शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

रमजानमुळे फळांना वाढती मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:28 IST

रत्नागिरी : रमजान सुरू असून रोजा इफ्तारीसाठी विशेषत: खजूर व फळांचे सेवन केले जात असल्यामुळे फळांना मागणी ...

रत्नागिरी : रमजान सुरू असून रोजा इफ्तारीसाठी विशेषत: खजूर व फळांचे सेवन केले जात असल्यामुळे फळांना मागणी वाढली आहे. सध्या बाजारात सर्व प्रकारची फळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आले असले तरी भाजीपाला, फळे विक्रीसाठी सकाळी ७ ते ११ या वेळेत परवानगी देण्यात आली आहे. विक्रीसाठी फळे बाजारात उपलब्ध असून, मागणीही वाढती आहे. सफरचंद १८० ते २५० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. मोसंबी १८० ते २००, संत्री १५० ते १८० रुपये, चिकू ७० रुपये, पेरू ८० रुपये, कलिंगड २५ ते ३० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. पपई ४० ते ५० रुपये नग, अननस ४० ते ६० रुपये प्रतिनग दराने विकण्यात येत आहे. पेर १८० ते २०० रुपये किलो, टरबूज ७० ते ८० रुपये प्रतिनग, द्राक्ष ६० ते ७० रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. खजूर ७० ते ५०० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. विदेशी खजूर बाजारात मुबलक स्वरूपात विक्रीला आला असून, काळ्या सीडलेस खजुराला विशेष मागणी होत आहे. रमजानमुळे शहाळ्यांना मागणी वाढली आहे. ३५ ते ४० रुपये नग दराने शहाळे विक्री सुरू आहे. याशिवाय आंबा विक्रीला आला असला तरी दर मात्र अद्याप परवडणारे नाहीत.

पाण्याची पातळी खालावल्यामुळे बाजारात उपलब्ध भाज्यांच्या किमतीही वधारल्या आहेत. वांगी ५० ते ६० रुपये किलो, टोमॅटो २० ते ३० रुपये, फ्लॉवर ४० ते ५० रुपये, कांदा १५ ते २० रुपये, बटाटा २२ ते २५ रुपये, आले ५० ते ५५ रुपये, मिरची ६० ते ७० रुपये, सिमला मिरची ५० ते ६० रुपये, गाजर ६० रुपये, मटार १०० ते १२० रुपये, फरसबी १२० रुपये, कोबी ४० रुपये, भेंडी ८० रुपये, गवार ७० रुपये, घेवडा ७० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. उन्हाळ्यात कोशिंबीरसाठी काकडीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे काकडीला विशेष मागणी असून, ५० ते ६० रुपये किलो दराने काकडीचा खप सुरू आहे.

मुळा, माठ, मेथी, शेपू, पालकच्या जुड्या १५ ते २० रुपये प्रतिनग दराने विकण्यात येत आहेत. कोथिंबीर जुडी २० ते २५ रुपये दराने विक्री होत आहे. कोरोनामुळे भाजी विक्रेते दारावर भाज्या घेऊन येत असले तरी दर मात्र चांगलेच वधारलेले आहेत. उन्हामुळे लिंबाचाही खप वाढला आहे. लिंबू १० रुपयांना २ नग दराने विक्री होत आहे.