्या काकडीसह वड्यासाठी लागणाऱ्या मोठ्या काकड्यांचा खप अधिक आहे.

दरात वाढ तरीही खरेदी

ऐन उत्सव काळात भाज्यांचे दरात वाढ झाली आहे. मात्र दरावर भाज्यांची उपलब्धता होत असल्याने दरामध्ये फारशी घासघीस न करता खरेदी करण्यात येत आहे. शहरातील नाक्यानाक्यावर तसेच गावातून भाजी व फळेविक्रेते फिरत असल्याने उपलब्धता सहज होत आहे. त्यामुळे दराकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

सीताफळांना मागणी

शंभर रुपयांना दीड किलो दराने सीताफळ विक्री सुरू आहे. सीताफळाचा हंगाम सुरू असल्याने कच्ची, तयार सीताफळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. किरकोळ विक्री मात्र ६० ते ७० रुपये किलो दराने सुरू आहे.

कणसांचा खप

मक्याची कोवळी कणसे विक्रीसाठी उपलब्ध असून, १० ते १५ रुपये नग दराने विक्री सुरू आहे. गाडीवर मात्र ४० रुपयांना तीनप्रमाणे विक्री सुरू आहे. भाज्यांसह कणसांची खरेदी ग्राहक प्राधान्यांने करीत आहेत. कणसासह दाणेही विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

सणासुदीच्या काळात भाज्यांचा खप अधिक असल्याने दरात वाढ झाली आहे. नैवेद्यामुळे भाज्यांना वाढती मागणी आहे. ऐनवेळी होणारी उपलब्धता यासाठी विक्रेते सांगतील ती किंमत मोजावी लागत आहे. शहरातील काही माॅलमध्ये भाज्यांची विक्री करण्यात येत आहे. परंतु माॅलमधील दर व प्रत्यक्ष बाजारातील दर यामध्ये कमालीचा फरक आहे. यामध्ये ग्राहकांची फरफट होत आहे.

- सोनाली कांबळे, रत्नागिरी

एकाच शहरात भाज्या असो वा फळे प्रत्येक ठिकाणचे दर वेगवेगळे आहे. अंतरात फरक असला तरी दरात फरक कशासाठी? बहुतांश भाज्या परजिल्ह्यातून येतात. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव झालेनंतर भाज्या विक्रीसाठी उपलब्ध होतात. लिलावावेळचे दर व प्रत्यक्ष विक्री दरात कमालीचा फरक आहे. त्यातच प्रत्येक ठिकाणचा दर वेगळा लावला जात आहे.

- प्रणाली जोयशी, रत्नागिरी