शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

रमजानमुळे फळांना वाढती मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:28 IST

रत्नागिरी : रमजान सुरू असून रोजा इफ्तारीसाठी विशेषत: खजूर व फळांचे सेवन केले जात असल्यामुळे फळांना मागणी ...

रत्नागिरी : रमजान सुरू असून रोजा इफ्तारीसाठी विशेषत: खजूर व फळांचे सेवन केले जात असल्यामुळे फळांना मागणी वाढली आहे. सध्या बाजारात सर्व प्रकारची फळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आले असले तरी भाजीपाला, फळे विक्रीसाठी सकाळी ७ ते ११ या वेळेत परवानगी देण्यात आली आहे. विक्रीसाठी फळे बाजारात उपलब्ध असून, मागणीही वाढती आहे. सफरचंद १८० ते २५० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. मोसंबी १८० ते २००, संत्री १५० ते १८० रुपये, चिकू ७० रुपये, पेरू ८० रुपये, कलिंगड २५ ते ३० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. पपई ४० ते ५० रुपये नग, अननस ४० ते ६० रुपये प्रतिनग दराने विकण्यात येत आहे. पेर १८० ते २०० रुपये किलो, टरबूज ७० ते ८० रुपये प्रतिनग, द्राक्ष ६० ते ७० रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. खजूर ७० ते ५०० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. विदेशी खजूर बाजारात मुबलक स्वरूपात विक्रीला आला असून, काळ्या सीडलेस खजुराला विशेष मागणी होत आहे. रमजानमुळे शहाळ्यांना मागणी वाढली आहे. ३५ ते ४० रुपये नग दराने शहाळे विक्री सुरू आहे. याशिवाय आंबा विक्रीला आला असला तरी दर मात्र अद्याप परवडणारे नाहीत.

पाण्याची पातळी खालावल्यामुळे बाजारात उपलब्ध भाज्यांच्या किमतीही वधारल्या आहेत. वांगी ५० ते ६० रुपये किलो, टोमॅटो २० ते ३० रुपये, फ्लॉवर ४० ते ५० रुपये, कांदा १५ ते २० रुपये, बटाटा २२ ते २५ रुपये, आले ५० ते ५५ रुपये, मिरची ६० ते ७० रुपये, सिमला मिरची ५० ते ६० रुपये, गाजर ६० रुपये, मटार १०० ते १२० रुपये, फरसबी १२० रुपये, कोबी ४० रुपये, भेंडी ८० रुपये, गवार ७० रुपये, घेवडा ७० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. उन्हाळ्यात कोशिंबीरसाठी काकडीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे काकडीला विशेष मागणी असून, ५० ते ६० रुपये किलो दराने काकडीचा खप सुरू आहे.

मुळा, माठ, मेथी, शेपू, पालकच्या जुड्या १५ ते २० रुपये प्रतिनग दराने विकण्यात येत आहेत. कोथिंबीर जुडी २० ते २५ रुपये दराने विक्री होत आहे. कोरोनामुळे भाजी विक्रेते दारावर भाज्या घेऊन येत असले तरी दर मात्र चांगलेच वधारलेले आहेत. उन्हामुळे लिंबाचाही खप वाढला आहे. लिंबू १० रुपयांना २ नग दराने विक्री होत आहे.